शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची उद्या सर्वपक्षीय पाणी परिषद

By admin | Updated: May 28, 2016 00:48 IST

तमनाकवाडा येथे आयोजन : सुरेश हाळवणकर यांची माहिती; एकनाथ खडसे, चंद्रकांतदादा पाटील, भंडारी यांची उपस्थिती

कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्यातील नागनवाडी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील रखडलेले आठ प्रकल्प मार्गी लावून जिल्ह्यात १० टीएमसी पाणीसाठा वाढविण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. यासाठी उद्या, रविवारी दुपारी १ वाजता तमनाकवाडा (ता. कागल) येथे सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ५ हजार लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी पक्षातर्फे येत्या काळात टप्प्या-टप्प्याने पुढाकार घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आ. हाळवणकर म्हणाले, या परिषदेसाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. कृष्णा खोरे लवादाने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ६६६ टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर केला आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यसाठी ११० टीमसी पाणी अडविण्याचे नियोजन आहे; परंतु १० टीएमसी पाणी विविध कारणांनी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांमुळे अडविलेच गेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागनवाडी, उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कांजिर्णे, झांबरे, सोनुर्ले हे आठ प्रकल्प पूर्ण करणे, ० ते २५० हेक्टर क्षमतेचे लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे असे स्थानिक स्थरावरील लघुसिंचन प्रकल्प पूर्ण करणे, चिकोत्रा समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राज्याच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई (पीएमकेएसआय) योजनेत समाविष्ट करणे हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे. ते म्हणाले, हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास १० टीएमसी पाणी अडविले जाणार असून जिल्ह्यातील ४० हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. ठिबकद्वारे हेच क्षेत्र ८० हजार एकरांपर्यंत वाढविणे शक्य आहे तसे झाल्यास कोल्हापूर हा देशातील सिंचनाच्याबाबत सर्वाधिक अग्रेसर जिल्हा ठरेल तसेच धामणी खोऱ्यातील तीन टीएमसी पाणी केवळ कोल्हापूर शहरासाठी आरक्षित असून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघू शकेल. यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषी व महसूल मंत्री यांच्यासमवेत एक व्यापक बैठक घेऊन प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या आराखड्यात हे प्रकल्प समाविष्ट करून २०२१पर्यंत हा आराखडा मार्गी लावण्याचा निर्धारही या परिषदेत केला जाणार आहे. तमनाकवाडामधील उपसा सिंचन योजना संपूर्ण गावासाठी ठिबकमध्ये रूपांतरीत करून ‘पीएमकेएसआय’चे मॉडेल उभे करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)व्यापक दृष्टीच्या अभावाने महाराष्ट्राचे पाणी आंध्र, कर्नाटकलायापूर्वीच्या नेतृत्वाचा व्यापक दृष्टीचा अभाव व अकार्यक्षमतेमुळे येथील पाणी अडविता आले नाही. परिणामी महाराष्ट्रातील पाणी आंध्र प्रदेश व कर्नाटकला निघाले आहे, असे हाळवणकर यांनी सांगितले..रोष टाळण्यासाठीच मुश्रीफ यांना निमंत्रण नाहीकोल्हापूर : पंधरा वर्षे हातात सत्ता असूनही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांना भाजपतर्फे आयोजित पाणी परिषदेला निमंत्रित केल्यास स्थानिक जनतेचा रोष ओढवेल, म्हणूनच त्यांना निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.उद्या, रविवारी तमनाकवाडा (ता. कागल) येथे भाजपतर्फे आयोजित सर्वपक्षीय पाणी परिषदेला आमदार हसन मुश्रीफ यांना निमंत्रण का दिले नाही? या पत्रकारांच्या प्रश्नावर हाळवणकर यांनी हे उत्तर दिले.हाळवणकर म्हणाले, गेली पंधरा वर्षे त्यांचे राज्य होते. तरीही आमदार मुश्रीफ हे सिंचन प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी याबाबत आमच्यासारखी सकारात्मक भूमिका घेतली असती तर हे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले असते व हा प्रश्न कायमचा मार्गी लागला असता. अशा परिस्थितीत अर्धवट प्रकल्पांमुळे नक्कीच स्थानिक जनतेमध्ये मुश्रीफांप्रती रोष आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रित केल्यास रोष उफाळून येईल. यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल तालुक्यात सिंचनाच्या माध्यमातून केलेली धवलक्रांती व त्यांचे योगदान पाहता, त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला आहे. ते म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून राज्याला एक नवी दिशा मिळेल.