शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लसीबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा जाणीवपूर्वक कमी करून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लसीबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा जाणीवपूर्वक कमी करून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार केंद्राकडे सातत्याने रेमडेसिविरची मागणी करते, मात्र ते इंजेक्शन देत नाहीत, मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना दीव-दमणमध्ये ५० हजार इंजेक्शन कशी मिळतात, यावरून भाजपची प्रामाणिकता दिसून येते. रेमडेसिविर इंजेक्शनअभावी होणाऱ्या मृत्यूस केंद्र सरकारच जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे मुंबईचे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील पाच लोकसुद्धा त्यांना ओळखत नाहीत. अशी मंडळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर टीका करतात, त्यांचा आपण निषेध करतो. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्यावर पूर्णपणे केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हवाई अथवा जल मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. व्हील चेअरवरून प्रचार करणाऱ्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी त्यांनी कंबर कसली आहे. हे कशाचे द्योतक आहे, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जावी आणि राज्य सरकारबद्दल नाराजी वाढावी, असे घाणरडे राजकारण भाजप करत आहे. भाजप काय करायचे ते करू देत आम्ही राज्यातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजू, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

चौकट-

चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू करणार

कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे थांबवावे. भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी सकाळी दहापर्यंत दोन तास द्यायचे. किमान चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा विचार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.