शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद मोठा दहशतवाद

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

जयंत भालेराव : सेक्युलर मुव्हमेंटचा जाहीर मेळावा

कोल्हापूर : अतिरेक्यांपेक्षा सद्य:स्थितीत जातीयवादी दहशतवाद मोठा वाटत आहे; कारण अतिरेकी एका गोळीत समोरच्याला ठार करतो, तर जातीयवादी हे माणसाचे तुकडे-तुकडे करून त्याला निर्घृणपणे ठार मारतात. त्यामुळे हा आतंकवाद मोठा आहे, असे प्रतिपादन सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सेक्युलर मुव्हमेंट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र जाहीर मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.जयंत भालेराव यांच्या भाषणाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी भालेराव म्हणाले, धार्मिक विषमतेविरुद्ध कोणी आवाज उठवील त्याला संपविणे ही व्यवस्था चुकीची आहे. जातीयवादी दहशतवादाने आपली निर्घृणता खैरलांजी, अहमदनगर जिल्ह्यांतील दलितांना ठार मारून दाखविली आहे. याविरुद्ध आक्रोश करून आपल्या भावना व्यक्त करण्याला राज्य सरकार हे नक्षलवादाचे समर्थन करण्याची भाषा बोलत आहेत; परंतु आम्ही बौद्ध धम्माचे लोक असून, अहिंसेच्या विचाराने आमची वाटचाल सुरू आहे.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा अन्वयार्थ लावणाऱ्या राजा ढाले यांचे विचार, डॉ. प्रकाश आंबेडकरांचे राजकारणातील व्हिजन व आजच्या तरुण पिढीचा विचार घेऊन ‘सेक्युलर मुव्हमेंट’चे काम सुरू आहे. ‘सर्वच धर्मांतील लोक गुलाम’ ही गुलामगिरी नष्ट करण्याचे काम ही संघटना करील. सध्या चळवळीबद्दलचा गैरसमज वाढत चालला आहे. चळवळींवर बोलणाऱ्यांची व पुस्तके लिहिणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. हे लोक प्रत्यक्ष सहभागी झाल्यास क्रांती जरा लवकर होईल. स्वागताध्यक्षा अवंती कवाळे यांचे भाषण झाले. अ‍ॅड. जी. लासुरे, प्रा. डॉ. भरत नाईक, कैलास काळे, संग्राम सावंत, प्रसेनजित बनसोडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिपब्लिकन गटांचीविकृती नेस्तनाबूत करूसर्व रिपब्लिकन संघटना हतबल झाल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी व गलितगात्र समाजाला प्रेरणा देण्यासाठी संघटनेचे काम मोलाचे राहील. संघटनेने रिपब्लिकनांना स्वीकारले आहे; परंतु त्यांच्या गटातटांची विकृती स्वीकारलेली नाही. ती आम्ही नेस्तनाबूत करू, असा इशारा भालेराव यांनी यावेळी दिला.निषेध मोर्चाअहमदनगर येथील दलित हत्याकांडासह अन्यत्र होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ सेक्युलर मुव्हमेंटतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक, सीपीआर रुग्णालय चौकमार्गे तो शाहू स्मारक भवन येथे नेण्यात आला.बीजेपी हे ‘आरएसएस’चे व्याज‘आरएसएस’च्या मुद्दलाचे बीजेपी हे व्याज आहे. त्या व्याजावरच केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार निवडून आले आहे. तसेच कुठल्याही मंदिराचे उद्घाटन कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे लोक करतात; परंतु त्यानंतर हे मंदिर म्हणजे भाजपचे कार्यालय तयार होते, असा टोला हाणत गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘प्रार्थनास्थळातील पुजारी ते बाहेरील भिकारी हटवा’ ही संघटनेची भूमिका राहणार असल्याचे सांगितले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या जाहीर मेळाव्यात मुख्य संघटक जयंत भालेराव (नाशिक) बोलत होते. शेजारी प्रा. एस. यु. सरतापे, अ‍ॅड. जी. लासुरे, प्रसेनजित बनसोडे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. भरत नाईक, अवंती कवाळे, कैलास काळे, संग्राम सावंत उपस्थित होते.