शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जातीयवाद मोठा दहशतवाद

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

जयंत भालेराव : सेक्युलर मुव्हमेंटचा जाहीर मेळावा

कोल्हापूर : अतिरेक्यांपेक्षा सद्य:स्थितीत जातीयवादी दहशतवाद मोठा वाटत आहे; कारण अतिरेकी एका गोळीत समोरच्याला ठार करतो, तर जातीयवादी हे माणसाचे तुकडे-तुकडे करून त्याला निर्घृणपणे ठार मारतात. त्यामुळे हा आतंकवाद मोठा आहे, असे प्रतिपादन सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सेक्युलर मुव्हमेंट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र जाहीर मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.जयंत भालेराव यांच्या भाषणाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी भालेराव म्हणाले, धार्मिक विषमतेविरुद्ध कोणी आवाज उठवील त्याला संपविणे ही व्यवस्था चुकीची आहे. जातीयवादी दहशतवादाने आपली निर्घृणता खैरलांजी, अहमदनगर जिल्ह्यांतील दलितांना ठार मारून दाखविली आहे. याविरुद्ध आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करण्याला राज्य सरकार हे नक्षलवादाचे समर्थन करण्याची भाषा बोलत आहेत; परंतु आम्ही बौद्ध धम्माचे लोक असून, अहिंसेच्या विचाराने आमची वाटचाल सुरू आहे.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा अन्वयार्थ लावणाऱ्या राजा ढाले यांचे विचार, डॉ. प्रकाश आंबेडकरांचे राजकारणातील व्हिजन व आजच्या तरुण पिढीचा विचार घेऊन ‘सेक्युलर मुव्हमेंट’चे काम सुरू आहे. ‘सर्वच धर्मांतील लोक गुलाम’ ही गुलामगिरी नष्ट करण्याचे काम ही संघटना करील. सध्या चळवळीबद्दलचा गैरसमज वाढत चालला आहे. चळवळींवर बोलणाऱ्यांची व पुस्तके लिहिणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. हे लोक प्रत्यक्ष सहभागी झाल्यास क्रांती जरा लवकर होईल. स्वागताध्यक्षा अवंती कवाळे यांचे भाषण झाले. अ‍ॅड. जी. लासुरे, प्रा. डॉ. भरत नाईक, कैलास काळे, संग्राम सावंत, प्रसेनजित बनसोडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिपब्लिकन गटांचीविकृती नेस्तनाबूत करूसर्व रिपब्लिकन संघटना हतबल झाल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी व गलितगात्र समाजाला प्रेरणा देण्यासाठी संघटनेचे काम मोलाचे राहील. संघटनेने रिपब्लिकनांना स्वीकारले आहे; परंतु त्यांच्या गटातटांची विकृती स्वीकारलेली नाही. ती आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा भालेराव यांनी यावेळी दिला.निषेध मोर्चाअहमदनगर येथील दलित हत्याकांडासह अन्यत्र होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ सेक्युलर मुव्हमेंटतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक, सीपीआर रुग्णालय चौकमार्गे तो शाहू स्मारक भवन येथे नेण्यात आला.बीजेपी हे ‘आरएसएस’चे व्याज‘आरएसएस’च्या मुद्दलाचे बीजेपी हे व्याज आहे. त्या व्याजावरच केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार निवडून आले आहे. तसेच कुठल्याही मंदिराचे उद्घाटन कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक करतात; परंतु त्यानंतर हे मंदिर म्हणजे भाजपचे कार्यालय तयार होते, असा टोला हाणत गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘प्रार्थनास्थळातील पुजारी ते बाहेरील भिकारी हटवा’ ही संघटनेची भूमिका राहणार असल्याचे सांगितले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या जाहीर मेळाव्यात मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) बोलत होते. शेजारी प्रा. एस. यु. सरतापे, अ‍ॅड. जी. लासुरे, प्रसेनजित बनसोडे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. भरत नाईक, अवंती कवाळे, कैलास काळे, संग्राम सावंत उपस्थित होते.