शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:09 IST

कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलातर्फे गेल्या मंगळवारपासून (दि. २७ नोव्हेंबर) चांदोली अभयारण्यातील सात गावांतील प्रकल्पग्रस्तांची नुकसानभरपाईपोटी आठ महिन्यांपासून देय ...

कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलातर्फे गेल्या मंगळवारपासून (दि. २७ नोव्हेंबर) चांदोली अभयारण्यातील सात गावांतील प्रकल्पग्रस्तांची नुकसानभरपाईपोटी आठ महिन्यांपासून देय असलेली ४ कोटी २२ लाखांची रक्कम तीन टप्प्यांत जमा झाली. शेवटच्या टप्प्यात सोमवारी (दि. ३) सर्व रक्कम जमा झाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करून उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.कसबा बावडा रमणमळा येथील वन्यजीव कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. नेते भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवस मोठ्या जिकीरीने आंदोलन झाले. त्याची दखल वनविभागाला घ्यावी लागली.इतके दिवस आंदोलन सुरू आहे, जमीन हस्तांतरणाचे काम रखडले. काही बैलांना चाबकाचे फटकारे मारल्यावरच ते काम करतात, तशीच अवस्था तुमची झाली आहे.शेतकऱ्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारेच मारले पाहिजेत, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी वन विभागाच्या अधिकाºयांना खडसावले. मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन हे मुंबईला असल्याने त्यांच्याशीफोनवर चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, नाही तरगय करणार नाही, अशा भाषेत दम दिला.खासदार शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. वनअधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना कार्यपद्धती सुधारण्याच्या सूचना केल्या.प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्या बैठकचांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उद्या, गुरुवारी दुपारी चार वाजता कोल्हापुरात बैठक घेऊ, असे मुख्य वन्यसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांनी फोनवरून सांगितले. या बैठकीत चांदोलीतील सात मूळ गावांतील भूसंपादन, पुनर्वसन, गायरान व मुलकी जमीन वाटप, पिण्याचे पाणी यांसह अन्य प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालिका विनिता व्यास, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पाटबंधारे अधीक्षक अभियंता, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत.टस्करचा बंदोबस्त कराशाहूवाडी तालुक्यात टस्कर हत्तीचा धुडगूस सुरू असताना वनविभाग काय करतो? अशी विचारणा वनअधिकारी हणमंत धुमाळ यांना केली. टस्करला हुसकावण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याबरोबरच पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही करा, अशी सूचना केली.तर जानेवारीत पुन्हा आंदोलनजमिनीचे १०० टक्के वाटप, शेतीला आणि प्रकल्पग्रस्तांना पिण्याचे पाणी पुरविले नाही तर जानेवारीत पुन्हा बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटणकर यांनी दिला.अभयारण्यग्रस्तांचे उर्वरित प्रलंबित प्रश्ननागपुरातील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे २४० हेक्टर निर्वनीकरणाचा प्रस्ताव पडून आहे. शेती महामंडळाच्या ८१ हेक्टरांचा प्रस्तावही मंत्रालयात आहे. हातकणंगलेतील १२५ हेक्टर गायरानचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकाºयांकडे आला आहे. याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.