शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बना : श्रीपाल सबनीस -पलूस येथे २९ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:10 IST

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे,

ठळक मुद्देसाहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे,मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

पलूस येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत शहासने (पुणे) उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नाही, तर जीवनाची उपासना आहे. जीवन बदलून टाकण्यासाठी साहित्य गरजेचे आहे. साहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहासने म्हणाले, ग्रामीण भागात साहित्याची ऊर्जाकेंद्रे आहेत, ती शोधली पाहिजेत. मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची असतात.यावेळी दत्ता मानुगडे, डॉ. अशोक माळी, प्रा. रघुराज मेटकरी, सुनील तोरणे, विजयकुमार कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सर्जेराव नलवडे, आर. पी. सावंत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा. शिवाजी वरूडे व हरिभाऊ पुदाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. संतोष काळे यांनी स्वागत केले, तर वासंती मेरू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी. ए. पाटील, विष्णू सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुहास पुदाले, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, शामराव डाके, वसंत आपटे, सतीश पवार, सोपान डोंगरे, उमा पुदाले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, साहित्यरसिक उपस्थित होते. संतोष काळे व सायली मेरू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संपत पार्लेकर यांनी आभार मानले.कथाकथनाला प्रतिसादसंमेलनाच्या दुसºया सत्रात कथाकथन पार पडले. यावेळी हिम्मत पाटील यांनी ‘माती’ ही विनोदी तितकीच हृदयस्पर्शी कथा सादर करून हास्याचे फवारे आणि अश्रूंच्या धारा यांचा मिलाफ घडवून आणला. त्यानंतर कविसंमेलन पार पडले. कवी धनदत्त बोरगावे अध्यक्षस्थानी होते.पलूस येथील साहित्य संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन केले.