कोल्हापूर : महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकासात्मक बदल करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून, यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी चांगला पर्याय म्हणून ताराराणी आघाडीबरोबर युती केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्याबाबत सध्या तरी विचार नसून शेवटपर्यंत काही सांगता येत नाही, असे सांगत शिवसेनेशी आघाडीबाबत त्यांनी संदिग्धता कायम राखली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, १८ ते २० वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता होती. त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले तर काही अपूर्ण राहिले आहेत. राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता आहे. कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न कायमचे निकालात काढण्यासाठी महापालिकेवर सत्ता असणे गरजेचे आहे. निवडणुकीतील विरोधकांची तयारी पाहता कोणाला तरी सोबत घेऊन एकत्रित सामोरे जाणे गरजेचे होते. आमच्यासमोर असणाऱ्या उपलब्ध पर्यायांपैकी सर्वांत चांगला पर्याय म्हणून आम्ही ताराराणी आघाडीचा निर्णय घेतला आहे. रंकाळा, पंचगंगा सुशोभीकरण व शुद्धिकरण, विमानतळ, शाहू जन्मस्थळ आदी प्रश्न आमच्या अजेंड्यावर असणार आहेत. ‘ताराराणी’ आघाडीचे नेतृत्व स्वरूप महादेवराव महाडिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘ताराराणी’चे उपाध्यक्ष सुहास लटोरे, नगरसेवक सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, सुनील कदम, माजी नगरसेवक सुनील मोदी, महेश जाधव, संदीप देसाई, अशोक देसाई उपस्थित होते.लोकमतचाअंदाज तंतोतंतराज्यात व केंद्रात शिवसेना आमच्या सोबत आहे. प्रत्येक ठिकाणी समीकरणे वेगळी असतात, आता तरी ‘ताराराणी’ आघाडी आमच्याबरोबर आहे. शिवसेनेबाबत सध्या तरी विषय बंद झाला असून, अशा घडामोडी शेवटपर्यंत सुरू असतात. दारे बंद केलेली नाहीत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. ताराराणी आघाडी कोणाची ?आमदार महादेवराव महाडिक यांनी २०१० मध्ये ताराराणी आघाडी विसर्जित करून ते काँग्रेससोबत राहिले. आम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहोत. ताराराणी आघाडी कोणाची आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, अशी अप्रत्यक्ष कबुली सुहास लटोरे यांनी दिली.इलेक्टिव्ह मेरीटच उमेदवाराची आर्थिक ताकद बघून नव्हे, तर इलेक्टिव्ह मेरीटवरच उमेदवारी दिली जाणार आहे. असे असले तरी पोलीस दप्तरी नोंद असलेल्या एकाही गुन्हेगाराला उमेदवारी दिली जाणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.भाजप व ताराराणी आघाडी एकत्र येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने २२ जुलैच्या अंकात दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.
भाजप-ताराराणी आघाडी पक्की !
By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST