शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरी शेतकरी संघटनांची संघर्षभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:48 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले हे शहरच संघर्षभूमी ठरणार, असाच राजकीय व्होरा आहे. म्हणूनच या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.यापूर्वी बहुतांशी वेळा राजकीय क्षेत्रात नव्याने होणाºया आघाडी किंवा युतीचा प्रारंभ करवीरनगरीतून होत असे. मात्र, त्याला ३१ जानेवारी २०१४ ही तारीख अपवाद ठरली. त्यावेळी भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी-राष्टÑीय समाज पक्ष-रिपब्लिकन पार्टी-आठवले गट अशी युतीची पहिली महासभा इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. त्या सभेची धुरा खासदार शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या खांद्यावर होती. तेव्हा सभेत गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, खासदार शेट्टी, महादेव जानकर, आमदार हाळवणकर अशा नेत्यांनी पहिलेच मैदान गाजविले.अशी पार्श्वभूमी असलेल्या इचलकरंजीतच दुसरी शेतकरी संघटना घोषित करणाºया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) होत असल्याने त्याला महत्त्व आहे. खासदार शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजकीय कारकीर्द चालू झाली. त्यानंतर संघटनेचे लोण पश्चिम महाराष्टÑ व त्या पाठोपाठ राज्यात फोफावले. तेव्हा सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ ने संघर्ष केला.सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि आघाडीच्या विरोधात महायुती जन्माला आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘स्वाभिमानी’ चे म्हणून सदाभाऊ खोत कृषी-पणन व फलोत्पादन राज्यमंत्री झाले. केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारप्रमाणेच शेतकºयांच्या प्रश्नाकडे महायुती दुर्लक्ष करीत असल्याचे खासदार शेट्टी यांच्या लक्षात आले आणि कृषी कर्जमाफीच्या वेळी तर सरकार व ‘स्वाभिमानी’तील संघर्षाने टोक गाठले. ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असताना राज्यमंत्री खोत मात्र सरकारच्याच बाजूला राहिले. अखेर ‘स्वाभिमानी’ने खोत यांना संघटनेतून बाजूला केले. त्याचाच परिपाक म्हणजे नवीन शेतकरी संघटनेचा उदय मानला जात आहे. त्याची वाटचाल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.नवीन संघटना भाजपप्रणित ?इचलकरंजीत शनिवारी ( दि. ९ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी सध्याच्या सरकारचे गोडवे गायले होते. ते म्हणाले, पूर्वीच्या आघाडी सरकारने उसासाठी किमान किफायतशीर दर जाहीर करावा, यासाठी आम्हाला रक्त सांडावे लागले. मात्र, सध्याच्या युती सरकारने उसासाठी साखर उताºयावर आधारित किमान दर जाहीर केला आहे. तो ९ टक्के उताºयासाठी २५५० रुपये प्रतिटन ते १२ टक्के उताºयासाठी ३२२० रुपये प्रतिटन इतका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळणार आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री निधीतून शेती सिंचन, अशा अनेक योजनांचाही उल्लेख केला. त्यामुळे खोत यांची नवी शेतकरी संघटना ही भाजपप्रणीत संघटना असणार का, याचीच उत्सुकता आहे.‘स्वाभिमानी’ वर घावघालण्यासाठी इचलकरंजीच बरीशिरोळ हा ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असून, लगतच्या हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’चा कमालीचा प्रभाव आहे. ‘स्वाभिमानी’वर आघात करायचा असेल, तर शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात दुसºया शेतकरी संघटनेला मेळावा घेता येणार नाही. त्यातल्या त्यात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेला तीव्रपणे विरोध होणार; पण शिरोळपासून जवळच असलेले इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे ‘स्वाभिमानी’ काही प्रमाणात ‘वीक’ आहे. म्हणून सुरक्षितता आणि शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मर्मावर घाव घालणारा मेळावा म्हणून इचलकरंजीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.