शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 13:42 IST

संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.

कोल्हापूर : काही नेत्यांची फसवण्याची परंपरा आहे. पक्ष, संघटनेलाही काही जण फसवत आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत नेत्यांनी फसवणूक केली हे उघड आहे. परंतु काळ बदलला आहे. या जन्मातच सगळे फेडायचे आहे. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीसोबत जाऊनही प्रकाश आवाडे यांचा पराभव झाला. आजऱ्यामध्ये भाजपचेच अशोक चराटी हरले. भाजपच्या आणि जवळीक असणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाडले आहे का? अशी विचारणा केली पाटील यांनी आघाडीतील नेत्यांना हा इशारा दिला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे भाजपच्या विचारांशी जवळीक असलेले होते. परंतु कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला मिळाल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पत्नी जयश्रीताई आणि बंधू संभाजी हे भाजपचेच नगरसेवक होते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जयश्रीताई यांची वेळ घेऊन त्यांना भेटून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती ही पाटील यांनी या‌वेळी दिली.यावेळी पाटील म्हणाले, आम्ही विनंती केल्यानंतरही जर त्यांनी भाजपच्यावतीने निवडणूक लढण्यास नकार दिला तर, मग आमची जी राज्यस्तरीय १३ जणांची कोअर कमिटी आहे ही याबाबतचा निर्णय घेईल.मंडलिक काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतजिल्हा बॅंकेत विनय कोरे, अमल महाडिक, विजय माने असे तिघे जण आहेत. त्यामुळे संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटील