शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

चिंचवाडमधील पेयजल योजना खासगी जागेत, नावावर नसताना कोणत्या आधारावर पूर्ण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:44 IST

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प

ठळक मुद्दे पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत हलगर्जीपणा

संतोष बामणे।उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रिय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या खासगी जागेतच आहेत. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीच्या नावावर नसतानाही कोणत्या पद्धतीने पूर्ण केली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने पाणी यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हलगर्जीपणा केल्यामुळे पेजयल योजना वादात सापडली आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता, तसेच पेयजल योजनेवर टांगती तलवार आहे.

तत्कालीन सरपंच विठ्ठल घाटगे यांच्यासह सदस्यांनी सन २०१३ मध्ये राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करून आणली. याची रक्कम एक कोटी ६९ लाख रुपये आहे, तर २०१४ च्या नूतन सरपंच पुष्पाताई चौगुले, रंजना घाटगे, विमल कदम, सुरेखा वराळे यांच्या कालावधीत ही योजना अंमलात आली. चिंचवाड-शिरोळ मार्गावरील दि न्यू हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाबासाहेब व रावसाहेब चौगुले यांच्या शेतातील चार गुंठे क्षेत्रात ग्रामपंचायतीने राष्ट्रिय पेयजल योजनेसाठी प्रतिगुंठा एक लाख रुपये दराने जागा घेतली. मात्र, त्याचे खरेदीपत्रक न करताच राष्टÑीय पेयजल योजना उभी केली. तसेच पेयजल योजना उभी करण्यासाठी जागा कमी पडल्याने आणखी जागा अतिक्रमण करून वापरली आहे.

चिंचवाड ग्रामपंचायतीने पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोणत्या जागेची कागदपत्रे जमा केली आहेत, कोणती जागा ग्रामपंचायतीची म्हणून दाखविली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शासनाकडून एक कोटी ६९ लाखांच्या निधीतून ज्या जागेत पेयजल योजना उभी करण्यात आली आहे. ती जागा अद्याप रावसाहेब व बाबासाहेब चौगुले यांच्याच नावावर कशी आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने ती जागा अद्याप खरेदी का केली नाही,त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत जागा नावावर न करता कामात हलगर्जीपणा केला आहे. तसेच पदाधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक यांनी गावचा कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. 

पेयजल योजना बांधताना चार गुंठे जमिनीपेक्षा जास्त जागेत अतिक्रमणाची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली आहे. आमच्याकडे जास्तीच्या अतिक्रमीत जमिनीचा मोबदलाही दिला नाही व करारपत्रही केले नाही. त्यामुळे योजनेची सर्व जागा माझ्या व भावाच्या नावावर आहे.- रावसाहेब चौगुले, शेतकरी चिंचवाडआॅगस्ट २०१७ मध्ये चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यामुळे मागील कारभाराची आम्हाला माहिती नाही. जर ग्रामपंचायतीने दुसºयाच्या नावावर असलेल्या जागेत योजना उभी केली असेल तर ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- कल्पना नाईक, सरपंच चिंचवाड.