शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

राष्ट्रवादीची मदत भाजपलाच

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

विश्वजित कदम : चार मतदारसंघात ‘सेटलमेंट’चा आरोप

सांगली : सांगली जिल्ह्यासह राज्यातील निकाल हे कॉँग्रेसच्या दृष्टीने निराशाजनक लागले आहेत. जिल्ह्यातील पलूस-कडेगाव, जत, सांगली आणि मिरज या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांची सेटलमेंट असल्यामुळेच राष्ट्रवादीने भाजपला उघडपणे मदत केली असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज (रविवारी) सांगलीत पत्रकार परिषदेत केला.विधानसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने राज्यात सरकार बनविण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, हे कशाचे लक्षण आहे, असा प्रश्न उपस्थित करुन विश्वजित कदम म्हणाले की, यामुळे राष्ट्रवादीच्या विचारधारेवर शंका निर्माण झाली आहे. पाठिंबा देण्यामागे केवळ त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, हाच हेतू असण्याची शक्यता आहे. वास्तविक कॉँग्रेसने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले होते. परंतु आम्ही लोकांशी सुसंवाद साधण्यास कमी पडलो. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांसह सर्वच कॉँग्रेस नेत्यांनी प्रथमपासूनच आक्रमकपणे भाषणे करायला हवी होती. हे झाले नाही. याउलट भाजपने लोकसभेप्रमाणेच मार्केटिंग तंत्राचा प्रभावीपणे वापर केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांमुळेच भाजपला राज्यात यश मिळाले आहे. भाजपचे यश केवळ मोदी यांचेच आहे.ते म्हणाले की, या निकालामुळे अद्यापही मोदींचा शहरी आणि ग्रामीण मतदारांवर प्रभाव होत असल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळात स्थानिक स्वराज संस्थांसह अन्य निवडणुका होत आहेत. त्यामध्ये मतविभागणी टाळायची असेल, तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील निकालावर मी निराश असून, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाऊंचा पराभव धक्कादायकसांगली मतदारसंघात मदनभाऊ पाटील यांचा झालेला पराभव हा धक्कादायक आहे. महापालिका कारभारावर त्यांचे योग्य नियंत्रण असायला हवे होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला केलेली मदत, एलबीटीचा प्रश्न, धनगर समाजाची विखुरलेली मते आणि प्रस्थापित सरकारविरोधात असलेली लाट याचा फटका त्यांना बसला असल्याचे दिसत आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.