शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिवसेना संपवण्याचे भाजपचे षङ्यंत्र

By admin | Updated: October 1, 2014 01:05 IST

दिवाकर रावते : बहुजन समाजच भाजपला संपवेल

सांगली/मिरज : देशातील भ्रष्ट काँग्रेस सरकार हटवण्यासाठी तुम्ही, आम्ही सर्व बहुजन समाजाने भाजपला साथ दिली़, पण आता मराठी जनतेची अस्मिता असलेली शिवसेनाच संपवायला भाजप निघाल्यामुळे त्यांना मतदारच मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील, अशी टीका शिवसेना संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी केली़ सांगली, मिरज शहरात रावते यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यावेळी ते बोलत होते़ आमदार संभाजी पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ रावते म्हणाले, शिवसेनेशी युती तोडून भाजपने हिंदुत्वाची नाळ तोडली आहे. मात्र आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नसल्याने हिंदुत्व सोडणार नाही. मोदींना दिल्लीला पाठविण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. राज्यात आम्हाला अर्धा भगवा नव्हे, तर पूर्ण भगवा फडकवायचा आहे. धनशक्ती विरुध्द शिवसेनेची श्रमशक्ती अशा लढाईत शिवसेनेची सरशी होईल़ भाजपला नव्हे, तर मोदींना देशातील भ्रष्ट सरकार उलथून टाकण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली़ पण, सध्या भाजपला महाराष्ट्र बळकावण्याची घाई झाल्याची टीकाही त्यांनी केली़ संभाजी पवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर बहुजन समाजमुक्त भाजप करण्याचा सध्याच्या नेत्यांचा निश्चय दिसत आहे़ यावेळी पृथ्वीराज पवार, नगरसवेक गौतम पवार यांनीही भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका केली़ यावेळी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, शिवराज बोळाज, हरिपूरच्या सरपंच कविता बोंद्रे, अजिंक्य पाटील, तानाजी सातपुते, विकास कोल्हटकर, सुवर्णा मोहिते, आनंद रजपूत, अमोल पाटील, नंदू गौड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक आदी उपस्थित होते. विशाल पवार यांनी स्वागत केली़ (प्रतिनिधी)शहीद भगतसिंगांचे क्रांतिकार्य अतुलनीयरवींद्र मोकाशी : निवारा बांधकाम कामगार संघटनेचा मेळावासांगली : शहीद भगतसिंगांनी देशासाठी केलेले क्रांतिकार्य अतुलनीय असेच होते. त्यांनी व्यक्त केलेले विचार भारतीयांनी समजून त्यावर चिंतन केले पाहिजे, असे मत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोकाशी यांनी व्यक्त केले. निवारा बांधकाम कामगार संघटनेतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.शहीद भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त संघटनेच्या कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोकाशी म्हणाले, भगतसिंग यांनी तरुण वयातच क्रांतिकारक म्हणून कार्यास प्रारंभ केला. स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ सेनानी लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. इंग्रज शासनाने त्यांच्या कार्यकाळात कामगार विरोधी बिल आणले होते. याव्दारे कामगारांना आंदोलन तसेच संप करण्यावर बंदी घालण्यात आली होती. याच्या निषेधार्थ भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये कोणतीही जीवितहानी होणार नाही अशारितीने मोठ्या आवाजाचे बॉम्ब फेकले होते. जेणेकरून कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने इंग्रजांना कामगारांचे म्हणणे ऐकू येईल, असा त्यामागचा उद्देश होता. कित्येक वर्षे इंग्रज सरकार भगतसिंगांना अटक करू शकलेले नव्हते.कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, विजय बचाटे, बाळासाहेब दिवाणजी, सुमन पुजारी, वर्षा गडची, शशिकांत शिंदे, बाळासोा कोल्हे आदींसह जिल्ह्यातील कामगार उपस्थित होते. (प्रतिनिधी)