शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही_ असादुद्दीन ओवैसी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:57 IST

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.

ठळक मुद्देजेडीएसला मतदान करण्याचे आवाहन

बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.काँग्रेस-भाजपला विसरा आणि जेडीएसला मत द्या, असा नारा त्यांनी दिला. बेळगावात भगवा फेटा परिधान करून त्यांनी भाषण दिले. सीपीएड् मैदान येथे सभा झाली.

बेळगाव उत्तरमधील उमेदवार अशफाक मडकी, शिवनगौडा पाटील या जनता दल (स.) उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. मी अनेक दिवसांपासून बेळगावला यायचा विचार करीत होतो; पण कर्नाटकातील काँग्रेस सरकार आडकाटी घालण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे हे शक्य होत नव्हते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मला बेळगावला येण्यापासून कायम रोखत होते; पण मी आता बेळगावला येतच राहणार. मला आता रोखणे काँग्रेसला शक्य होणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले.

राहुल गांधी म्हणत होते, संसदेत १५ मिनिटे बोलायला संधी द्या. आता त्याच राहुल गांधींना मी विचारतो की, मला बेळगावला येण्यास का रोखत होता. मोदी आणि राहुल गांधी यांनी माझ्याबरोबर खुल्या चर्चेला यावे. फक्त पाच मिनिटे चर्चा करा, असे खुले आव्हान मी देतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ओवैसी कर्नाटकात मत विभाजन करायला आले आहेत, असे लोक म्हणत आहेत. मुस्लिम, दलित सर्वसामान्य वर्गाच्या राजकीय सबलीकरणासाठी काँग्रेस, भाजप बाधा घालत आहेत.

मी कोणत्याही जाती-धर्माच्या बाजूने नाही. माझे आंदोलन प्रत्येकाला घटनेने दिलेले अधिकार मिळावेत यासाठी आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस गुन्हे आणि संशयास्पद मृत्यू वाढताहेत. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली आहे. मोदींना गुजरातला परत पाठविण्याचे धाडस फक्त प्रादेशिक पक्षातच आहे.आझाद यांचा ओवैसींवर पलटवारबेळगाव : असादुद्दीन ओवैेसी हे कोणत्या दुकानदारातून जन्माला आले आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाबनबी आझाद यांनी ओवैेसी यांच्यावर पलटवार केला आहे. मंगळवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप राष्ट्रीयत्वाचे तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची दुकानदारी चालविली असल्याची टीका ओवैेसी यांनी केली होती. निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. संसदेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी बाहेर काँग्रेस विरोधी वक्तव्ये करीत आहेत. असे ते म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८