शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 10:39 IST

Crimenews Kolhapur-सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्यास अटक बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक

कोल्हापूर : सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, तसेच त्याचा साथीदार रोहित मारुती मुळीक (मु. पो.भादवण, ता. आजरा, जि.कोल्हापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.तक्रारदार शिवाजी फड हा मित्र नवनाथ मुंडे (रा.बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि.लातूर) यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी पोवारला भेटले. त्यावेळी त्याने, रोहित मुळीक याच्या मदतीने परीक्षा न देता त्यांना थेट कॉन्टेन्मेंट बोर्डामध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देतो, सांगून प्रत्येकाकडे आठ लाखांची मागणी केली. पीरवाले याने तानाजीला पैसे दिल्यानंतर त्याला त्याच दिवशी सैन्यात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.दि. ३ ऑक्‍टोबर २०१९ ला संग्राम राठोडने सात लाख रुपये, शिवाजी फड व नवनाथ मुंडे यांच्यासाठी दोघांच्या नातेवाईकांनी तानाजीकडे एकूण १६ लाख रुपये तानाजीकडे दिले. त्यांनाही नियुक्तीपत्रे दिली. शिवाजीसह संग्राम, नवनाथ यांना आर्मी कॅम्प (झांशी) येथे हजार राहण्यास सांगितले. दि. १४ ऑक्टोबर २०१० ला तिघे झांशी येथे पोहोचले. तेथे वीरेंद्र नावाच्या तरुणाने त्यांना कॉन्टोन्मेंट बोर्डचे फोटो, शिक्का, सही व नाव-नंबर असलेले ओळखपत्र तिघांना दिले.

वीरेंद्रने शिवाजी आणि नवनाथला आर्मी कॅम्पमध्ये नेऊन दोघांकडून कॅम्पमध्ये कचरा काढणे, रंगरंगोटी काढण्याची कामे करून घेतली. त्यामुळे शिवाजीला फसल्याचा संशय आला. त्याने तानाजीला फोनवर संपर्क साधला पण त्याने तो टाळला, त्यामुळे तिघेही झांशीहून गावी परतले. त्यांनी दि. सप्टेंबर २०१९ पासून आजपर्यंत फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान धुगे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर