शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

सत्तेसाठी दोन्ही राजेंचं आतून फिक्सिंग !

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

सुवर्णा पाटील यांच्याकडून आरोपांच्या फैरी : नगराध्यक्षपद राजघराण्याकडे राहावे म्हणूनच विरोधात अनोळखी चेहरा

सातारा : ‘मनोमिलनामुळंच साताऱ्याची पुरती दुर्दशा झालीय. सक्षम पर्याय उभा नव्हता, म्हणूनच आजपावेतो पालिकेत ठराविक टग्यांच्या टोळक्याचा कारभार चालत होता. आता पालिकेत आपली सत्ता कायम राहावी, यासाठी दोन्ही राजेंनी आतून फिक्सिंग केलंय. नगराध्यक्षपदासह अनेक ठिकाणी मातब्बर उमेदवारांविरोधात ओळख नसलेले उमेदवार मुद्दामहून उभे केले गेलेत. राजघराणे हे साताऱ्याचे मालक नाहीत. साताऱ्याच्या मातीत स्वाभिमान आहे,’ अशी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केलीय सुवर्णा पाटील यांनी. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या सुवर्णा पाटील यांना जेव्हा ‘लोकमत टीम’नं बोलतं केलं, तेव्हा राजघराण्यावर होत गेले एकाहून एक घणाघाती प्रहार. पालिकेत सातारा विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी पक्षाच्या आदेशानेच घेतला होता, आता पक्षाच्या आदेशानेच भारतीय जनता पार्टी सातारा पालिकेसह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींची निवडणूक लढणार आहे, असे स्पष्ट करून सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘दोन्ही आघाड्या दहा वर्षांपासून मनोमिलनाच्या माध्यमातून सातारा पालिकेच्या सत्तेत होत्या. मनोमिलन तुटले असल्याचे दाखविले जात असले तरी पालिकेतल्या सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांनी फिक्सिंग केल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. सातारा विकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देताना समाजात वावरणारा उमेदवार दिला नाही. राजघराण्यातील उमेदवाराविरोधात ‘साविआ’ने खंबीर उमेदवार न देण्यामागे दोन्ही आघाड्यांचे गौडबंगाल असल्याची खात्री संपूर्ण शहरातील नागरिकांना पटली आहे.’पालिकेत काम करत असताना आलेल्या अनुभवांविषयी विचारले असता, सुवर्णा पाटील यांनी आघाडीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ‘शहरातल्या नागरिकांना काय हवे हो? वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत गरजा पुरवणे पालिकेचे काम आहे. त्या पुरविण्यासाठीही आम्हाला आटापिटा करावा लागत होता. या गरजा बाजूला ठेवून काही नगरसेवकांच्या टक्केवारीचा हेतू साध्य करण्यासाठी शहराबाहेरील फिश मार्केट, गोडोली तळे, आयुर्वेदिक गार्डनसाठी पालिकेचा निधी देण्यात आला. प्रभागात मूलभूत गरजा पुरविण्यासाठी मागूनही निधी दिला गेला नाही. काही ठराविक मंडळींकडेच सर्व सूत्रे असल्याने निधी वाटपातही दुजाभाव केला गेला.’आम्ही ज्योतिर्मय फांउडेशनच्या माध्यमातून काम करतोय. महिला एकत्र येऊन महिलांना सक्षम करण्यासाठी धडपड करत असतो. कर्तव्य जे काम करतंय त्याचा बागुलबुवा मात्र कशाला केला जातोय?, असेही पाटील म्हणाल्या.अजिंक्य उद्योग समूहासाठी अनेक मोक्याच्या जागा कवडीमोल भावाने विकत घेतल्या गेल्या. अजिंक्य बझार नुकसानीत आला. तसेच अजिंक्यतारा फळे, फुले, भाजी विक्री संघाचा फायदा शेतकऱ्यांना कितपत झाला, हाही संशोधनाचा विषय आहे. साताऱ्यात अतिक्रमणे हटवितानाही दुजाभाव पाहायला मिळत असल्याचे सांगताना सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘आर्थिक तडजोडी करून पालिकेचा कारभार केला जात आहे. पोवई नाक्यावरील एका हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण वर्षानुवर्षे तसेच असताना त्याला हात घातला जात नाही; परंतु त्यासमोरच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बागेची रुंदी कमी केली जाते, यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असेल? सगळा तडजोडीचा मामला. वळचणीचं पाणी कधी आढ्याला जात नाही, अगदी त्याचप्रमाणे स्टँड परिसरातल्या मार्केट कमिटी इमारतीच्या अतिक्रमणाबाबतही झाले आहे. चुकीच्या पद्धतीने या इमारतीचे काम केले असताना राजकीय वरदहस्त दाखवून त्यावर कारवाई होत नाही. एसटी विभागीय कार्यालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडूनही तोडपाणी करून रस्त्याकडेची जागा त्याच्या घशात घालण्यात आली आहे.’