शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणाने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 00:11 IST

नांगरे-पाटील प्रबोधन करणार का? : शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही आश्चर्यकारकच

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी येथील एका मोठ्या पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी महिन्याचा हप्ता ठरवून मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आणि पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पोलिस खात्याची अब्रू मात्र चव्हाट्यावर आली. एकीकडे व्याख्याने देऊन समाजाचे प्रबोधन करू पाहणारे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आता पोलिस दलात प्रबोधन करून अशा प्रवृत्तीला आळा घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे गणले जाते. याआधी अनेक अधिकारी या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारण्यासाठी धडपडत होते. त्याचे मुख्य कारण यानिमित्ताने पुढे येत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक, क्लबचालक, मटकाकिंग, गुटखाकिंग, गावठी दारू विक्रेते अशा अनेक लहान-मोठ्या माशांना गळाला लावून महिन्याला ‘कलेक्शन’ करणे नियमितपणे सुरू असल्याचे उघड होताना दिसत आहे. या कलेक्शनसाठी विशेष प्रावीण्य असलेला एखादा ‘विष्णू’ अधिकाऱ्यांना हाताशी लागतोच. आपण नामानिराळे राहत त्याच्यामार्फत सर्व माया एकत्रित केली जाते, हे आता स्पष्ट होत आहे. पोलिस अशा कामांसाठी काही झीरो पोलिस, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांना नेमून हा स्वतंत्र कारभार चालवतात. अशा कार्यकर्त्यांची माहिती गेल्या महिन्यात मागविण्यात आली. त्यावेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असती तरी अशा बेअब्रूपणाला थोडा तरी लगाम लागला असता. मात्र, वरिष्ठांचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही ‘आश्चर्यकारकच’ म्हणावे लागेल. पोलिस निरीक्षक गायकवाड यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच डॅशिंग पद्धतीने सुरू झाली. तीन महिन्यांत त्यांनी बराच ठसा उमटविला. मात्र, अशा एखाद्या ‘विष्णू’च्या भूलभुलैयाला बळी पडल्याने त्यांना कारवाईलासामोरे जावे लागले. त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचे पोलिस ठाण्यात बोलले जात होते. पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवावा व सर्वसामान्य नागरिकांशी सलोख्याने वागावे, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. मात्र, पोलिस ठाण्यात नेमके याउलट घडते. गुन्हेगारांशी मैत्रीचे नाते घट्ट करत त्यांच्याशी सलगी करून आपला फायदा करून घेण्यातच पोलिसांना रस दिसतो. यामध्ये एखादा प्रामाणिक पोलिस मध्ये आलाच तर त्याला दुसऱ्याच कामावर नेमले जाते. त्याच्यावर होणारा अन्याय सरळपणे दिसतो. मात्र, कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नांगरे-पाटील यांनी पोलिस दलाचे प्रबोधन करत त्यांना भटकटलेल्या मार्गावरून पुन्हा रूळावर आणणे गरजेचे बनले आहे. ‘आ बैल मुझे मार’ गुटख्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला पाच्छापुरे हा ‘लाचलुचपत’ विभागाला तक्रार करून अडकवितो, ही माहिती सर्वांना माहीत आहे. कारण याआधी त्याने सातजणांना अडकविले आहे. त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई करायची सोडून त्याच्याकडे हप्ता (लाच) मागण्याचे धाडस म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीप्रमाणेच असल्याचे दिवसभर पोलिस वर्तुळात बोलले जात होते