शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पराभव विसरून कामाला लागा : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:53 IST

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे ...

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तरती जखम बरी करून पुन्हाजोमाने कामाला लागायचे असते. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच ढळला असेल, पण मी जर निवडणुकीच्या दु:खाला कवटाळून बसलो असतो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता. यामुळे पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. आंबा येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्ता अभ्यास शिबिर झाले, त्यावेळी ते बोलत होते.स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमीमांसा व विचारमंथन, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व गावगाडा तसेच त्याचे परिणाम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी राजकीय तसेच आंदोलनाची दिशा या विविध विषयांवरती चर्चा झाली.यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश, चळवळीची पुढील दिशा, संघटना, पक्ष, महिला आघाडी व युवा आघाडीची संघनात्मक बांधणी या विषयावर मते मांडली. या शिबिरास जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रात्रीचा दिवस करायावेळी राजू शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकºयांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा.