शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

बेड्‌स, इंजेक्शन्स मिळत नसताना सकारात्मक कसं राहायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, असे सांगणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र जेव्हा आई, वडिलांना, भाऊ, बहिणीला रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, आजोबांसाठी बेड मिळत नाही, दहा हॉस्पिटलना फोन लावावा लागतो, तेव्हा ही सकारात्मकता कुठून आणायची, असा जळजळीत सवाल कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मृतांची तर संख्या गेले काही दिवस सरासरी २५ च्या पुढेच आहे. एका दिवसात ४१ अशी उच्चांकी मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. गेले वीस ते बावीस दिवस जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत गेली आणि ऑक्सिजन बेड्‌सची कमतरता भासू लागली. त्यामुळे या रुग्णालयातून त्या रुग्णालयाकडे फेऱ्या मारण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी नागरिक अक्षरश: वणवण करत आहेत. कुठून कुठून ओळख काढून इंजेक्शनची मागणी केली जात आहे. डॉक्टर रेमडेसिविर आणा म्हणून सांगतात आणि तेथूनच नातेवाईकांच्या हतबलतेला सुरुवात होते. तीच कहाणी ऑक्सिजनची. ऑक्सिजन कमी असल्याच्या बातम्या वाचून नातेवाईकांचा श्वास गुदमरायची वेळ आली आहे. यातील एकही गोष्ट सर्वसामान्यांच्या हातातील नाही. समाजातील प्रतिष्ठित आणि मान्यवरांनीही हात टेकल्याची परिस्थिती असल्याने सर्वसामान्यांचा तर यात पालापाचोळा झाल्यासारखी स्थिती आहे.

आधी रुग्णालय मिळविण्यासाठी, नंतर ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी, नंतर रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे म्हणून आणि सगळ्यात शेवटी बिलाचा आणि खर्चाचा आकडा... यामुळे मध्यमवर्गीय नागरिकही पिचून गेला आहे.

चौकट

सकारात्मक संदेशांचा पाऊस

कोरोनामुळे हे भयानक चित्र सर्वत्र दिसत असताना, आज दुसऱ्यासाठी रेमडेसिविरबाबत शब्द टाकताना माझ्याच घरातील कोणाला लागलं तर काय करायचं, असा प्रश्न उपस्थित होत असताना, समाजमाध्यमांवर मात्र सकारात्मक राहा, असे ढिगाने मेसेज येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक राहायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.

चौकट

आमदार-खासदार कुठे आहेत..

एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या साडेतीन महिन्यात ४३४ जण मृत्यू पावले असताना, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवरून जे वातावरण तापले आहे, याबद्दलही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्री, खासदार, आमदार सगळेचजण या निवडणुकीत गुंतले आहेत. जरी मंत्री वेगवेगळ्या बैठका घेऊन यंत्रणा कामाला लावत असले तरी, सत्तारूढ आणि विरोधक या सर्वांचेच ‘गोकुळ’ निवडणुकीलाच प्राधान्य असल्याबद्दल ही नाराजी आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हाबंदीचा आदेश मागे घेण्याचा प्रकार यातूनच झाल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.