शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘भोगावती’ची निवडणूक अखेर दोन महिने लांबणीवर

By admin | Updated: January 28, 2017 01:13 IST

काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्षालाही ही निवडणूक आता नको होती.

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दोन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री उशिरा राज्य शासनाने घेतला. ही निवडणूक लांबणीवर जाण्यासंदर्भातील वृत्त यापूर्वी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.या संदर्भातील आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे. ही निवडणूक १२ फे ब्रुवारीला होणार होती. राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. भोगावती कारखाना ‘अ’ वर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संस्था असल्याने सार्वजनिक निवडणुकीवेळी ही निवडणूक घेतली जाऊ नये, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सूचविले होते. काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्षालाही ही निवडणूक आता नको होती. त्यामुळे भाजपने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात अग्रह धरला होता. गेल्या आठवड्यात त्यासंबंधी जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली; पण त्या दिवशी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी असा काही आदेश सरकारने काढला नव्हता, असे स्पष्टीकरण केले होते. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातीलसंदिग्धता निर्माण झाली होती. आता ही संदिग्धता सरकारने आदेश काढल्याने दूर झाली आहे. ही निवडणूक आता दोन महिन्यांनंतर घेण्यात येणार असल्याचे शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी रमेश शिंगटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे काँग्रेससह भाजपची राजकीय सोय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक आताच हवी होती; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ‘भोगावती’चे काँग्रेसचे माजी संंचालक विश्वनाथ पाटील यांनी सहकारमंत्र्यांकडे दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाला आहे.