शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हवेत बांधल्या जन्मगाठी

By admin | Updated: August 1, 2016 00:52 IST

भाततळीजवळ विवाह : जयदीप-रेश्मा रोप-वेला लटकत बनले जीवनसाथी

मलकापूर : काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या एका गिर्यारोहक तरुणाने गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या एका तरुणीशी रविवारी रोप-वेच्या साहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी बांधल्या. कोल्हापुरातील जयदीप जाधव व रेश्मा पाटील अशी त्यांची नावे आहेत. हा अनोखा विवाह सोहळा ऐतिहासिक पावनखिंड परिसरातील जाखणीच्या कड्यावरील दरीत पार पडला. पारंपरिक विवाह पद्धतीला फाटा देऊन झालेल्या निसर्गाच्या कुशीतील या अनोख्या विवाह सोहळ्यास अनेकांंनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. भाततळी (ता. शाहूवाडी) येथील जाखणीच्या कड्यावर कोल्हापुरातील जयदीप व रेश्मा यांचा हा आगळावेगळा विवाह सोहळा हिल रायडर्स ग्रुप, वेस्टर्न माऊंट, मलय अ‍ॅडव्हेंचर या ग्रुपच्यावतीने आयोजित केला होता. उपस्थित अतिथींनी वधू-वरावर पुष्पवृष्टी केली. नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. दाट धुके, रिमझिम पाऊसधारा, भिरभिरणारा वारा अशा मंगलमय वातावरणात जयदीप व रेश्मा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी गेले दोन दिवस हिल रायडर्सचे प्रमुख प्रमोद पाटील, वेस्टर्न माऊंटचे विनोद कांबोज, युवराज साळुंखे, मलय अ‍ॅडव्हेंचरचे मेहबुब मुजावर, नीलेश बेर्डे, संतोष पाटील, जम्मू-काश्मीरहून या विवाह सोहळ्यास प्रशांत पाटील, रंगराव देसाई यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, महिला ग्रुपच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते. साहसी वृत्तीचा जागर यावेळी प्रमोद पाटील म्हणाले की, पन्हाळा-पानखिंड या ऐतिहासिक मार्गावरची पदभ्रमंती कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य ठरले आहे. गडकोटाच्या संवर्धन जागृतीसाठी मे महिन्यात विशाळगडच्या पायथ्याला व्हॅली क्रॉसिंगचा उपक्रम यशस्वी केला. त्यानंतर जयदीप यांचा विवाह साहसी उपक्रमाद्वारे तेही बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यातीथीच्या पार्श्वभूमीवर घेऊन या परिसरातील जाज्वल इतिहासाबरोबर साहसीवृत्तीचा जागर तरूणाईत घडविला आहे. वधू-वरांचे ‘सैराट’ आगमन दुपारी बारा वाजता वधू-वर सैराट पद्धतीने बुलेटवरून विवाहस्थळी दाखल झाले. उपस्थित पाहुण्यांनी केलेल्या ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आयोजकांनी जाखणीच्या कड्यावर सुमारे ३५0 फूट लांब व २५0 फूट उंचीवर रोप-वे बांधून वधू-वर व पुरोहितास बसण्याची व्यवस्था केली होती. विवाह सोहळ्याच्या आकर्षक पोशाखात लग्नविधीस पुरोहित सागर ढोली यांनी मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात केली. ग्राममंदिरात स्नेहभोजन लग्नानंतर दीड किलोमीटर जंगलातून भाततळी येथील ग्रामदेवी सुखाईच्या दर्शनास सारे वऱ्हाड दाखल झाले. या लग्नास गेळवडे, पांढरेपाणी, केंबुर्णेवाडी, मालाईवाडा परिसरातील ग्रामस्थ तसेच पाडळीचे पन्नासभर वऱ्हाडी मोठ्या उत्सुकतेपोटी हजर होते. वर्षा पर्यटनास आलेल्या शंभरहून पर्यटकांनी हा सोहळा नजरेत साठवला. दुपारनंतर मंदिरातच स्नेहभोजन झाले. त्यानंतर शिवप्रेमींच्या शुभेच्छा वर्षावात साहसी लग्नसोहळ्याची सांगता झाली.