शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

बोगस एनओसी देणारी टोळी

By admin | Updated: September 25, 2015 00:23 IST

निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप : चौकशी करून कारवाईची मागणी

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या विकासकामांना लागणारी महानगरपालिकेची बोगस ‘एनओसी’ देणारी एक टोळी कार्यरत असून, त्यामुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावरील निधी मनपाच्या संमतीविना खासगी जागेत खर्च झाल्याचा आरोप महानगरपालिकेच्या सभेत गुरुवारी झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित टोळीचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. राज्य अथवा केंद्र सरकारच्या योजनांतून मिळालेल्या निधीतून शहरात विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतात. त्यासाठी कोणती कामे करावीत, निधीचा योग्य वापर व्हावा या हेतूने त्या कामासाठी मनपा प्रशासनाची ‘एनओसी’घेतली जाते; परंतु गेल्या दहा वर्षांत अनेक कामांसाठी अशी ‘एनओसी’ न देताच कामे झाली आहेत; परंतु या कामांसाठी बोगस एनओसी दिली आहे. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. बांधकाम विभागातील एक टोळीच अशी बोगस एनओसी देत आहे. अधिकाऱ्यांच्या सह्णा बोगस आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी प्रा.जयंत पाटील यांनी केली. हा एक नवीन घोटाळा असल्याने त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी निशिकांत मेथे यांनी केली तर संबंधितांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न आदिल फरास यांनी विचारला.रंकाळ्याचा डीपीआरव्यवस्थित करावा राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलावाचा १२७ कोटींचा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा ठराव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी या विषयावर झालेल्या चर्चेत तलावाचा डीपीआर चुकीचा झाला असून, तो कार्यालयात बसून तयार केल्याचा आक्षेप घेण्यात आला. परिसरात नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पार्किंगची सोय व्हावी, एक चांगले पर्यटनकेंद्र व्हावे यादृष्टीने विकास करावा, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. जॉगिंग व सायकलिंग, पदपथ, करमणुकीची साधने, बगीचा विकसित करण्याच्या कामांचा त्यामध्ये समावेश करावा, असे राजेश लाटकर म्हणाले. या विषयावर झालेल्या चर्चेत भूपाल शेटे, परीक्षित पन्हाळकर यांनीही भाग घेतला.४५ कोटी गाळावर खर्च करणार?राष्ट्रीय तलाव संवर्धन अंतर्गत कामे करायची असल्याने तेथे प्राधान्याने तलावाचे संवर्धन करण्याची कामे करणार आहोत. फक्त दहा टक्के कामे ही बांधकामाशी संबंधित असतील. २२ कोटींचा एसटीपी बांधणे, ४५ कोटी खर्चून तलावातील गाळ काढणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत, असा खुलासा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केला.