शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

सहकारातील दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST

शिरोळ : शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा चौफेर सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे श्री दत्त उद्योग ...

शिरोळ : शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा चौफेर सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे श्री दत्त उद्योग समूहाचे आधारस्तंभ व सहकारातील महामेरू माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांचा आज, गुरुवारी (१ एप्रिल रोजी) सहावा स्मृतिदिन होत आहे. त्यांचे विचार आजही जिवंत असून, आठवणीतील सा. रे. पाटील कसे होते यानिमित्ताने घेतलेला आढावा...

.............

सन १९५२ ते १९९० या काळात राजकीय विचार मोठ्या प्रमाणात बदलत गेले. यामध्ये एक सहकार क्षेत्रातील योगदान व राजकीय घडामोडीत आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सा. रे. पाटील यांचे नाव प्रथम पुढे आले होते. समाजवादी विचारसरणीचे आणि कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना सुखाचे चार घास मिळावेत म्हणून गेली सात दशके अखंडपणे काम करणारे माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. राजकारणाला बाजूला ठेवून समाजकारणाला महत्त्व देणारे थोर व्यक्ती स्व. पाटील यांच्या हातून अखंडपणे समाजहिताचेच काम झाले. १९४६ ला जांभळी येथे सा. रे. पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करून जयसिंगपूर-उदगाव बँक व शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या २० संस्था उभ्या करून शेतकऱ्यांना एक नवे साधन उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर विविध देशांतील अवगत तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन कोंडिग्रे येथे फोंड्या माळावर विकसित श्रीवर्धन बायोटेकमध्ये मातीविना शेती विकसित केली. डॉ. सा. रे. पाटील यांनी १९७० ला स्व. खा. दत्ताजीराव कदम यांच्या समवेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सदस्य म्हणून कारखान्याच्या उभारणीस सुरुवात केली. कारखान्याला मंजुरी मिळविण्यापासून ते कारखाना प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी १९८० पासून कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. डॉ. सा. रे. पाटील यांनी सहकार क्षेत्रात अग्रेसर राहून चळवळीबरोबरच तीन वेळा आमदारकी भूषविली. राजकारण, निवडणुकांपेक्षाही त्यांचा मूळचा पिंड हा सेवादलाच्या सामाजिक काम आणि समाजवादी विचारसरणीशी घट्ट राहिला. एखाद्याच्या कामाबद्दलची तळमळ आणि तत्परता, प्रचंड स्मरणशक्ती, विविध क्षेत्रातील घडामोडींचे चालते-बोलते विद्यापीठच ते होते. त्यांच्या अनुभवामुळेच ‘दत्त’चा विकास झाला. त्यामुळेच श्री दत्त कारखान्याला भारत सरकार नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून अनेक उत्कृष्ट पुरस्कार मिळाले. वरील सर्व गोष्टींचा आढावा घेता सा. रे. पाटील यांचा आदर्श तालुक्यात व जिल्ह्यात न राहता राज्याबाहेरही व प्रेरणादायी विचारांची आठवण श्रमिकांसह शेतकऱ्यांसमोर आजही चिरंतर आहे. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र गणपतराव पाटील दत्त उद्योग समूहाची धुरा सांभाळत आहेत. शेती व शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी त्यांचा पुढाकार आहे. कॅन्सरमुक्त शिरोळ तालुक्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गो परिक्रमा, सेंद्रिय ऊस शेती, क्षारपडमुक्त जमीन व ठिबक सिंचन या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सा. रे. पाटील यांच्या कामाची प्रेरणा सर्वांनाच सतत मार्गदर्शन करणारी आहे. दीपस्तंभ म्हणून ते निश्चितपणे सर्वांच्या सोबत राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

..............

कोट -

स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी आणि सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. समाजवादाचा विचार जोपासत असतानाच त्यांनी अनेक सहकारी संस्थांची निर्मिती करून शिरोळ तालुका व पंचक्रोशीचा विकास साधला. पद असो वा नसो, नेहमीच ते कार्यमग्न राहिले. कामगार, कार्यकर्ता असा भेदभाव न करता सर्वांशीच ते सलोख्याने वागले, म्हणूनच माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेल्या माणसांचा गोतावळा मोठा होता.

गणपतराव पाटील

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०३-गणपतराव पाटील, ०४-सा. रे. पाटील