शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मुद्द्यांची लढाई आली गुद्द्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:19 IST

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे ...

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, आदी मूलभूत सेवा-सुविधा देणारी स्वायत्त संस्था आहे. तसेच अनेक विकासात्मक व विधायक कामेही नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जातात. पालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक पक्षाचे, भिन्न विचारांचे असले तरी त्यांनी एक विचाराने सेवा-सुविधा पुरवाव्यात आणि विकासकामे करावीत, असा सरळ अर्थ आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणविण्याइतके राजकारण असावे. मात्र, त्याचा अतिरेक नसावा, ही अपेक्षा असते.सन २०१६ मधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे १६, राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राजर्षी शाहू आघाडीचे ११, ताराराणी आघाडीचे १० आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे ७ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी होऊन ती सत्तेवर आली आणि राष्टÑीय कॉँग्रेस व शाहू आघाडी यांची आघाडी विरोधात राहिली.साधारणत: सव्वा वर्षांनंतर नगरपालिकेमध्ये अनेक गंभीर प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यामध्ये वारणा नळ योजना, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलणे, भुयारी गटार योजना, आयजीएम हॉस्पिटल, रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे. या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी किंवा विकासकामांसाठी नगरपालिकेमधील सर्वच पक्ष-आघाड्यांमध्ये चर्चा होऊन सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वयाने हे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र, त्याचा अभाव दिसून येतो.अलीकडे सत्तारूढ आघाडीत अनेक प्रश्न व समस्यांवर मतभेद दिसून येतात. त्यातूनच वादही निर्माण होतात. अशावेळी पक्षनेतृत्वाने याकडे गांभीर्याने पाहून समन्वय साधण्यासाठी नगरसेवक आणि कारभाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये योग्य ती दिशा ठरविणे आवश्यक आहे; पण याचा अभाव असल्यामुळे मंगळवारी (दि. १०) नगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक व नगराध्यक्षांचे स्वीय सहायक यांच्यात मुद्द्यावरून गुद्द्यांची लढाई झाली. ज्यामुळे नगरपालिकेची वाईट प्रतिमा तयार झाली.वर्षातून एकवेळच पक्षनेतृत्वाकडून दखलनगरपालिकेमध्ये असलेल्या सत्तारूढ व विरोधी आघाड्यांमध्ये वर्षातून एकवेळ येणाºया विविध विषय समित्यांच्या वाटपासाठी पक्षनेतृत्वाकडून बैठक घेतली जाते. त्यावेळी घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद मिटविले जातात. त्यानंतर वर्षभर पक्षनेतृत्व नगरपालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्षच करते. यामुळेच आता तत्त्व, वैचारिकता यांची लढाई संपून निव्वळ अर्थकारणापोटी राजकारण करण्याची प्रथा नगरपालिकेमध्ये येऊ लागली आहे. त्याचा दोन्हीकडील पक्षनेतृत्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.