शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरी शेतकरी संघटनांची संघर्षभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:48 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले हे शहरच संघर्षभूमी ठरणार, असाच राजकीय व्होरा आहे. म्हणूनच या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.यापूर्वी बहुतांशी वेळा राजकीय क्षेत्रात नव्याने होणाºया आघाडी किंवा युतीचा प्रारंभ करवीरनगरीतून होत असे. मात्र, त्याला ३१ जानेवारी २०१४ ही तारीख अपवाद ठरली. त्यावेळी भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी-राष्टÑीय समाज पक्ष-रिपब्लिकन पार्टी-आठवले गट अशी युतीची पहिली महासभा इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. त्या सभेची धुरा खासदार शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या खांद्यावर होती. तेव्हा सभेत गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, खासदार शेट्टी, महादेव जानकर, आमदार हाळवणकर अशा नेत्यांनी पहिलेच मैदान गाजविले.अशी पार्श्वभूमी असलेल्या इचलकरंजीतच दुसरी शेतकरी संघटना घोषित करणाºया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) होत असल्याने त्याला महत्त्व आहे. खासदार शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजकीय कारकीर्द चालू झाली. त्यानंतर संघटनेचे लोण पश्चिम महाराष्टÑ व त्या पाठोपाठ राज्यात फोफावले. तेव्हा सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ ने संघर्ष केला.सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि आघाडीच्या विरोधात महायुती जन्माला आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘स्वाभिमानी’ चे म्हणून सदाभाऊ खोत कृषी-पणन व फलोत्पादन राज्यमंत्री झाले. केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारप्रमाणेच शेतकºयांच्या प्रश्नाकडे महायुती दुर्लक्ष करीत असल्याचे खासदार शेट्टी यांच्या लक्षात आले आणि कृषी कर्जमाफीच्या वेळी तर सरकार व ‘स्वाभिमानी’तील संघर्षाने टोक गाठले. ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असताना राज्यमंत्री खोत मात्र सरकारच्याच बाजूला राहिले. अखेर ‘स्वाभिमानी’ने खोत यांना संघटनेतून बाजूला केले. त्याचाच परिपाक म्हणजे नवीन शेतकरी संघटनेचा उदय मानला जात आहे. त्याची वाटचाल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.नवीन संघटना भाजपप्रणित ?इचलकरंजीत शनिवारी ( दि. ९ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी सध्याच्या सरकारचे गोडवे गायले होते. ते म्हणाले, पूर्वीच्या आघाडी सरकारने उसासाठी किमान किफायतशीर दर जाहीर करावा, यासाठी आम्हाला रक्त सांडावे लागले. मात्र, सध्याच्या युती सरकारने उसासाठी साखर उताºयावर आधारित किमान दर जाहीर केला आहे. तो ९ टक्के उताºयासाठी २५५० रुपये प्रतिटन ते १२ टक्के उताºयासाठी ३२२० रुपये प्रतिटन इतका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळणार आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री निधीतून शेती सिंचन, अशा अनेक योजनांचाही उल्लेख केला. त्यामुळे खोत यांची नवी शेतकरी संघटना ही भाजपप्रणीत संघटना असणार का, याचीच उत्सुकता आहे.‘स्वाभिमानी’ वर घावघालण्यासाठी इचलकरंजीच बरीशिरोळ हा ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असून, लगतच्या हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’चा कमालीचा प्रभाव आहे. ‘स्वाभिमानी’वर आघात करायचा असेल, तर शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात दुसºया शेतकरी संघटनेला मेळावा घेता येणार नाही. त्यातल्या त्यात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेला तीव्रपणे विरोध होणार; पण शिरोळपासून जवळच असलेले इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे ‘स्वाभिमानी’ काही प्रमाणात ‘वीक’ आहे. म्हणून सुरक्षितता आणि शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मर्मावर घाव घालणारा मेळावा म्हणून इचलकरंजीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.