शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुद्द्यांची लढाई आली गुद्द्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:19 IST

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे ...

इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, आदी मूलभूत सेवा-सुविधा देणारी स्वायत्त संस्था आहे. तसेच अनेक विकासात्मक व विधायक कामेही नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जातात. पालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक पक्षाचे, भिन्न विचारांचे असले तरी त्यांनी एक विचाराने सेवा-सुविधा पुरवाव्यात आणि विकासकामे करावीत, असा सरळ अर्थ आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणविण्याइतके राजकारण असावे. मात्र, त्याचा अतिरेक नसावा, ही अपेक्षा असते.सन २०१६ मधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे १६, राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राजर्षी शाहू आघाडीचे ११, ताराराणी आघाडीचे १० आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे ७ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी होऊन ती सत्तेवर आली आणि राष्टÑीय कॉँग्रेस व शाहू आघाडी यांची आघाडी विरोधात राहिली.साधारणत: सव्वा वर्षांनंतर नगरपालिकेमध्ये अनेक गंभीर प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यामध्ये वारणा नळ योजना, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलणे, भुयारी गटार योजना, आयजीएम हॉस्पिटल, रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे. या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी किंवा विकासकामांसाठी नगरपालिकेमधील सर्वच पक्ष-आघाड्यांमध्ये चर्चा होऊन सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वयाने हे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र, त्याचा अभाव दिसून येतो.अलीकडे सत्तारूढ आघाडीत अनेक प्रश्न व समस्यांवर मतभेद दिसून येतात. त्यातूनच वादही निर्माण होतात. अशावेळी पक्षनेतृत्वाने याकडे गांभीर्याने पाहून समन्वय साधण्यासाठी नगरसेवक आणि कारभाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये योग्य ती दिशा ठरविणे आवश्यक आहे; पण याचा अभाव असल्यामुळे मंगळवारी (दि. १०) नगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक व नगराध्यक्षांचे स्वीय सहायक यांच्यात मुद्द्यावरून गुद्द्यांची लढाई झाली. ज्यामुळे नगरपालिकेची वाईट प्रतिमा तयार झाली.वर्षातून एकवेळच पक्षनेतृत्वाकडून दखलनगरपालिकेमध्ये असलेल्या सत्तारूढ व विरोधी आघाड्यांमध्ये वर्षातून एकवेळ येणाºया विविध विषय समित्यांच्या वाटपासाठी पक्षनेतृत्वाकडून बैठक घेतली जाते. त्यावेळी घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद मिटविले जातात. त्यानंतर वर्षभर पक्षनेतृत्व नगरपालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्षच करते. यामुळेच आता तत्त्व, वैचारिकता यांची लढाई संपून निव्वळ अर्थकारणापोटी राजकारण करण्याची प्रथा नगरपालिकेमध्ये येऊ लागली आहे. त्याचा दोन्हीकडील पक्षनेतृत्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.