शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

भाजपचे यश; मोदींची नव्हे समितीची कृपा : जारकीहोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा फायदा मिळाल्याने भारतीय जनता पक्ष विजयी ...

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा फायदा मिळाल्याने भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरेंच्या जादूमुळे आपल्याला विजय मिळाला असे समजू नये. विशेषत: बेळगाव दक्षिण मतदार संघातील बऱ्याच प्रभागांमध्ये समितीचे एकाहून अधिक उमेदवार उभे असल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जी मते समितीला पडली ती मते समितीकडे अद्याप शाबूत आहेत. तेव्हा जर सर्व मतांची बेरीज केली तर भाजपला जी मते पडली, ती समितीची मराठी भाषिकांची मते आहेत. एकंदर महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीने भाजपला तारले आहे.

हा काही लौकिकदृष्ट्या भाजपचा विजय नाही, असे आमदार जारकीहोळी म्हणाले.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, समितीची व्हॉट बँक अद्याप त्यांच्याकडेच आहे. लोकसभा पोटनिवडणुकीतील आपली सर्व मते समितीने अद्याप आपल्याकडे शाबूत ठेवली आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २० उमेदवार विजयी होतील, अशी आमची अपेक्षा होती; परंतु दहाजण पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत आणि अन्य अपक्ष पाच असे एकूण १५ नगरसेवक काँग्रेसने निवडून आणले आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघातील तीन आणि बेळगाव उत्तर मतदार संघातील पाच ठिकाणी आमचा अपेक्षाभंग झाला, अन्यथा काँग्रेसचे २० नगरसेवक महापालिकेवर निवडून आले असते, असेही आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले. मागील महापालिका सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ नगरसेवक होते. मात्र यावेळी फक्त चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ भाजपने वर्चस्व मिळाले मिळविले असले तरी आम्ही मोठे लक्ष्य समोर न ठेवता १५ जागा जिंकल्या आहेत. एकंदर समितीमधील दुहीचा फायदा भाजपला मिळाला आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले.