सावरवाडी : केंद्रातील भाजप सरकार हे धनिकांचे बटीक आहेत. या सरकारने कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या विरोधी धोरणे राबविले आहेत. जनतेच्या न्याय मागण्यांबाबत ग्रामीण भागातील पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेला संघटित करून लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल कमिटी सदस्य व कुंभी - कासारीचे माजी अध्यक्ष कॉ. नामदेवराव गावडे यांनी केले.सावरवाडी (ता. करवीर) येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष करवीर तालुकातर्फे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष परिषदेत ते बोलत होते. साखर कारखान्यांना ऊसदर देणे कठीण बनले असल्याचे सांगून कॉ. गावडे म्हणाले, साखर कारखान्यांच्या खासगीकरणाने ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते मारुतराव निकम म्हणाले, कष्टकरी वर्गाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतीमालाल रास्त भाव मिळत नाही. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर लढे उभारणे आवश्यक आहे. परिषदेमध्ये वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा. केंद्राच्या भू-संपादन कायद्याला विरोध करणे, करवीर तालुक्यात रोजगार हमी योजना त्वरित सुरू करावी, अन्नधान्य योजना पूर्ववत सुरू करावी, आदी ठराव करण्यात आले.यावेळी कॉ. नामदेव पाटील (हसूरकर), कॉ. कृष्णात जाधव, सर्जेराव पाटील, शिवाजी तळेकर, वाय. एन. पाटील, शिवाजी पाटील, अण्णा पाटील, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)
भाजप सरकार धनिकांचे बटीक
By admin | Updated: January 23, 2015 00:46 IST