शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बोगस एनओसी देणारी टोळी

By admin | Updated: September 25, 2015 00:23 IST

निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप : चौकशी करून कारवाईची मागणी

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या विकासकामांना लागणारी महानगरपालिकेची बोगस ‘एनओसी’ देणारी एक टोळी कार्यरत असून, त्यामुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावरील निधी मनपाच्या संमतीविना खासगी जागेत खर्च झाल्याचा आरोप महानगरपालिकेच्या सभेत गुरुवारी झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित टोळीचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. राज्य अथवा केंद्र सरकारच्या योजनांतून मिळालेल्या निधीतून शहरात विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतात. त्यासाठी कोणती कामे करावीत, निधीचा योग्य वापर व्हावा या हेतूने त्या कामासाठी मनपा प्रशासनाची ‘एनओसी’घेतली जाते; परंतु गेल्या दहा वर्षांत अनेक कामांसाठी अशी ‘एनओसी’ न देताच कामे झाली आहेत; परंतु या कामांसाठी बोगस एनओसी दिली आहे. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. बांधकाम विभागातील एक टोळीच अशी बोगस एनओसी देत आहे. अधिकाऱ्यांच्या सह्णा बोगस आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी प्रा.जयंत पाटील यांनी केली. हा एक नवीन घोटाळा असल्याने त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी निशिकांत मेथे यांनी केली तर संबंधितांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न आदिल फरास यांनी विचारला.रंकाळ्याचा डीपीआरव्यवस्थित करावा राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलावाचा १२७ कोटींचा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा ठराव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी या विषयावर झालेल्या चर्चेत तलावाचा डीपीआर चुकीचा झाला असून, तो कार्यालयात बसून तयार केल्याचा आक्षेप घेण्यात आला. परिसरात नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पार्किंगची सोय व्हावी, एक चांगले पर्यटनकेंद्र व्हावे यादृष्टीने विकास करावा, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. जॉगिंग व सायकलिंग, पदपथ, करमणुकीची साधने, बगीचा विकसित करण्याच्या कामांचा त्यामध्ये समावेश करावा, असे राजेश लाटकर म्हणाले. या विषयावर झालेल्या चर्चेत भूपाल शेटे, परीक्षित पन्हाळकर यांनीही भाग घेतला.४५ कोटी गाळावर खर्च करणार?राष्ट्रीय तलाव संवर्धन अंतर्गत कामे करायची असल्याने तेथे प्राधान्याने तलावाचे संवर्धन करण्याची कामे करणार आहोत. फक्त दहा टक्के कामे ही बांधकामाशी संबंधित असतील. २२ कोटींचा एसटीपी बांधणे, ४५ कोटी खर्चून तलावातील गाळ काढणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत, असा खुलासा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केला.