‘आमच्या विरोधकांनी कारखाना, बँका प्रगतिपथावर आणून दाखवल्या असत्या तर सातारकरांची जी आता अवस्था झालीय, ती झाली नसती. त्यांच्या अडचणीत आलेल्या बँक ठेवीदारांची अवस्था सध्या दयनीय आहे, असेही सुवर्णा पाटील यांनी स्पष्ट केले. ‘वर्षानुवर्षे साताऱ्यात सत्ता असतानाही दोन्ही येथील औद्योगिक वसाहत वाढली नाही. साताऱ्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने सुशिक्षित व तंत्रकुशल झालेले तरुण-तरुणी शहराबाहेर पडत आहेत. पुणे-मुंबईत जाऊन त्यांना ओढाताण करत नोकरी करावी लागते. हे मनोमिलनाचे मोठे अपयश आहे. अजिंक्यतारा फळे-फुले, भाजी विक्री संघाचा किती शेतकऱ्यांना फायदा करून दिला, हे संपूर्ण जनतेला ज्ञात आहे. खटाव तालुक्यातील जवानाच्या मुलाला शाहू अ‍ॅकॅडमीत फी सवलत देण्याची घोषणा केली; मात्र ती दिली नाही. वेदांतिकाराजे भोसले यांना सर्वसामान्यांबद्दल देणे-घेणे नाही. त्या अत्यंत हेकेखोर आहेत. आपण सक्षमपणे पालिकेचा कारभार करू, असे म्हणून त्यांनी आधीच्या महिला नगराध्यक्षांचा अपमान केला आहे. त्यांच्या ‘इगो’मुळे साताऱ्याचे काय भले होणार आहे? साताऱ्याच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीतच कौल दिला आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. (लोकमत टीम)पतीदेवाच्या कर्तृत्वाबद्दल मात्र सारवासारवपालिका आवारात आपल्याच पक्षाच्या शिवसैनिकाला मारहाण असो की, सार्वजनिक ठिकाणी विधिनिषेध न बाळगता खुलेआमपणे एखाद्याचा उद्धार असो... अशा अनेक अचाट प्रयोगामुळे नेहमीच चर्चेत असणारे नरेंद्र पाटील यांच्या ‘कार्यकर्तृत्वा’बद्दल ‘लोकमत टीम’नं थेटपणे विचारलं, ‘आपल्या पतीदेवाने आजपर्यंत अनेक हितचिंतक निर्माण करुन ठेवल्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याला तोटा होणार नाही का ? ’ ...यावर मात्र सुवर्णा पाटील यांनी सारवासारव केली, ‘ते वरुन जरी बोलायला कठोर असले तरी आतून मऊ आहेत. उलट आज मी त्यांच्यामुळेच इथंपर्यंत येऊ शकले. यंदाच्या निवडणुकीत मी प्रचारात असले तरी पडद्यामागं राहून तेच सूत्रं हलविणार आहेत.’आमच्यामुळे टगे बिनविरोध निवडले गेलेपाच वर्षांपूर्वी भाजपने मनोमिलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आमच्यामुळेच अनेक टगे पालिकेत बिनविरोध निवडून आले, अशी खंतही सुवर्णा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनीच माझी उमेदवारी जाहीर केलीआपल्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होता, हे आठवून दिल्यानंतर पाटील म्हणाल्या, ‘पद मिळावे, असे प्रत्येकालाच वाटते. हत्ती हा हत्तीच्या चालीने चालत असतो. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारी दिली आहे.’टक्केवारीच्या टेंडरला एकसुरात एकमुखी पाठिंबा असायचा होेऽऽ...पाच वर्षे तुम्ही मनोमिलनाच्या माध्यमातून पालिकेच्या सत्तेत होता, मग आताच सत्ताधाऱ्यांविरोधात बोलण्याचा तुम्हाला साक्षात्कार कसा झाला?, या गुगली प्रश्नावर उत्तर देताना सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘मी वेळोवेळी विषय मांडले. मी व अमित कुलकर्णी असे दोनच भाजपचे उमेदवार निवडणुकीत होतो. त्यातून मी एकटे निवडून आले. आमचे संख्याबळ अपुरे असल्याने प्रखर विरोध करता आला नाही, हे मान्य करते; परंतु वेळावेळी सभागृहात आवाज उठवून वाईट कामांना विरोध केला. माझा प्रभाग मोठा असल्याने निधीची गरजही मोठी होती. मात्र, काही ठराविक नगरसेवकांचं टोळकं दोन्ही वाड्यांवरील आदेशाचं तुणतुणं वाजवत असे. १०० विषय अवघ्या पाच मिनिटांत मंजूर होतात, यातूनच तुम्ही ओळखा, कसा कारभार चालत असेल ते. टक्केवारीचं टेंडर असलं की मंजूर म्हणून एका सुरात आवाज होत होता.’मीच आमदार... मीच नगराध्यक्ष; असं कसं शक्य ? मी एक सर्वसामान्य घरातील गृहिणी. जर मला माझं स्वयंपाकघर व्यवस्थित हाताळता येत असेल तर साताऱ्याचा कारभार का शक्य नाही ? केवळ मी कॉमन लेडीज म्हणून सक्षम नाही का ? मीच आमदार अन् मीच नगराध्यक्ष.. असं कसं सातारकर सहन करतील ?