शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:32 IST

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर ...

ठळक मुद्देगारगोटी येथे परिवर्तन यात्रा; खऱ्या हल्लेखोरांना अटक करा

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर भिडेंना क्लीनचीट देऊन दंगलीला एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे, अशी घणाघाती टीका बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.गारगोटी येथे आयोजित परिवर्तन यात्रेच्या समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार तर प्रमुख उपस्थितीत तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे होते.मेश्राम पुढे म्हणाले, या देशात जनावरांची जातनिहाय पशुगणना होते पण ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. ती जातनिहाय जनगणना करून अबकड पद्धतीने संख्येवर आधारित वर्गवारी करून आरक्षण लागू करण्यात यावे. ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान सुरू करावे .प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी गेली चाळीस वर्षे अविरत कष्ट घेणाºया वामन मेश्राम यांनी ही चळवळ निर्णायक टप्प्यावर आणली आहे. याचे सर्वस्वी श्रेय हे मेश्राम यांचे आहे.यावेळी प्रा. बाळकाका देसाई, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात्रेस बिद्रीचे माजी संचालक सुनील कांबळे, राजू काझी, बबन कांबळे, युवराज पाटील, पिंटू गुरव, दयानंद म्हेत्तर, के. के. कांबळे, नामदेव कांबळे, प्रवीण कांबळे, मानसिंग देसाई, सुरेश कांबळे, अमित कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद बोरवडेकर यांनी, तर आभार सदानंद म्हेत्तर यांनी मानले.परिवर्तन रॅलीच्या समारोप समारंभात वामन मेश्राम यांनी संबोधित केले. यावेळी बाळकाका देसाई, अर्जुन कुंभार, सौ. मेश्राम, प्रकाश पाटील, संतोष मेंगाणे, आदी उपस्थित होते.