शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सीमावासीयांनीही जागविली मराठी अस्मिता

By admin | Updated: October 16, 2016 00:18 IST

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे सातत्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय मागणीला सक्रिय

पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या करवीरकरांच्या हाकेला प्रतिसाद देत शनिवारी निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला सीमाभागातील सुमारे पन्नास हजार मराठा बांधवांनी उपस्थिती लावून मराठी अस्मितेची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. कर्नाटकातील मराठा समाजालाही आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी सीमाभागातील मराठा बांधवांनी यानिमित्ताने केली. बेळगावच्या महापौर सरिता विराज पाटील, उपमहापौर संजय शिंदे, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नगरसेविका रेणू मुतगेकर, सुधा भातखंडे, विजय भोसले, विनायक गुंजटकर, गटनेते पंढरी परब, किरण सायनाक, किरण गावडे, नूतन गायकवाड, प्रकाश मिरगाळे, अमीन देसाई, डॉ. विराज पाटील, मंगेश देसाई, गायत्री देसाई, आदींनी सीमाभागातील मोर्चेकऱ्यांचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे महापौर सरिता पाटील या शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात येऊन दाखल झाल्या होत्या. त्यांचे स्वागत महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. बेळगाव महापालिका हद्दीत एकूण ५८ प्रभाग असून, त्यापैकी ३२ प्रभागांत मराठी गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३२ प्रभागांतील नगरसेवकांनी चार-चार बसेसमधून त्यांचे कार्यकर्ते आले होते. त्याशिवाय बेळगाव ग्रामीणमधूनही असंख्य कार्यकर्ते आले होते. सीमाभागातून आलेल्या सर्व मराठी बांधवांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संभाजीनगर एनसीसी आॅफिसजवळ करण्यात आली होती, तर श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चहा व नाष्ट्याची सोय केली होती. सवलतींची मलमपट्टी नको मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाला शैक्षणिक सवलती जाहीर केल्या आहेत. फडणवीस यांनी अशा सवलती जाहीर करून मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका महापौर सरिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. आम्हाला सवलती नको आहेत. सरकारी नोकरीत आणि शिक्षणक्षेत्रात आरक्षण पाहिजे आहे. नुसतीच मलमपट्टी नको. आमच्या मराठा शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कोपर्डीतील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या घटनेचा मी निषेध करते. महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.