शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:09 IST

कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलातर्फे गेल्या मंगळवारपासून (दि. २७ नोव्हेंबर) चांदोली अभयारण्यातील सात गावांतील प्रकल्पग्रस्तांची नुकसानभरपाईपोटी आठ महिन्यांपासून देय ...

कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलातर्फे गेल्या मंगळवारपासून (दि. २७ नोव्हेंबर) चांदोली अभयारण्यातील सात गावांतील प्रकल्पग्रस्तांची नुकसानभरपाईपोटी आठ महिन्यांपासून देय असलेली ४ कोटी २२ लाखांची रक्कम तीन टप्प्यांत जमा झाली. शेवटच्या टप्प्यात सोमवारी (दि. ३) सर्व रक्कम जमा झाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करून उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.कसबा बावडा रमणमळा येथील वन्यजीव कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. नेते भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवस मोठ्या जिकीरीने आंदोलन झाले. त्याची दखल वनविभागाला घ्यावी लागली.इतके दिवस आंदोलन सुरू आहे, जमीन हस्तांतरणाचे काम रखडले. काही बैलांना चाबकाचे फटकारे मारल्यावरच ते काम करतात, तशीच अवस्था तुमची झाली आहे.शेतकऱ्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारेच मारले पाहिजेत, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी वन विभागाच्या अधिकाºयांना खडसावले. मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन हे मुंबईला असल्याने त्यांच्याशीफोनवर चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, नाही तरगय करणार नाही, अशा भाषेत दम दिला.खासदार शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. वनअधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना कार्यपद्धती सुधारण्याच्या सूचना केल्या.प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्या बैठकचांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्या, गुरुवारी दुपारी चार वाजता कोल्हापुरात बैठक घेऊ, असे मुख्य वन्यसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांनी फोनवरून सांगितले. या बैठकीत चांदोलीतील सात मूळ गावांतील भूसंपादन, पुनर्वसन, गायरान व मुलकी जमीन वाटप, पिण्याचे पाणी यांसह अन्य प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालिका विनिता व्यास, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पाटबंधारे अधीक्षक अभियंता, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत.टस्करचा बंदोबस्त कराशाहूवाडी तालुक्यात टस्कर हत्तीचा धुडगूस सुरू असताना वनविभाग काय करतो? अशी विचारणा वनअधिकारी हणमंत धुमाळ यांना केली. टस्करला हुसकावण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याबरोबरच पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही करा, अशी सूचना केली.तर जानेवारीत पुन्हा आंदोलनजमिनीचे १०० टक्के वाटप, शेतीला आणि प्रकल्पग्रस्तांना पिण्याचे पाणी पुरविले नाही तर जानेवारीत पुन्हा बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटणकर यांनी दिला.अभयारण्यग्रस्तांचे उर्वरित प्रलंबित प्रश्ननागपुरातील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे २४० हेक्टर निर्वनीकरणाचा प्रस्ताव पडून आहे. शेती महामंडळाच्या ८१ हेक्टरांचा प्रस्तावही मंत्रालयात आहे. हातकणंगलेतील १२५ हेक्टर गायरानचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकाºयांकडे आला आहे. याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.