शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

‘भोगावती’ बिनविरोधसाठी ‘ए. वाय.’ यांचा पुढाकार

By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST

सर्वांशी चर्चेची तयारी : जिल्हा बँक, विधानसभेच्या राजकारणाची किनार

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी हालचाली गतिमान केल्या असून, काँग्रेससह कारखान्यांशी संबंधित सर्वच घटकांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी केली आहे. ‘भोगावती’ करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथे गेली अनेक वर्षे काँग्रेसविरोधात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना पाहावयास मिळत आहे. गतनिवडणुकीत राष्ट्रवादी व ‘शेकाप’ने एकत्रित येत आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर पक्षांची मदत घेत काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावला होता. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला विरोध करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. वाढीव सभासद, कारखान्याचा कारभार व प्रशासक नियुक्तीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात भोगावती शिक्षण मंडळाच्या वादामुळे दोन्ही काँग्रेसमधील संबंध टोकाला गेले असतानाही साखर उद्योगासमोरील अडचणी, केंद्र व राज्य सरकारचे धोरण पाहता दोन्ही काँग्रेसमधील वाद संपवून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रयत्न ‘ए. वाय.’ यांचा आहे. कारखान्याच्या राजकारणांत दोन्ही काँग्रेसचे ताणलेले संबंध पाहता, बिनविरोध निवडणूक अशक्य वाटत असली, तरी यास जिल्हा बँकेच्या राजकारणाची किनार या घडामोडी आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘ए.वाय.’ यांना राधानगरीतून बिनविरोध करण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे योगदान फार मोठे आहे. करवीरमधून ‘पी.एन.’ यांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेत चंद्रदीप नरके यांची समजूत काढली होती. दोन्ही कॉँग्रेसचे जरी मिटले तरी ‘शेकाप’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत ‘बिनविरोध’साठी अडचणी अधिक असल्या तरी सर्वच नेत्यांनी मनावर घेतले तर अशक्यही नाही. विधानसभेचा अनुभव पाठीशी!काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा फायदा झाला. ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने चंद्रदीप नरके पुन्हा आमदार झाले तर राधानगरीमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने प्रकाश आबीटकर यशस्वी झाले; पण आता दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांना या चुका कळल्याने ‘भोगावती’मध्ये तडजोड करावी, असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या धोरणाने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत संस्था वाचविण्यासाठी सर्व मतभेद विसरून बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, शेकाप, शिवसेनेसह सर्वच घटकांशी चर्चा करून प्रस्ताव देणार आहे. जिल्हा बँक बिनविरोध झाल्याने आपल्यावरील जबाबदारी वाढली असून, जागा किती मिळणार हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ठरलेली असते. ‘गोड’ साखर कारखान्यासाठी पाचशे अर्ज दाखल झाले, हा अनुभव पाठीशी असताना बिनविरोध करतो म्हणणे सोपे नाही; पण कारखान्याच्या हितासाठी तशी परिस्थिती निर्माण झाली तर ‘शेकाप’ त्यात सहभागी होईल. - संपतराव पवार, माजी आमदारगेल्या सहा वर्षांतील कारभार व कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता ‘भोगावती’ ला चांगल्या प्रशासनाची गरज आहे. बिनविरोध अथवा निवडणुकीबाबत सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय बोलणे उचित ठरणार नाही. - उदयसिंह पाटील-कौलवकर, नेते, काँग्रेस