शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
7
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
8
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
9
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
10
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
11
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
12
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
13
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
14
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
15
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
16
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
17
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
18
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
19
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
20
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 10:39 IST

Crimenews Kolhapur-सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्यास अटक बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक

कोल्हापूर : सैन्यात नोकरी लावतो म्हणून शिवाजी विद्यापीठातील पहारेकऱ्याने तिघा तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली. त्याने तरुणांकडून पैसे घेऊन भारतीय सेनेचा लोगो व सही शिक्का असलेले बनावट ओळखपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजी भगवान फड (मूळ लातूर, सध्या पुणे) याच्यासह तिघांनी राजारामपुरी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली.संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, तसेच त्याचा साथीदार रोहित मारुती मुळीक (मु. पो.भादवण, ता. आजरा, जि.कोल्हापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.तक्रारदार शिवाजी फड हा मित्र नवनाथ मुंडे (रा.बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि.लातूर) यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी पोवारला भेटले. त्यावेळी त्याने, रोहित मुळीक याच्या मदतीने परीक्षा न देता त्यांना थेट कॉन्टेन्मेंट बोर्डामध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देतो, सांगून प्रत्येकाकडे आठ लाखांची मागणी केली. पीरवाले याने तानाजीला पैसे दिल्यानंतर त्याला त्याच दिवशी सैन्यात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.दि. ३ ऑक्‍टोबर २०१९ ला संग्राम राठोडने सात लाख रुपये, शिवाजी फड व नवनाथ मुंडे यांच्यासाठी दोघांच्या नातेवाईकांनी तानाजीकडे एकूण १६ लाख रुपये तानाजीकडे दिले. त्यांनाही नियुक्तीपत्रे दिली. शिवाजीसह संग्राम, नवनाथ यांना आर्मी कॅम्प (झांशी) येथे हजार राहण्यास सांगितले. दि. १४ ऑक्टोबर २०१० ला तिघे झांशी येथे पोहोचले. तेथे वीरेंद्र नावाच्या तरुणाने त्यांना कॉन्टोन्मेंट बोर्डचे फोटो, शिक्का, सही व नाव-नंबर असलेले ओळखपत्र तिघांना दिले.

वीरेंद्रने शिवाजी आणि नवनाथला आर्मी कॅम्पमध्ये नेऊन दोघांकडून कॅम्पमध्ये कचरा काढणे, रंगरंगोटी काढण्याची कामे करून घेतली. त्यामुळे शिवाजीला फसल्याचा संशय आला. त्याने तानाजीला फोनवर संपर्क साधला पण त्याने तो टाळला, त्यामुळे तिघेही झांशीहून गावी परतले. त्यांनी दि. सप्टेंबर २०१९ पासून आजपर्यंत फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान धुगे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर