शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

इचलकरंजीकरांनो सावधान! कोरोना अजून गेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ५० कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दररोज आढळणारे रुग्ण शहरवासीयांच्या चिंतेत भर पाडणारे आहे. प्रशासनाने नियमांमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. मात्र, शहरातून कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी शहरातून कोरोना अद्याप गेलेला नाही, याची खबरदारी घेत वावरले पाहिजे; अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.

शहरात आढळणा-या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. मात्र, नागरिक व प्रशासनास कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, तसेच व्यापा-यांनाही व्यापार करता यावा, यासाठी प्रशासनाने काही प्रमाणात सूट दिली आहे. परंतु नागरिक त्याचा गैरफायदा घेत विनामास्क व विनाकारण फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. शहरातील आठवडी बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या बाजारात नागरिकांची चाचणी केली असता अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.

राज्य शासनाने कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार एकूण पाच टप्पे केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अद्याप चौथ्याच टप्प्यात आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंत्र्यांनी अजून निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीतून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. सध्याच्या घडीला एकूण रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहचली असून, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी काळजी करणारी आहे. तरीही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून अनेकजण बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी असेच बेजबाबदारपणे वागल्यास कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास वस्त्रनगरीस परवडणारे नाही.

चौकट

सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती सुधारत असून, निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. त्याबरोबर इचलकरंजी शहराचाही मृत्यूदर सर्वाधिक आहे. यामुळे शहरावर निर्बंधाची टांगती तलवार कायम आहे.