शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार अस्थिर करून भाजपला सत्तेत यायचे आहे. वाझे प्रकरणात परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात केला.

वाझे प्रकरणावरून विरोधकांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा सरकार अल्पमतात आले तर राष्ट्रपती राजवट येते. अशी काहीच परिस्थिती नसताना पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही. सुशांतसिंग राजपूत, गोस्वामी आदी प्रकरणात विरोधकांनी हवा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रात सत्ता असली म्हणून कधीही राष्ट्रपती राजवट लावता येत नाही, मग ग्रोधा प्रकरणावेळी काँग्रेसने गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावली असती. काहीतरी कुरापत काढून सरकार अस्थिर करायचे प्रयत्न असून, आज प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली, उद्या रामदास आठवलेही सरकार बरखास्तीची मागणी करतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.