शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेड्‌स, इंजेक्शन्स मिळत नसताना सकारात्मक कसं राहायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, असे सांगणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र जेव्हा आई, वडिलांना, भाऊ, बहिणीला रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, आजोबांसाठी बेड मिळत नाही, दहा हॉस्पिटलना फोन लावावा लागतो, तेव्हा ही सकारात्मकता कुठून आणायची, असा जळजळीत सवाल कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मृतांची तर संख्या गेले काही दिवस सरासरी २५ च्या पुढेच आहे. एका दिवसात ४१ अशी उच्चांकी मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. गेले वीस ते बावीस दिवस जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत गेली आणि ऑक्सिजन बेड्‌सची कमतरता भासू लागली. त्यामुळे या रुग्णालयातून त्या रुग्णालयाकडे फेऱ्या मारण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी नागरिक अक्षरश: वणवण करत आहेत. कुठून कुठून ओळख काढून इंजेक्शनची मागणी केली जात आहे. डॉक्टर रेमडेसिविर आणा म्हणून सांगतात आणि तेथूनच नातेवाईकांच्या हतबलतेला सुरुवात होते. तीच कहाणी ऑक्सिजनची. ऑक्सिजन कमी असल्याच्या बातम्या वाचून नातेवाईकांचा श्वास गुदमरायची वेळ आली आहे. यातील एकही गोष्ट सर्वसामान्यांच्या हातातील नाही. समाजातील प्रतिष्ठित आणि मान्यवरांनीही हात टेकल्याची परिस्थिती असल्याने सर्वसामान्यांचा तर यात पालापाचोळा झाल्यासारखी स्थिती आहे.

आधी रुग्णालय मिळविण्यासाठी, नंतर ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी, नंतर रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे म्हणून आणि सगळ्यात शेवटी बिलाचा आणि खर्चाचा आकडा... यामुळे मध्यमवर्गीय नागरिकही पिचून गेला आहे.

चौकट

सकारात्मक संदेशांचा पाऊस

कोरोनामुळे हे भयानक चित्र सर्वत्र दिसत असताना, आज दुसऱ्यासाठी रेमडेसिविरबाबत शब्द टाकताना माझ्याच घरातील कोणाला लागलं तर काय करायचं, असा प्रश्न उपस्थित होत असताना, समाजमाध्यमांवर मात्र सकारात्मक राहा, असे ढिगाने मेसेज येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक राहायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.

चौकट

आमदार-खासदार कुठे आहेत..

एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या साडेतीन महिन्यात ४३४ जण मृत्यू पावले असताना, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवरून जे वातावरण तापले आहे, याबद्दलही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्री, खासदार, आमदार सगळेचजण या निवडणुकीत गुंतले आहेत. जरी मंत्री वेगवेगळ्या बैठका घेऊन यंत्रणा कामाला लावत असले तरी, सत्तारूढ आणि विरोधक या सर्वांचेच ‘गोकुळ’ निवडणुकीलाच प्राधान्य असल्याबद्दल ही नाराजी आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हाबंदीचा आदेश मागे घेण्याचा प्रकार यातूनच झाल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.