शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अवघ्या दहा रुपयांत पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 19:33 IST

बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे.

ठळक मुद्देवाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अवघ्या दहा रुपयांत पुस्तकेबालदिन विशेष; बालकांसाठी आठ वर्षांपासून उपक्रम

संतोष मिठारीकोल्हापूर : बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे.सध्या सोशल मीडियाच्या युगात बहुतांश बालके वाचनापासून दूर जात आहेत. अशा स्थितीत त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने या संस्थेने दि. १५ आॅगस्ट २०१० रोजी अवघ्या ‘दहा रुपयांत पुस्तके’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी या संस्थेने मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाची निर्मिती केली.

या उपक्रमांतर्गत विविध स्वरूपांतील २५ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगुप्पे, सुभाष विभूते, पृथ्वीराज तौर, सुनील सुतार, चंद्रकांत निकाडे, फारूक काझी, पी. जे. कांबळे, डॉ. शिवशंकर उपासे, बाळ पोतदार, माधुरी माटे, सावित्री जगदाळे, आदी लेखक-लेखिकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

ही पुस्तके महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविली जातात. मराठीमध्ये बालसाहित्य प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. अशा स्थितीत अल्प किमतीमध्ये बालकांसाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.

आतापर्यंत एक लाख पुस्तकांची विक्री‘अवघ्या दहा रुपयांत पुस्तके’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाख पुस्तकांची विक्री झाली आहे, असे चैतन्य सृजन व सेवा संस्थेचे खजिनदार सुभाष विभूते यांनी सांगितले.

ते म्हणाले, बालकांसाठी अल्प मूल्यामध्ये संपूर्ण रंगीत पुस्तके प्रकाशित करणार आहोत. देशातील विविध भाषांतील बालसाहित्याचा परिचय व्हावा, म्हणून सुमारे वीस भाषांतील कथा निवडून संस्थेतर्फे उज्ज्वला केळकर यांनी त्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. राजा शिरगुप्पे, कृष्णात खोत, पृथ्वीराज तौर, आदींची पुस्तके पॉकेट बुक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महात्मा गांधीजी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.

बालवाङ्मयातील पहिलीच कल्पनालेखक फारूक काझी यांचे ‘मित्र’ हे पुस्तक क्यूआर कोडच्या साहाय्याने मोबाईलमध्ये आॅडिओ बुक स्वरूपात तयार केले आहे. मराठी बालवाङ्मयातील ही पहिलीच कल्पना आहे. कवयित्री माया धुप्पड यांचा ‘गरगर घागर’ कथाकाव्यसंग्रहही आॅडिओ बुकमध्ये उपलब्ध आहे. त्यातील गीते बालक आणि गायकांनी गायलेली आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य