शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘भोगावती’वर अतिरिक्त सात कोटींचा बोजा पडणार

By admin | Updated: December 5, 2015 00:58 IST

‘जंबो नोकरभरती’चा परिणाम : रोजंदारांनी याद्या फाडल्याने गोंधळ

तानाजी पोवार -- कोल्हापूर -नेत्यांचा आदेश डावलून भोगावती सहकारी साखर कारखान्यात सुमारे ५८० जणांच्या केलेल्या ‘जंबो नोकरभरती’मुळे कारखान्यावर वार्षिक सात कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदान व पगारावर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करणारा राज्यातील ‘भोगावती’ हा एकमेव साखर कारखाना ठरणार आहे. दरम्यान कारखाना चेअरमन धैर्यशील पाटील यांनी विभागप्रमुखांच्याकडे दिलेल्या नोकरभरतीच्या यादीत आपली नावे नसल्याने या याद्या कारखाना कार्यस्थळावरच संतापाने फाडण्याचा प्रकारही तीन विभागांत घडल्याने तणाव निर्माण झाला होता. गत निवडणुकीत राष्ट्रवादी व शेकापने युती करून काँग्रेसच्या हातून कारखान्याची सत्ता काढून घेतली. सत्ता आल्यानंतर नोकरभरतीचा प्रश्न अनेकवेळा चव्हाट्यावर आला; पण त्या-त्यावेळी आर्थिक अडचणी वाढणार असल्याने या प्रश्नाला बगल देण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील हे ‘या नोकरभरतीमुळे किरकोळ बोजा पडणार,’ असे म्हणत आहेत मात्र ३९३ पेक्षा जादा कर्मचारी भरले तर राजीनामा देण्याची धमकी त्यांनी सर्व संचालकांना यापूर्वी दिली होती, मात्र याचाही विसर त्यांना पडला आहे. गुरुवारी या ‘जंबो नोकरभरती’च्या आॅर्डर त्या-त्या विभागप्रमुखांकडे दिल्या होत्या. त्याची माहिती मिळाल्यानंतर कारखान्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपली नावे यादीत आहेत का पाहण्यासाठी आपापल्या विभागप्रमुखांना घेरले. कारखान्यातील उत्पादन, इंजिनिअर्स व स्टोअर्स या तीन विभागांत काम करणाऱ्या अनेक रोजंदारी कर्मचाऱ्यांना या यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी ‘लाखो’ली वाहत या तीन विभागांतील नोकरभरतीच्या याद्याच संतापाने फाडून टाकल्या. दरम्यान, या जंबो नोकरभरतीवरून शुक्रवारी सत्तारूढांचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी अनेक संचालकांना दूरध्वनीवरून कानपिचक्या दिल्या; आपला आजही या नोकरभरतीला विरोध असल्याचे त्यांनी ठामपणे यावेळी सांगितल्याचे समजते. मुश्रीफांचा ‘हंटर’ गायबकाँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादी आणि शेकापने या कारखान्याची सत्ता तब्बल वीस वर्षांनी काढून घेतली. त्यानंतर दि. २७ जून २०११ रोजी कारखाना कार्यस्थळावर विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात, कारखान्याची सत्ता या भोळ्या-भाबड्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून दिली आहे. विश्वासाने दिलेल्या कारभारात गैरकारभार झाल्यास हसन मुश्रीफ हे स्वत: हंटर घेऊन उभारतील व सभासदांना न्याय देतील, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी या विजयी मेळाव्यात केले होते. त्यास उपस्थित सभासदांनी प्रचंड प्रतिसाद दिला; पण तो हंटर आज मुश्रीफ चालविणार का? अशी विचारणाही सभासदांमधून होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिने थकलेकारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कारखान्यातील ७८० कायम कर्मचाऱ्यांचे पगार सुमारे सहा महिने थकले आहेत. याशिवाय मागील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या यादीतील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखविला आहे; तर सुमारे ७०० कर्मचाऱ्यांना गतहंगामातील पगारच अद्याप दिला नसल्याची वस्तुस्थिती आहे.नोकरभरती करणार नसल्याचे साखर सहसंचालकांना पत्रकारखान्यात नोकरभरती करणार नसल्याचे पत्र चेअरमन धैर्यशील पाटील यांच्या लेटरहेडवर कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी दि. १८ नोव्हेंबर २०१५ रोजी साखर सहसंचालक सचिन रावळ यांना दिले आहे तरीही ही नोकरभरती झाली आहे.