शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुद्द्यांची लढाई आली गुद्द्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:19 IST

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे ...

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, आदी मूलभूत सेवा-सुविधा देणारी स्वायत्त संस्था आहे. तसेच अनेक विकासात्मक व विधायक कामेही नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जातात. पालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक पक्षाचे, भिन्न विचारांचे असले तरी त्यांनी एक विचाराने सेवा-सुविधा पुरवाव्यात आणि विकासकामे करावीत, असा सरळ अर्थ आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणविण्याइतके राजकारण असावे. मात्र, त्याचा अतिरेक नसावा, ही अपेक्षा असते.सन २०१६ मधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे १६, राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राजर्षी शाहू आघाडीचे ११, ताराराणी आघाडीचे १० आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे ७ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी होऊन ती सत्तेवर आली आणि राष्टÑीय कॉँग्रेस व शाहू आघाडी यांची आघाडी विरोधात राहिली.साधारणत: सव्वा वर्षांनंतर नगरपालिकेमध्ये अनेक गंभीर प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यामध्ये वारणा नळ योजना, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलणे, भुयारी गटार योजना, आयजीएम हॉस्पिटल, रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे. या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी किंवा विकासकामांसाठी नगरपालिकेमधील सर्वच पक्ष-आघाड्यांमध्ये चर्चा होऊन सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वयाने हे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र, त्याचा अभाव दिसून येतो.अलीकडे सत्तारूढ आघाडीत अनेक प्रश्न व समस्यांवर मतभेद दिसून येतात. त्यातूनच वादही निर्माण होतात. अशावेळी पक्षनेतृत्वाने याकडे गांभीर्याने पाहून समन्वय साधण्यासाठी नगरसेवक आणि कारभाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये योग्य ती दिशा ठरविणे आवश्यक आहे; पण याचा अभाव असल्यामुळे मंगळवारी (दि. १०) नगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक व नगराध्यक्षांचे स्वीय सहायक यांच्यात मुद्द्यावरून गुद्द्यांची लढाई झाली. ज्यामुळे नगरपालिकेची वाईट प्रतिमा तयार झाली.वर्षातून एकवेळच पक्षनेतृत्वाकडून दखलनगरपालिकेमध्ये असलेल्या सत्तारूढ व विरोधी आघाड्यांमध्ये वर्षातून एकवेळ येणाºया विविध विषय समित्यांच्या वाटपासाठी पक्षनेतृत्वाकडून बैठक घेतली जाते. त्यावेळी घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद मिटविले जातात. त्यानंतर वर्षभर पक्षनेतृत्व नगरपालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्षच करते. यामुळेच आता तत्त्व, वैचारिकता यांची लढाई संपून निव्वळ अर्थकारणापोटी राजकारण करण्याची प्रथा नगरपालिकेमध्ये येऊ लागली आहे. त्याचा दोन्हीकडील पक्षनेतृत्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.