शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षवाढीसाठी भाजपकडून जोर

By admin | Updated: April 29, 2016 00:51 IST

हातकणंगले तालुका : शिवसेनेला केले सावध, काँग्रेसला पाडले खिंडार

आयुब मुल्ला--खोची --भारतीय जनता पक्षाचा हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानिमित्त पेठवडगाव येथे मेळावा झाला. हा कार्यक्रम स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तो शिवसेनेला सावध करणारा, तर काँग्रेसला धक्का देणारा होता. म्हणजे कार्यक्रमाचे निमित्त पक्षप्रवेशाचे, तर हेतू पक्षवाढीचा असल्याचे स्पष्ट झाले.कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती म्हणजे याला पक्षीय राजकारणाचे अनेक संदर्भ होते. यावेळी डॉ. अशोक चौगुले यांच्यासह तालुक्यातील सुमारे सव्वाशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे परिणाम वडगावपुरते मर्यादित नसणार आहेत, तर ते तालुकाभर परिणाम करणारे आहेत. या कार्यक्रमात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचा सातत्याने उल्लेख झाला. स्थानिक कार्यकर्त्यांनी टीकेऐवजी विकासाची भूमिका मांडली, तर नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाहीही यावेळी नेत्यांनी दिली.वडगावात राजकीय सभा झाली की, त्याचे रंग ग्रामीण भागात उमटतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु, वडगावात यादव आघाडीच्या नेत्या नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या रचनात्मक विकासाची घोडदौड पाहता निवडणुकीत किती फरक पडेल, हा येणारा काळच सांगेल, असे बोलले जाते. नगरपालिकेत अनेक वर्षांपासून यादव घराण्याची सत्ता आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपचे पाठबळ चौगुले यांच्या पाठीशी उभे राहिले आहे, हे खरे आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांची गतीही पाहण्यात जनतेला रस आहे. हा झाला शहरापुरता मर्यादित भाग.परंतु, इथल्या विधानसभा मतदारसंघावरही भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही या निमित्ताने सावधानतेचा इशारा भाजपने दिला आहे. सेना-भाजप युतीमुळेच मिणचेकर यांना आमदारकी मिळणे सोपे झाले होते. आता मात्र ऐक्य न झाले तर मतविभागणीचा सामना करावा लागणार आहे. भाजप येथील कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी ताकद देणार, हे निश्चित आहे. याचा उपयोग पक्षवाढीसाठी होणार आहे. काँग्रेसला तर हा कार्यक्रम धक्का देणारा आहे. सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळच दिले नाही. कार्यकर्ता मोठा झाला, त्याला प्रतिष्ठेचे पद दिले, तर नेता मोठा होतो, पक्ष वाढतो, हा विसरच नेत्यांना पडला. आता तर हे सत्तेतच नाहीत, त्यामुळे या पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. पक्षात गट-तट आहेत, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती) लढविताना कसरत होणार आहे, हे लक्षात आल्याने काहीजण शांत बसूया, असेही बोलत आहेत. मतविभागणी होण्याची शक्यतासेना व भाजपने विधानसभेला स्वतंत्र उमेदवार दिले तर मात्र पूर्वीपासून असणाऱ्या युतीच्या मतांची विभागणी होईल. त्याचा फायदा काँग्रेसला होईल, याचा आनंद काँग्रेसला आहे. तीच स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेत राहिली तरीही काँग्रेसला पोषक वातावरण राहील, असा अंदाज काँग्रेसवाले व्यक्त करीत आहेत. या कार्यक्रमाने पक्षीय राजकारणाची बीजे रोवली आहेत. तसेच सेना आमदारांना सावध करीत काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट भाजपचे कार्यकर्ते मात्र उत्साही झाले आहेत.