शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

इचलकरंजीकरांनो सावधान! कोरोना अजून गेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ५० कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दररोज आढळणारे रुग्ण शहरवासीयांच्या चिंतेत भर पाडणारे आहे. प्रशासनाने नियमांमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. मात्र, शहरातून कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी शहरातून कोरोना अद्याप गेलेला नाही, याची खबरदारी घेत वावरले पाहिजे; अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.

शहरात आढळणा-या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. मात्र, नागरिक व प्रशासनास कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, तसेच व्यापा-यांनाही व्यापार करता यावा, यासाठी प्रशासनाने काही प्रमाणात सूट दिली आहे. परंतु नागरिक त्याचा गैरफायदा घेत विनामास्क व विनाकारण फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. शहरातील आठवडी बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या बाजारात नागरिकांची चाचणी केली असता अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.

राज्य शासनाने कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार एकूण पाच टप्पे केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अद्याप चौथ्याच टप्प्यात आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंत्र्यांनी अजून निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीतून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. सध्याच्या घडीला एकूण रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहचली असून, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी काळजी करणारी आहे. तरीही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून अनेकजण बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी असेच बेजबाबदारपणे वागल्यास कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास वस्त्रनगरीस परवडणारे नाही.

चौकट

सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती सुधारत असून, निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. त्याबरोबर इचलकरंजी शहराचाही मृत्यूदर सर्वाधिक आहे. यामुळे शहरावर निर्बंधाची टांगती तलवार कायम आहे.