शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

बेळगाव न्यूज : अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जनतेला अन्नधान्याचे वितरण; ‘त्या’ विधानाबाबत जनतेतून नाराजी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत आम्ही एका व्यक्तीला पाच किलो पौष्टिक धान्य वाटप करीत आहोत. दक्षिणेतील १२ जिल्ह्यांमध्ये ...

बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत आम्ही एका व्यक्तीला पाच किलो पौष्टिक धान्य वाटप करीत आहोत. दक्षिणेतील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो नाचणी, २ किलो तांदूळ आणि ३ किलो मका वितरित केला जाणार आहे; तर उत्तर भागातील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो ज्वारी आणि २ किलो नाचणी वाटप केली जाईल, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. बुधवारी, मंत्री उमेश कत्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना तांदूळ वाटप करताना २ किलो तांदूळ कमी देण्यात यावेत, असे विधान उमेश कत्ती यांनी करताच त्यांच्यावर जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. सोशल साईटवर आणि विरोधी पक्षाने या विधानावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवताच उमेश कत्ती यांनी माफी मागितली.

केंद्र सरकारने अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, दारिद्र्यरेषेखालील लोकांना पाच किलो धान्य आणि त्याचप्रमाणे अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्यांना ३५ किलो अन्नधान्य दिले जाणार आहे. राज्यांच्या प्रोत्साहनासाठी आणि सबलीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आधारभूत किमतीच्या अंतर्गत, नाचणी , मका समर्थन मूल्य योजनेखाली खरेदी करून, राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जनतेला पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. सध्या ज्वारीसाठी २६४० रुपये समर्थन मूल्य देण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी ३५०० ते ४५०० रुपयांची मागणी केली आहे . कृषी आयोगाच्या अहवालात तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्याने मी केंद्र सरकारकडे ज्वारीसाठी ३५०० ते ४५०० आधारभूत मूल्य देण्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एका व्यक्तीला किती अन्नधान्याची आवश्यकता आहे त्यानुसार धान्य वितरणासंबंधी कायदा करण्यात आला आहे. सध्या ५ किलो धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार २ किलो तांदूळ कमी करण्याबाबत आपण वक्तव्य केले असून, या वक्तव्याचा कोणीही विपर्यास करून राजकारण करू नये. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायदा लागू केला आहे. अन्नसुरक्षा कायदा काँग्रेस राजवटीत अस्तित्वात आला असून काँग्रेसचाच कायदा आम्ही पुढे नेत असल्याचे उमेश कत्ती म्हणाले.

उमेश कत्ती यांनी केलेल्या विधानानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. काँग्रेस राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उमेश कत्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, हा सारा प्रकार आणि होणारा विरोध पाहून उमेश कत्ती यांनी साऱ्यांची माफी मागितली. शिवाय डीकेशींना राजीनाम्याबाबत खडे बोल सुनावले. माझा राजीनामा मागणारे डीकेशी आहेत तरी कोण? डीकेशींनी काँग्रेसची शवयात्रा काढावी आणि सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानासमोर ती पुरावी, अशी प्रतिक्रियाही उमेश कत्ती यांनी दिली.