शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

‘बिद्री’ त राष्टÑवादी-भाजप एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:35 IST

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजपला सहा जागा, स्थानिक कॉँग्रेस आघाडीसोबतचशेतकºयांच्या हितासाठीच राजकारण बाजूला : हाळवणकरपॅनेलची घोषणा २५ सप्टेंबरला मुरगूडकर घरातील पेच व्यवस्थीत सोडवू‘बिद्री’त खरी लोकशाही!

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या निवडणूकीत एकत्र येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत तीन-चार बैठका झाल्या, चर्चेअंती सहा जागा देण्यावर एकमत झाले. आता भाजपमध्ये गेलेली मंडळी कधी ना कधी आमच्या पॅनेलमध्ये होतीच. गेले वेळेला राजे विक्रमसिंह घाटगे, प्रवीणसिंह पाटील, विजयसिंह मोरे तर बजरंग देसाईही एकवेळ आमच्यासोबत होते, आता भाजपचे लेबल लावून सोबत आहेत, एवढाच फरक आहे.

जिल्ह्यातील सर्वात सक्षम ‘बिद्री’साखर कारखाना असून वाढीव सभासदांच्या गुंत्यामुळेच निवडणूक वेळेवर न झाल्यानेच प्रशासक आले. आता आम्ही निवडणूक ताकदीने लढवून जिंकणारच असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पारदर्शक कारभार करत सक्षम आर्थिक स्थिती व कर्जमुक्त कारखाना केवळ के. पी. पाटील यांच्या मुळेच झाला. त्यामुळेच राजकारण व तत्वप्रणाली बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी आम्ही एकत्र आल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.

स्वतंत्र लढण्याबाबत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पण साखर कारखान्याचे राजकारण हे सभासदांच्या संख्येवर असते. आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर तेरा-चौदा हजार मतापर्यंत गेलो असतो. असेही त्यांनी सांगितले.

कारखान्याचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, तेरा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पारदर्शक व काटकसरीचा कारभार केल्यानेच कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली. आगामी काळात इथेनॉल , डिस्टीलरी प्रकल्पांची उभारणी करणार असून ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजन करणार आहे.

कारखान्याची गाळप क्षमता पाच हजारावरून साडे सात हजार टन करणार असून कारखान्याच्या हितासाठी सरकारची मदत गरजेची असते, यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आघाडी केल्याचेही त्यांनी सांगितले. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’ चे संचालक बाबा देसाई, रणजीत पाटील, हिंदूराव शेळके, समरजीतसिंह घाटगे गटाचे यशवंत माने व प्रकाश पाटील उपस्थित होते.विरोधकांत एक वाक्यतेचा अभाव

विरोधी आघाडीने आठ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, पण तिथे नेत्यांची संख्या जास्त असल्याने एक वाक्यता नसल्यानेच दोन जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण राष्टÑवादी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही, कारखान्याची सत्ता केवळ राजकीय अड्डा करण्यासाठीच हवी असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.

स्थानिक कॉँग्रेस आघाडीसोबतच

‘आण्णा तुम्ही कॉँग्रेसचे की....’ अशी विचारणा केली असता. आपण कॉँग्रेस म्हणूनच आलो आहे. भुदरगड तालुक्यातील कॉँग्रेस ही राष्टÑवादी-भाजप आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती माजी आमदार बजरंग देसाई यांनी दिली.

‘बिद्री’त खरी लोकशाही!

शेतकºयांची स्वताचे दागिने विकून कारखान्याचा शेअर्स खरेदी केला आणि सहवीज प्रकल्प उभा राहिला. त्यांना अपात्र ठरविल्याने विरोधकांमध्ये ºहोष आहे. इतर कारखान्याचे सभासद बघितले तर प्र्र्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे आहे, पण ‘बिद्री’ मध्ये ऊस घालणाºया प्रत्येकाला सभासद केले जात असल्याने खरी लोकशाही येथे असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.

पॅनेलची घोषणा २५ सप्टेंबरला

भाजपला सहा जागा मिळाल्या असल्या तरी त्या कोणत्या गटाती घ्यायच्या याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून ठरविल्या जातील. २५ -२६ सप्टेंबरला राष्टÑवादी-भाजप पॅनेलची घोषणा केली जाईल, असे हाळवणकर यांनी सांगितले.

मुरगूडकर घरातील पेच व्यवस्थीत सोडवू

कागल व भुदरगड तालुक्यात एकाच घरात दोन-दोन उमेदवार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर हाळवणकर म्हणाले, रणजीत पाटील व प्रवीणसिंह पाटील-मूरगूडकर यांच्याबाबत विचारत असाल तर हा पेच व्यवस्थीत सोडवू .