शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

वस्त्रनगरी शेतकरी संघटनांची संघर्षभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:48 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले हे शहरच संघर्षभूमी ठरणार, असाच राजकीय व्होरा आहे. म्हणूनच या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.यापूर्वी बहुतांशी वेळा राजकीय क्षेत्रात नव्याने होणाºया आघाडी किंवा युतीचा प्रारंभ करवीरनगरीतून होत असे. मात्र, त्याला ३१ जानेवारी २०१४ ही तारीख अपवाद ठरली. त्यावेळी भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी-राष्टÑीय समाज पक्ष-रिपब्लिकन पार्टी-आठवले गट अशी युतीची पहिली महासभा इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. त्या सभेची धुरा खासदार शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या खांद्यावर होती. तेव्हा सभेत गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, खासदार शेट्टी, महादेव जानकर, आमदार हाळवणकर अशा नेत्यांनी पहिलेच मैदान गाजविले.अशी पार्श्वभूमी असलेल्या इचलकरंजीतच दुसरी शेतकरी संघटना घोषित करणाºया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) होत असल्याने त्याला महत्त्व आहे. खासदार शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजकीय कारकीर्द चालू झाली. त्यानंतर संघटनेचे लोण पश्चिम महाराष्टÑ व त्या पाठोपाठ राज्यात फोफावले. तेव्हा सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ ने संघर्ष केला.सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि आघाडीच्या विरोधात महायुती जन्माला आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘स्वाभिमानी’ चे म्हणून सदाभाऊ खोत कृषी-पणन व फलोत्पादन राज्यमंत्री झाले. केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारप्रमाणेच शेतकºयांच्या प्रश्नाकडे महायुती दुर्लक्ष करीत असल्याचे खासदार शेट्टी यांच्या लक्षात आले आणि कृषी कर्जमाफीच्या वेळी तर सरकार व ‘स्वाभिमानी’तील संघर्षाने टोक गाठले. ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असताना राज्यमंत्री खोत मात्र सरकारच्याच बाजूला राहिले. अखेर ‘स्वाभिमानी’ने खोत यांना संघटनेतून बाजूला केले. त्याचाच परिपाक म्हणजे नवीन शेतकरी संघटनेचा उदय मानला जात आहे. त्याची वाटचाल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.नवीन संघटना भाजपप्रणित ?इचलकरंजीत शनिवारी ( दि. ९ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी सध्याच्या सरकारचे गोडवे गायले होते. ते म्हणाले, पूर्वीच्या आघाडी सरकारने उसासाठी किमान किफायतशीर दर जाहीर करावा, यासाठी आम्हाला रक्त सांडावे लागले. मात्र, सध्याच्या युती सरकारने उसासाठी साखर उताºयावर आधारित किमान दर जाहीर केला आहे. तो ९ टक्के उताºयासाठी २५५० रुपये प्रतिटन ते १२ टक्के उताºयासाठी ३२२० रुपये प्रतिटन इतका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळणार आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री निधीतून शेती सिंचन, अशा अनेक योजनांचाही उल्लेख केला. त्यामुळे खोत यांची नवी शेतकरी संघटना ही भाजपप्रणीत संघटना असणार का, याचीच उत्सुकता आहे.‘स्वाभिमानी’ वर घावघालण्यासाठी इचलकरंजीच बरीशिरोळ हा ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असून, लगतच्या हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’चा कमालीचा प्रभाव आहे. ‘स्वाभिमानी’वर आघात करायचा असेल, तर शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात दुसºया शेतकरी संघटनेला मेळावा घेता येणार नाही. त्यातल्या त्यात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेला तीव्रपणे विरोध होणार; पण शिरोळपासून जवळच असलेले इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे ‘स्वाभिमानी’ काही प्रमाणात ‘वीक’ आहे. म्हणून सुरक्षितता आणि शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मर्मावर घाव घालणारा मेळावा म्हणून इचलकरंजीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.