शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसन्मानाची लढाई/ गौर हरी दास्तान : स्वकीयांशी युध्द करणारा स्वातंत्रसैनिक

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे

पणजी : विनय पाठक यांचा संयमित अभिनय, रजत कपूर, कोंकणा सेन, रणवीर शौरी, तनिष्ठा चॅटर्जी यांनी दिलेली साथ यातून साकारलेला गौर हरी दास्तांन या हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांच्या चांगल्या अपेक्षा उंचावल्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरी आश्चर्य वाटणार इतका तो प्रभावी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे यासाठी कौतुक केलेच पाहिजे. गौर हरी दास्तान ही एका ताम्रपट न मिळालेल्या स्वातंत्रसैनिकाची कथा आहे. १९७२ मध्ये ओरिसामधील बालासोर या गावातली ही मुले महात्मा गांधी यांच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात भाग घेतात. मुलांसाठीच्या वानर सेनेमध्ये सहभागी झालेला गौर हरी दास हा त्यातलाच एक मुलगा. स्वातंत्रसैनिकांशी संदेशाची देवाण-घेवाण करणे हे त्यांचे काम. शाळेवर फडकणारा युनियन जॅक काढून तिथे तिरंगा ध्वज फडकावणारा गौर हरी दास याला ९0 दिवस कारावासाची शिक्षा मिळते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गौर हरी दास त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह ते मुंबईत रहायला येतात. मुलाला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण त्यांच्या वडिलांकडे स्वातंत्र्यसैनिक म्हणून कोणतेही प्रमाणपत्र नसते. आपण स्वातंत्र्याची लढाई कोणत्या प्रमाणपत्रासाठी किंवा पेन्शनसाठी केली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मागण्याचा प्रश्नच नाही, असे उत्तर देणाऱ्या गौर हरी दास यांना मुलाच्या भविष्यासाठी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करतात. पण त्यांना नोकरशाहीशी लढावे लागते. गौर हरी दास सतत २२ वर्षे ही लढाई लढत राहतात. स्वातंत्रसैनिक असल्याचे सांगणाऱ्या गौर हरी दास यांची त्यांच्या पाठीमागे टर उडविली जात होती. ते त्यांना खोटारडा म्हणून चिडवित असतात. ज्या सोसायटीत ते रहात असतात त्याचे ते अध्यक्ष असतात. ते पद त्यांना सोडण्यास भाग पाडायचे ते प्रयत्न करतात. बातमीदाराच्या मदतीने अखेर गौर हरी दास यांना ओरिसातील बालासोर येथील तुरुंगाधिकाऱ्याच्या डायरीत त्यांच्या ९0 दिवसांच्या तुरुंगवासाची नोंद मिळते आणि ती डायरी पुरावा म्हणून सरकारला सादर केल्यानंतर अखेर लोकलाजेस्तव सरकारला गौर हरी दास यांना स्वातंत्रसैनिकाचे प्रमाणपत्र द्यावे लागते. गौर हरी दास्तान चित्रपटात गौर हरी दास ही विनय पाठक यांनी केलेली भूमिका त्यांच्या आजअखेर केलेल्या अभिनयाची कमाल आहे. अत्यंत साधा, गांधीवादी, प्रेमळ पिता आणि कणखर, जिद्दी स्वातंत्रसैनिक ज्या ताकदीने विनय पाठक यांनी उभा केला आहे, त्याला तोड नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून विनय पाठक यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुलाने झिडकारल्यानंतर भावविवश झालेला पिता, पत्नीच्या लाख समजावण्यानंतरही कागदपत्रे जमा करण्यासाठी पायपीट करणारा स्वातंत्रसैनिक, आपल्या मुलासाठी खादीचा शर्ट शिवण्यासाठी कापसाचे बी घेवून आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याशी त्यांनी केलेली बातचीत आणि शेवटी मुख्यमंत्र्यांकडून ताम्रपटाऐवजी केवळ सरकारी कागदावर मिळालेले प्रमाणपत्र स्वीकारताना अतिशय नम्रपणे चहाची आॅफर नाकारुन भावविवश झालेले गौर हरी दास या अभिनयाची उत्तुंग छटा विनय पाठक ज्या सहजतेने दाखवितात, त्यामुळे या चित्रपटाला प्रचंड उंचीवर नेवून ठेवलेले आहे. चित्रपटात कोंकणा सेन यांनी गौर हरी दास यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील ती दुवा आहे. मुलाला जेव्हा भारतात प्रवेश मिळत नाही, तेव्हा तो अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतो, तेव्हाची तिची घालमेल, भारतात परतल्यानंतर आपल्या वडीलांप्रती त्याचा असणारा आदर गौर हरी दासपर्यंत पोहोचविण्याची धडपड करणारी पत्नी आणि सोसायटीच्या लोकांकडून आरोप प्रत्यारोप होत त्यांच्या स्वातंत्रसैनिकच असण्यावर उपस्थित केलेला प्रश्न याला उत्तर देताना दुर्गेचे घेतलेले रुप कोकणा सेन यांनी समर्थपणे उभी केली आहे. रजतकपूरने साकारलेला जोशी वकील, रणवीर शौरीने साकारलेला पत्रकार, विक्रम गोखले यांनी साकारलेला मुख्यमंत्री या आणखीन काही ताकदीच्या भूमिका या चित्रपटात पहायला मिळतात. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी केलेली मंत्र्याची भूमिका लक्षवेधी आहे. याशिवाय छोट्या छोट्या भूमिकेतून अनेक मराठी कलावंतांनी हा चित्रपट समृध्द केला आहे. मंत्रालयाजवळ वावरणाऱ्या लालची एजंटाची भूमिका करणारा भरत जाधव, मंत्रालयात काम करणारी नीना कुळकर्णी, सुनेची भूमिका करणारी नेहा पेंडसे, तुरुंगाधिकाऱ्याची भूमिका करणारे सुनील शेंडे, सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका करणारे भरत दाभोळकर यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत.अनंत नारायण महादेवन हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. चित्रपट, दूरदर्शन, नाटक आणि जाहिरात या क्षेत्रात ते १९८0 पासून काम करत आहेत. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे. जवळपास ७५ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत, तर ३0 हून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. जवळपास शंभराहून अधिक मालिकांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यांनी जवळजवळ अकरा चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांच्या मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाला पुरस्कारही मिळालेला आहे. एल. सुब्रमण्यम यांनी दिलेले संगीत हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाला स्लमडॉग मिलेनियर या आॅस्कर विजेता ध्वनीसंकलक रस्सूल पकुट्टी यांचा परीसस्पर्श लाभला आहे. चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक