शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कर्नाटकाकडे जाणारा ऊस रोखा--जिल्हाधिकाºयांचे पोलिसांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:03 IST

कोल्हापूर : कर्नाटकमधील साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पाठविल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासणार आहे, अशा तक्रारी

ठळक मुद्देऊस कमी पडू नये म्हणून पाऊलकोल्हापूरसह सीमाभागातील शेतकºयांकडून कर्नाटकातील कारखान्यांना ऊस

कोल्हापूर : कर्नाटकमधील साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पाठविल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासणार आहे, अशा तक्रारी आल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी पोलीस प्रशासनाला कोल्हापुरातून कर्नाटकाकडे जाणारा ऊस रोखण्याच्या सूचना दिल्या.

कर्नाटकात ऊस गळीत हंगाम महाराष्टÑापेक्षा लवकर सुरू होतो. त्यामुळे आपली शेतजमीन लवकर मोकळी व्हावी यासाठी कोल्हापूरसह सीमाभागातील शेतकºयांकडून कर्नाटकातील कारखान्यांना ऊस घातला जातो. सध्याही कर्नाटककडे मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. या संदर्भात काही तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे आल्या असून, यामध्ये कर्नाटकला जर ऊस गेला तर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस अपुरा पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आमदार हसन मुश्रीफ तसेच वारणा उद्योग समुहाचे प्रमुख विनय कोरे यांनीही कर्नाटकात जाणारा ऊस रोखण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीतही अन्य राज्यात ऊस पाठविण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांना कर्नाटककडे जाणारी उसाची वाहने आडवा, अशा सूचना दिल्या.ऊसदर बैठकीबाबत...उसदरासंदर्भात साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे अशी बैठक घेण्याचा सध्यातरी प्रश्नच नाही. ऊसदराचा सर्व निर्णय हा शासनस्तरावरील विषय आहे. त्यामुळे भविष्यात ऊस दरासंदर्भात स्थानिक पातळीवर बैठक घेण्याबाबत शासनाकडून काही सूचना आल्यास त्यादृष्टीने विचार केला जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतरच कारखानदार भूमिका स्पष्ट करणारकोल्हापूर : आगामी हंगामातील पहिल्या उचलीबाबत चाचपणी करण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोल्हापुरातील हॉटेलमध्ये सायंकाळी सुमारे तासभर बैठक झाली. त्यामध्ये साखरेचे दर, बँकांची उचल व वाढलेल्या एफआरपीवर प्रामुख्याने चर्चा झाली असली तरी ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतरच भूमिका स्पष्ट करण्यावर एकमत झाल्याचे समजते.

कर्नाटकातील साखर हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्रातील विशेषत: सीमाभागातील कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत असला तरी यंदाही ऊस दराची कोंडी निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी मंत्री विनय कोरे, प्रा.संजय मंडलिक, के. पी. पाटील, राहुल आवाडे, अशोक चराटी, पी. जी. मेढे, आदी या बैठकीस उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी (दि. २८) जयसिंगपूर येथे ऊस परिषद आहे. त्यामध्ये खासदार शेट्टी पहिल्या उचलीची नेमकी किती मागणी करतात हे पाहूनच पुढील भूमिका घ्यावी तोपर्यंत कोणतीच चर्चा, वक्तव्य कुणी करू नये असे ठरल्याचे सांगण्यात आले.तीन संघटना मैदानातयंदा तीन शेतकरी संघटना ऊसदराच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांची मागणी किती असू शकेल, वाढीव एफआरपी, साखरेला मिळत असलेला दर व राज्य बँकेने अद्याप उचलीबाबत निर्णय दिलेला नाही, त्यातच अद्याप परतीचा पाऊस असल्याने हंगाम कसा सुरू करायचा, याबाबत चर्चा झाली.