शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

आत्मसन्मानाची लढाई/ गौर हरी दास्तान : स्वकीयांशी युध्द करणारा स्वातंत्रसैनिक

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे

पणजी : विनय पाठक यांचा संयमित अभिनय, रजत कपूर, कोंकणा सेन, रणवीर शौरी, तनिष्ठा चॅटर्जी यांनी दिलेली साथ यातून साकारलेला गौर हरी दास्तांन या हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांच्या चांगल्या अपेक्षा उंचावल्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी आश्चर्य वाटणार इतका तो प्रभावी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे यासाठी कौतुक केलेच पाहिजे. गौर हरी दास्तान ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे. १९७२ मध्ये ओरिसामधील बालासोर या गावातली ही मुले महात्मा गांधी यांच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात भाग घेतात. मुलांसाठीच्या वानर सेनेमध्ये सहभागी झालेला गौर हरी दास हा त्यातलाच एक मुलगा. स्वातंत्रसैनिकांशी संदेशाची देवाण-घेवाण करणे हे त्यांचे काम. शाळेवर फडकणारा युनियन जॅक काढून तिथे तिरंगा ध्वज फडकावणारा गौर हरी दास याला ९0 दिवस कारावासाची शिक्षा मिळते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गौर हरी दास त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह ते मुंबईत रहायला येतात. मुलाला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून कोणतेही प्रमाणपत्र नसते. आपण स्वातंत्र्याची लढाई कोणत्या प्रमाणपत्रासाठी किंवा पेन्शनसाठी केली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मागण्याचा प्रश्नच नाही, असे उत्तर देणाऱ्या गौर हरी दास यांना मुलाच्या भविष्यासाठी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करतात. पण त्यांना नोकरशाहीशी लढावे लागते. गौर हरी दास सतत २२ वर्षे ही लढाई लढत राहतात. स्वातंत्रसैनिक असल्याचे सांगणाऱ्या गौर हरी दास यांची त्यांच्या पाठीमागे टर उडविली जात होती. ते त्यांना खोटारडा म्हणून चिडवित असतात. ज्या सोसायटीत ते रहात असतात त्याचे ते अध्यक्ष असतात. ते पद त्यांना सोडण्यास भाग पाडायचे ते प्रयत्न करतात. बातमीदाराच्या मदतीने अखेर गौर हरी दास यांना ओरिसातील बालासोर येथील तुरुंगाधिकाऱ्याच्या डायरीत त्यांच्या ९0 दिवसांच्या तुरुंगवासाची नोंद मिळते आणि ती डायरी पुरावा म्हणून सरकारला सादर केल्यानंतर अखेर लोकलाजेस्तव सरकारला गौर हरी दास यांना स्वातंत्रसैनिकाचे प्रमाणपत्र द्यावे लागते. गौर हरी दास्तान चित्रपटात गौर हरी दास ही विनय पाठक यांनी केलेली भूमिका त्यांच्या आजअखेर केलेल्या अभिनयाची कमाल आहे. अत्यंत साधा, गांधीवादी, प्रेमळ पिता आणि कणखर, जिद्दी स्वातंत्रसैनिक ज्या ताकदीने विनय पाठक यांनी उभा केला आहे, त्याला तोड नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून विनय पाठक यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुलाने झिडकारल्यानंतर भावविवश झालेला पिता, पत्नीच्या लाख समजावण्यानंतरही कागदपत्रे जमा करण्यासाठी पायपीट करणारा स्वातंत्रसैनिक, आपल्या मुलासाठी खादीचा शर्ट शिवण्यासाठी कापसाचे बी घेवून आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याशी त्यांनी केलेली बातचीत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांकडून ताम्रपटाऐवजी केवळ सरकारी कागदावर मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारताना अतिशय नम्रपणे चहाची आॅफर नाकारुन भावविवश झालेले गौर हरी दास या अभिनयाची उत्तुंग छटा विनय पाठक ज्या सहजतेने दाखवितात, त्यामुळे या चित्रपटाला प्रचंड उंचीवर नेवून ठेवलेले आहे. चित्रपटात कोंकणा सेन यांनी गौर हरी दास यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील ती दुवा आहे. मुलाला जेव्हा भारतात प्रवेश मिळत नाही, तेव्हा तो अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हाची तिची घालमेल, भारतात परतल्यानंतर आपल्या वडीलांप्रती त्याचा असणारा आदर गौर हरी दासपर्यंत पोहोचविण्याची धडपड करणारी पत्नी आणि सोसायटीच्या लोकांकडून आरोप प्रत्यारोप होत त्यांच्या स्वातंत्रसैनिकच असण्यावर उपस्थित केलेला प्रश्न याला उत्तर देताना दुर्गेचे घेतलेले रुप कोकणा सेन यांनी समर्थपणे उभी केली आहे. रजतकपूरने साकारलेला जोशी वकील, रणवीर शौरीने साकारलेला पत्रकार, विक्रम गोखले यांनी साकारलेला मुख्यमंत्री या आणखीन काही ताकदीच्या भूमिका या चित्रपटात पहायला मिळतात. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी केलेली मंत्र्याची भूमिका लक्षवेधी आहे. याशिवाय छोट्या छोट्या भूमिकेतून अनेक मराठी कलावंतांनी हा चित्रपट समृध्द केला आहे. मंत्रालयाजवळ वावरणाऱ्या लालची एजंटाची भूमिका करणारा भरत जाधव, मंत्रालयात काम करणारी नीना कुळकर्णी, सुनेची भूमिका करणारी नेहा पेंडसे, तुरुंगाधिकाऱ्याची भूमिका करणारे सुनील शेंडे, सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका करणारे भरत दाभोळकर यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत.अनंत नारायण महादेवन हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. चित्रपट, दूरदर्शन, नाटक आणि जाहिरात या क्षेत्रात ते १९८0 पासून काम करत आहेत. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे. जवळपास ७५ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत, तर ३0 हून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. जवळपास शंभराहून अधिक मालिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यांनी जवळजवळ अकरा चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांच्या मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाला पुरस्कारही मिळालेला आहे. एल. सुब्रमण्यम यांनी दिलेले संगीत हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाला स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर विजेता ध्वनीसंकलक रस्सूल पकुट्टी यांचा परीसस्पर्श लाभला आहे. चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक