शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बोगस लाभार्थी शोधमोहीम सोमवारपासून

By admin | Updated: December 10, 2014 23:53 IST

शासकीय योजना : लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार; मोहीम १५ जानेवारीपर्यंत चालणार

कोल्हापूर : शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सोमवार (दि. १५)पासून ही मोहीम सुरू होईल. ही मोहीम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. ही मोहीम राबवण्यामागचा उद्देश म्हणजे बोगस लाभार्थी शोधून कारवाई करणे व पात्र लाभार्थ्यास लाभ देणे, हा आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, अशा काही योजना आहेत. या योजनांची तलाठ्यांतर्फे अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थी निवडीसाठी समिती असते, परंतु अपात्र असला तरी कागदोपत्री पात्र ठरवून या योजनेत ‘घुसडण्या’चा प्रयत्न होतो. यामुळे काहीजण अपात्र असूनही लाभ घेत असतात. पात्र मात्र लाभापासून वंचित राहतात. यामुळे शासनानेच अपात्र लाभार्थी शोधून काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याप्रमाणे शोधमोहिमेचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०१५ अखेर तलाठी आपल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी घेऊन पहिल्यांदा गावसभेत वाचन करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन पडताळणी होणार आहे. या मोहिमेत अपात्र लाभार्थ्यापर्यंत यंत्रणा पोहोचू नये, यासाठी राजकीय हस्तक्षेप होणार, हे गृहीत धरूनच प्रशासनाने तयारी केली आहे. यावेळी कटाक्षाने बोगस लाभार्थी शोधावेत, अशा सूचना बैठकीत तलाठ्यांना दिल्या आहेत. सध्या पन्हाळा, भुदरगड, राधानगरी तालुक्यांतून बोगस लाभार्थ्यांसंबंधी तक्रारी आल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात अपात्र लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अपात्र लाभार्थी मिळाल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, लाभाची रक्कम वसूल करणे, अशी कारवाई केली जाणार आहे. दोषी आढळल्यास तलाठ्यांवरही प्रशासकीय कारवाई होणार आहे.- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)