शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘स्वाभिमानी’ला बॅट निवडणूक चिन्ह, निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:41 IST

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढविली जाणार असल्याने, खासदार शेट्टी कशी बॅटिंग करतात आणि निवडणूक जिंकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.

ठळक मुद्दे ‘स्वाभिमानी’ला बॅट निवडणूक चिन्ह, निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटपखासदार शेट्टी यांच्या बॅटिंगची उत्सुकता

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढविली जाणार असल्याने, खासदार शेट्टी कशी बॅटिंग करतात आणि निवडणूक जिंकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी गेल्या १० वर्षांपासून हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी ‘स्वाभिमानी’ हा पक्षही स्थापन केला आहे; पण एकूण मतांपैकी सहा टक्के मते मिळाली तरच तो पक्ष अधिकृत होऊन त्याची नोंदणीही निवडणूक आयोगाकडे होते. तसेच त्यांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्हही मिळते; पण खासदार शेट्टी हे एकटेच प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना लोकसभा निवडणूक लढविताना दरवेळी वेगळ्या चिन्हाची निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागते.हातकणंगलेतून २००९ मध्ये ‘रिडालोस’तर्फे रिंगणात उतरलेल्या शेट्टी यांना ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले होते. त्याच वेळी कोल्हापूर मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांनादेखील हेच चिन्ह मिळाले होते. २०१४ मध्ये महायुतीतर्फे पुन्हा शेट्टी रिंगणात आले. यावेळी त्यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले. या दोन्हीही निवडणुकांत शेट्टी मोठ्या फरकाने विजयी झाले आणि विशेष म्हणजे शिट्टी हे चिन्हही गाजले होते. त्यांच्या प्रचाराचे निम्मे काम या शिट्टीनेच केले होते.आता तिसऱ्यांदा हॅट्ट्रिकच्या अपेक्षेने रिंगणात उतरलेल्या शेट्टी यांना बॅट चिन्ह मिळाले आहे. कळत्या वयापासून सर्वांचे ‘बॅट’शी नाते जुळलेले असल्यामुळे बॅट हे चिन्ह प्रचारात वापरताना सोपे जाते. मागील दोन्ही निवडणुकांत जिल्हा आणि प्रादेशिक पातळ्यांवर गाजणारे शेट्टींचे नेतृत्व यावेळच्या निवडणुकीवेळी मात्र राष्ट्रीय स्तरावरील झाले आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाद्वारे देशपातळीवर नेतृत्वाची मोहर उमटविणारे खासदार शेट्टी घरच्या मैदानात कशा प्रकारे बॅटिंग करतात आणि मॅच जिंकून देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण