शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:00 IST

कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्याप्रमाणेच रक्ताच्या मागणीवरही परिणाम झालेला आहे. सुरुवातीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक रक्तदात्यांनी मागणी नसतानाही ज्या पध्दतीने रक्ताची गरज भागवली, त्यातुलनेत रक्ताची खरी गरज असताना आता रक्ताची मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा रक्ताचा तुटवडाअवघ्या ८00 पिशव्या उपलब्ध, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज

कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्याप्रमाणेच रक्ताच्या मागणीवरही परिणाम झालेला आहे. सुरुवातीच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक रक्तदात्यांनी मागणी नसतानाही ज्या पध्दतीने रक्ताची गरज भागवली, त्यातुलनेत रक्ताची खरी गरज असताना आता रक्ताची मागणी वाढली आहे.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर उद्योगधंदे, वाहतूकीमुळे दैनंदिन रहाटगाडगे पुन्हा सुरु झाले आहे. कोरोना विषाणूचा रुग्ण प्रमाण वाढत असले तरी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नियोजित हदयरोग, कॅन्सर यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियाही होउ लागल्या आहेत. यासाठी तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याने जखमी रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.थॅलेसेमिया, हिमोफिलिया, अ‍ॅनिमिया, गुंतागुंतीच्या प्रसूती या रुग्णांसोबतच पावसाळ्यामुळे उद्भवलेल्या डेंग्यू, चिकुनगुणियासारख्या साथीमुळे रक्त आणि रक्तघटकांची मागणी वाढलेली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एफुण १२ रक्तकेंद्रे असून महिन्याला साधारण सात हजारापर्र्यत तर दिवसाला २00 ते २५0 रक्तपिशव्यांची मागणी आहे. सध्यस्थितीत हा साठा अवघा ८00 पिशव्यांइतका कमी झाला असून त्यामानाने रक्ताची मागणी वाढलेली आहे.रक्त हे ४२ दिवसच टिकून राहते आणि रक्ताच्या प्लेटलेटससारख्या घटकाचे आयुष्यही केवळ पाच दिवसाचेच असते. त्यामुळे यापूर्वी हिरिरीने रक्तदान शिबिरे आयोजित करुन मिळविलेल्या रक्ताचा साठा आता जवळजवळ संपला आहे.

गेल्या तीन महिन्यात लॉकडाउनमुळे उपचाराअभावी रक्ताची मागणी अत्यंत कमी झाली होती आणि रक्तसाठा मात्र अतिरिक्त होता. याउलट आता मागणीच्या मानाने हा साठा अपुरा पडत आहे.महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिर घेणे शक्य होत नाही, याशिवाय मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केल्याने किंवा इतर कारणांनी अशी शिबिरे जवळजवळ बंद झाली आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या पुढाकाराने घेण्यात येणारी शिबिरेही बंद झाल्याने मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.हे पाळावे लागणार...सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा योग्य वापर, एकाच वेळी पाचपेक्षा रक्तदाने न बोलावणे, रक्त देणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासाची तसेच आरोग्याची माहिती घेउन रक्तदान शिबिर घेण्याची गरज आहे.रक्तदात्यांनी या संकेतस्थळावर करावी आॅनलाईन नोंदणीइच्छूक रक्तदात्यांनी 0२३१्-२६४४३३७, व्यक्तिगत रक्तदान करण्यासाठी www.kolhapurcollector.com या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करायवी आहे. गरजेप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि रक्तपेढी यांच्या समन्वयाने अशा रक्तदात्यांना संपर्क साधण्यात येणार आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषद आणि आरोग्य मंत्रालयांनी आखून दिलेल्या नियमांनुसार रक्तदान शिबिरे पुन्हा घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण केलेले रक्तदान अनेकांचे जीव वाचवू शकते.- दीपा शिपुरकर,रक्त संकलन समन्वय अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, कोल्हापूर.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर