शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आत्मसन्मानाची लढाई/ गौर हरी दास्तान : स्वकीयांशी युध्द करणारा स्वातंत्रसैनिक

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे

पणजी : विनय पाठक यांचा संयमित अभिनय, रजत कपूर, कोंकणा सेन, रणवीर शौरी, तनिष्ठा चॅटर्जी यांनी दिलेली साथ यातून साकारलेला गौर हरी दास्तांन या हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांच्या चांगल्या अपेक्षा उंचावल्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी आश्चर्य वाटणार इतका तो प्रभावी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे यासाठी कौतुक केलेच पाहिजे. गौर हरी दास्तान ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे. १९७२ मध्ये ओरिसामधील बालासोर या गावातली ही मुले महात्मा गांधी यांच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात भाग घेतात. मुलांसाठीच्या वानर सेनेमध्ये सहभागी झालेला गौर हरी दास हा त्यातलाच एक मुलगा. स्वातंत्रसैनिकांशी संदेशाची देवाण-घेवाण करणे हे त्यांचे काम. शाळेवर फडकणारा युनियन जॅक काढून तिथे तिरंगा ध्वज फडकावणारा गौर हरी दास याला ९0 दिवस कारावासाची शिक्षा मिळते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गौर हरी दास त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह ते मुंबईत रहायला येतात. मुलाला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून कोणतेही प्रमाणपत्र नसते. आपण स्वातंत्र्याची लढाई कोणत्या प्रमाणपत्रासाठी किंवा पेन्शनसाठी केली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मागण्याचा प्रश्नच नाही, असे उत्तर देणाऱ्या गौर हरी दास यांना मुलाच्या भविष्यासाठी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करतात. पण त्यांना नोकरशाहीशी लढावे लागते. गौर हरी दास सतत २२ वर्षे ही लढाई लढत राहतात. स्वातंत्रसैनिक असल्याचे सांगणाऱ्या गौर हरी दास यांची त्यांच्या पाठीमागे टर उडविली जात होती. ते त्यांना खोटारडा म्हणून चिडवित असतात. ज्या सोसायटीत ते रहात असतात त्याचे ते अध्यक्ष असतात. ते पद त्यांना सोडण्यास भाग पाडायचे ते प्रयत्न करतात. बातमीदाराच्या मदतीने अखेर गौर हरी दास यांना ओरिसातील बालासोर येथील तुरुंगाधिकाऱ्याच्या डायरीत त्यांच्या ९0 दिवसांच्या तुरुंगवासाची नोंद मिळते आणि ती डायरी पुरावा म्हणून सरकारला सादर केल्यानंतर अखेर लोकलाजेस्तव सरकारला गौर हरी दास यांना स्वातंत्रसैनिकाचे प्रमाणपत्र द्यावे लागते. गौर हरी दास्तान चित्रपटात गौर हरी दास ही विनय पाठक यांनी केलेली भूमिका त्यांच्या आजअखेर केलेल्या अभिनयाची कमाल आहे. अत्यंत साधा, गांधीवादी, प्रेमळ पिता आणि कणखर, जिद्दी स्वातंत्रसैनिक ज्या ताकदीने विनय पाठक यांनी उभा केला आहे, त्याला तोड नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून विनय पाठक यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुलाने झिडकारल्यानंतर भावविवश झालेला पिता, पत्नीच्या लाख समजावण्यानंतरही कागदपत्रे जमा करण्यासाठी पायपीट करणारा स्वातंत्रसैनिक, आपल्या मुलासाठी खादीचा शर्ट शिवण्यासाठी कापसाचे बी घेवून आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याशी त्यांनी केलेली बातचीत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांकडून ताम्रपटाऐवजी केवळ सरकारी कागदावर मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारताना अतिशय नम्रपणे चहाची आॅफर नाकारुन भावविवश झालेले गौर हरी दास या अभिनयाची उत्तुंग छटा विनय पाठक ज्या सहजतेने दाखवितात, त्यामुळे या चित्रपटाला प्रचंड उंचीवर नेवून ठेवलेले आहे. चित्रपटात कोंकणा सेन यांनी गौर हरी दास यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील ती दुवा आहे. मुलाला जेव्हा भारतात प्रवेश मिळत नाही, तेव्हा तो अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हाची तिची घालमेल, भारतात परतल्यानंतर आपल्या वडीलांप्रती त्याचा असणारा आदर गौर हरी दासपर्यंत पोहोचविण्याची धडपड करणारी पत्नी आणि सोसायटीच्या लोकांकडून आरोप प्रत्यारोप होत त्यांच्या स्वातंत्रसैनिकच असण्यावर उपस्थित केलेला प्रश्न याला उत्तर देताना दुर्गेचे घेतलेले रुप कोकणा सेन यांनी समर्थपणे उभी केली आहे. रजतकपूरने साकारलेला जोशी वकील, रणवीर शौरीने साकारलेला पत्रकार, विक्रम गोखले यांनी साकारलेला मुख्यमंत्री या आणखीन काही ताकदीच्या भूमिका या चित्रपटात पहायला मिळतात. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी केलेली मंत्र्याची भूमिका लक्षवेधी आहे. याशिवाय छोट्या छोट्या भूमिकेतून अनेक मराठी कलावंतांनी हा चित्रपट समृध्द केला आहे. मंत्रालयाजवळ वावरणाऱ्या लालची एजंटाची भूमिका करणारा भरत जाधव, मंत्रालयात काम करणारी नीना कुळकर्णी, सुनेची भूमिका करणारी नेहा पेंडसे, तुरुंगाधिकाऱ्याची भूमिका करणारे सुनील शेंडे, सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका करणारे भरत दाभोळकर यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत.अनंत नारायण महादेवन हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. चित्रपट, दूरदर्शन, नाटक आणि जाहिरात या क्षेत्रात ते १९८0 पासून काम करत आहेत. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे. जवळपास ७५ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत, तर ३0 हून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. जवळपास शंभराहून अधिक मालिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यांनी जवळजवळ अकरा चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांच्या मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाला पुरस्कारही मिळालेला आहे. एल. सुब्रमण्यम यांनी दिलेले संगीत हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाला स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर विजेता ध्वनीसंकलक रस्सूल पकुट्टी यांचा परीसस्पर्श लाभला आहे. चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक