शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

भुये, भुयेवाडीतून जाणार चार प्रस्तावित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

कोपार्डे : एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रस्तावित रस्ते भुये, भुयेवाडी या गावांतून जाणार असल्याने येथील शेती, ...

कोपार्डे : एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रस्तावित रस्ते भुये, भुयेवाडी या गावांतून जाणार असल्याने येथील शेती, स्थावर मालमत्ता व नैसर्गिक स्थळांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही गावे प्राधिकरणात असल्याने भविष्यात ही गावे शहरात जाणार आहेत. यामुळे या गावांची ओळख पुसली जाण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

भुये व भुयेवाडी गावातून राज्य मार्ग १९४ हा रस्ता कार्यरत आहे. सध्या प्रस्तावित असलेला रत्नागिरी-नागपूर-राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वे, सुंदर जोतिबा विकास योजनेअंतर्गतचा रस्ता हे चार रस्ते या दोन गावांतूनच जाणार आहेत. प्राधिकरणात ही दोन्ही गावे असल्याने ती भविष्यात शहरात येणार आहेत. यामुळे या गावातील शेती, पशुपालन व्यवसाय अडचणीत येणार आहे.

रस्त्यासाठी भूसंपादनात घरे, नैसर्गिक जलस्त्रोतातील विहिरी, कूपनलिका नष्ट होणार आहेत. शिवाय ओढे, नाले, ओघळ या नैसर्गिक स्त्रोतांची स्थळ पाहणीच केली गेलेली नाही.

वारणा कोडोली ते वाठार असे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन होते. ते बदलून केर्ली, भुयेवाडी, भुये, शिये या दाट लोकवस्ती व कसदार शेती असलेल्या भागातून करण्यात आल्याने या गावच्या शेती व स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान होणार आहे. सुंदर जोतिबा या योजनेतील रस्ताही याच गावातून प्रस्तावित आहे. याशिवाय प्राधिकरणात या दोन्ही गावांचा समावेश असल्याने या गावांची ओळख पुसली जाण्याची भीती भूशास्त्रीय अभ्यासक अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.

कोट : प्रस्तावित महामार्गाच्या रेखांकनात प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, स्थानिक सुपीक शेतीचा जैवअधिवास, जोतिबा डोंगररांगेतून पंचगंगा नदीस मिळणाऱ्या प्रवाहाची जलनिस्सारण प्रणाली, त्यामुळे तयार होणारे पूरप्रणव क्षेत्र तसेच शेकडो हेक्टर बागायती शेतीस उपलब्ध होणारे उपसा व भूजल सिंचन यांना होणारी बाधा याचा कुठेही उल्लेख, अभ्यास अथवा निरीक्षण केल्याचे दिसत नाही.

- प्रा. डॉ. अभिजित पाटील, भूवैज्ञानिक

कोट : शिये ते भूयेवाडी हा भाग भविष्यात होऊ घालणारे नवे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, कोकण रेल्वेमार्ग, प्राधिकरण अंतर्गत होणारे प्रकल्प या सर्वांसाठी या एकाच भागावरती होणारे अन्यायकारक भूसंपादन शासनाच्या विविध विभांगामध्ये समन्वय ठेवल्यास टाळले जाऊ शकते. -

सुभद्रा पाटील, महिला शेतकरी

कोट : महामार्गाच्या अधिसूचनेवरती शेतकरी व ग्रामस्थ यांनी दिलेल्या लेखी हरकतीबाबत पारदर्शकपणे सुनावणी होणे गरजेचे आहे. महामार्गाला विरोध नाही. नियोजनशून्य प्रकल्प व स्थळ पाहणी न करता केलेल्या रेखांकनास विरोध आहे.

आनंदराव पाटील, प्रगतशील शेतकरी. भूयेवाडी.