शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कांस्यपदक विजेत्या बेळगावच्या मलप्रभाला आता नोकरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:35 IST

बेळगाव तालुक्यातील तुरमुरी या छोट्या खेड्यातील मलप्रभा जाधव हिने आशियाई स्पर्धेत कुराश प्रकारात कास्यंपदक पटकावत इतिहास घडवला आहे.

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तुरमुरी या छोट्या खेड्यातील मलप्रभा जाधव हिने आशियाई स्पर्धेत कुराश प्रकारात कास्यंपदक पटकावत इतिहास घडवला आहे. तिच्या कामगिरीचा सर्वच बेळगावकरांना अभिमान वाटत आहे. पुढील कामगिरी करण्यासाठी तिला आर्थिक स्थैर्य आणि शासकीय नोकरीची गरज आहे.

ज्युडो या क्रीडाप्रकारातील कुराश हा प्रकार तसा भारतीयांना परिचित नसला तरी मध्य आशियात हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. या खेळात बेळगावच्या मलप्रभाने आपल्या कौशल्याने प्रभुत्व मिळवले आहे. तिच्या या यशात तिचे प्रशिक्षक जितेंद्र सिंह आणि बेळगावचे क्रीडा अधिकारी त्रिवेणी सिंह यांचा मोलाचा वाटा आहे.

बेळगाव-चंदगड तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या तुरमुरी गावात जन्मलेल्या मलप्रभाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. हायस्कूलमध्ये ती खो-खो खेळत होती. एका स्पर्धेवेळी त्रिवेणी सिंह यांनी तिचा खेळ पहिला. त्यांनी तिला कुराश या प्रकारात कारकिर्द करण्यास प्रोत्साहित केले. त्रिवेणी सिंह यांनी तिला कुराश या खेळाचे प्राथमिक धडे दिले.

आशियाई स्पर्धेपुर्वी मलप्रभाला सरावासाठी कझाकिस्तानला जायचे होते. त्याचबरोबर या खेळासाठी लागणाऱ्या साहित्यसाठीही मोठा खर्च येणार होता. हा सर्व खर्च मलप्रभाच्या कुटुंबियांसाठी मोठे दिव्य होते. यावेळी प्रशिक्षक जितेंद्र सिंह तिच्या मदतीला धावले. मलप्रभाच्या खर्चाचा मोठा वाटा त्यांनी उचलला.

मलप्रभाने पुणे येथील इंडो एशियन गेममध्ये ब्राँझपदक, तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमधील सुवर्णपदक, पटकावली आहेत. कर्नाटक सरकारने तिचा एकलव्य पुरस्काराने गौरव केलेला आहे. या खेळात प्रतिकूल परिस्थिती असताना मलप्रभाने आपल्या साहित्य आणि परदेशवारीचा खर्च स्वत: केला आहे. आता देशासाठी पदक मिळविल्यानंतर याची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. यापुढील स्पर्धेसाठी तिला शासकीय मदत मिळेल तसेच तिचा नोकरीचा प्रश्नही सुटेल अशी अपेक्षा तिच्या पालकांनी व्यक्त केलीआशियाई स्पर्धेत मलप्रभाने कास्यपदक पटकावल्यानंतर तुरमुरी येथे मलप्रभाच्या आईला पेढा भरवून वडील यल्लपा जाधव, भाऊ रघू जाधव यांनी आनंद व्यक्त केला.