शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

जातीयवाद मोठा दहशतवाद

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

जयंत भालेराव : सेक्युलर मुव्हमेंटचा जाहीर मेळावा

कोल्हापूर : अतिरेक्यांपेक्षा सद्य:स्थितीत जातीयवादी दहशतवाद मोठा वाटत आहे; कारण अतिरेकी एका गोळीत समोरच्याला ठार करतो, तर जातीयवादी हे माणसाचे तुकडे-तुकडे करून त्याला निर्घृणपणे ठार मारतात. त्यामुळे हा आतंकवाद मोठा आहे, असे प्रतिपादन सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सेक्युलर मुव्हमेंट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र जाहीर मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.जयंत भालेराव यांच्या भाषणाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी भालेराव म्हणाले, धार्मिक विषमतेविरुद्ध कोणी आवाज उठवील त्याला संपविणे ही व्यवस्था चुकीची आहे. जातीयवादी दहशतवादाने आपली निर्घृणता खैरलांजी, अहमदनगर जिल्ह्यांतील दलितांना ठार मारून दाखविली आहे. याविरुद्ध आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करण्याला राज्य सरकार हे नक्षलवादाचे समर्थन करण्याची भाषा बोलत आहेत; परंतु आम्ही बौद्ध धम्माचे लोक असून, अहिंसेच्या विचाराने आमची वाटचाल सुरू आहे.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा अन्वयार्थ लावणाऱ्या राजा ढाले यांचे विचार, डॉ. प्रकाश आंबेडकरांचे राजकारणातील व्हिजन व आजच्या तरुण पिढीचा विचार घेऊन ‘सेक्युलर मुव्हमेंट’चे काम सुरू आहे. ‘सर्वच धर्मांतील लोक गुलाम’ ही गुलामगिरी नष्ट करण्याचे काम ही संघटना करील. सध्या चळवळीबद्दलचा गैरसमज वाढत चालला आहे. चळवळींवर बोलणाऱ्यांची व पुस्तके लिहिणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. हे लोक प्रत्यक्ष सहभागी झाल्यास क्रांती जरा लवकर होईल. स्वागताध्यक्षा अवंती कवाळे यांचे भाषण झाले. अ‍ॅड. जी. लासुरे, प्रा. डॉ. भरत नाईक, कैलास काळे, संग्राम सावंत, प्रसेनजित बनसोडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिपब्लिकन गटांचीविकृती नेस्तनाबूत करूसर्व रिपब्लिकन संघटना हतबल झाल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी व गलितगात्र समाजाला प्रेरणा देण्यासाठी संघटनेचे काम मोलाचे राहील. संघटनेने रिपब्लिकनांना स्वीकारले आहे; परंतु त्यांच्या गटातटांची विकृती स्वीकारलेली नाही. ती आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा भालेराव यांनी यावेळी दिला.निषेध मोर्चाअहमदनगर येथील दलित हत्याकांडासह अन्यत्र होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ सेक्युलर मुव्हमेंटतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक, सीपीआर रुग्णालय चौकमार्गे तो शाहू स्मारक भवन येथे नेण्यात आला.बीजेपी हे ‘आरएसएस’चे व्याज‘आरएसएस’च्या मुद्दलाचे बीजेपी हे व्याज आहे. त्या व्याजावरच केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार निवडून आले आहे. तसेच कुठल्याही मंदिराचे उद्घाटन कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक करतात; परंतु त्यानंतर हे मंदिर म्हणजे भाजपचे कार्यालय तयार होते, असा टोला हाणत गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘प्रार्थनास्थळातील पुजारी ते बाहेरील भिकारी हटवा’ ही संघटनेची भूमिका राहणार असल्याचे सांगितले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या जाहीर मेळाव्यात मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) बोलत होते. शेजारी प्रा. एस. यु. सरतापे, अ‍ॅड. जी. लासुरे, प्रसेनजित बनसोडे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. भरत नाईक, अवंती कवाळे, कैलास काळे, संग्राम सावंत उपस्थित होते.