शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चिंचवाडमधील पेयजल योजना खासगी जागेत, नावावर नसताना कोणत्या आधारावर पूर्ण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:44 IST

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प

ठळक मुद्दे पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत हलगर्जीपणा

संतोष बामणे।उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रिय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या खासगी जागेतच आहेत. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीच्या नावावर नसतानाही कोणत्या पद्धतीने पूर्ण केली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने पाणी यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हलगर्जीपणा केल्यामुळे पेजयल योजना वादात सापडली आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता, तसेच पेयजल योजनेवर टांगती तलवार आहे.

तत्कालीन सरपंच विठ्ठल घाटगे यांच्यासह सदस्यांनी सन २०१३ मध्ये राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करून आणली. याची रक्कम एक कोटी ६९ लाख रुपये आहे, तर २०१४ च्या नूतन सरपंच पुष्पाताई चौगुले, रंजना घाटगे, विमल कदम, सुरेखा वराळे यांच्या कालावधीत ही योजना अंमलात आली. चिंचवाड-शिरोळ मार्गावरील दि न्यू हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाबासाहेब व रावसाहेब चौगुले यांच्या शेतातील चार गुंठे क्षेत्रात ग्रामपंचायतीने राष्ट्रिय पेयजल योजनेसाठी प्रतिगुंठा एक लाख रुपये दराने जागा घेतली. मात्र, त्याचे खरेदीपत्रक न करताच राष्टÑीय पेयजल योजना उभी केली. तसेच पेयजल योजना उभी करण्यासाठी जागा कमी पडल्याने आणखी जागा अतिक्रमण करून वापरली आहे.

चिंचवाड ग्रामपंचायतीने पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोणत्या जागेची कागदपत्रे जमा केली आहेत, कोणती जागा ग्रामपंचायतीची म्हणून दाखविली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शासनाकडून एक कोटी ६९ लाखांच्या निधीतून ज्या जागेत पेयजल योजना उभी करण्यात आली आहे. ती जागा अद्याप रावसाहेब व बाबासाहेब चौगुले यांच्याच नावावर कशी आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने ती जागा अद्याप खरेदी का केली नाही,त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत जागा नावावर न करता कामात हलगर्जीपणा केला आहे. तसेच पदाधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक यांनी गावचा कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. 

पेयजल योजना बांधताना चार गुंठे जमिनीपेक्षा जास्त जागेत अतिक्रमणाची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली आहे. आमच्याकडे जास्तीच्या अतिक्रमीत जमिनीचा मोबदलाही दिला नाही व करारपत्रही केले नाही. त्यामुळे योजनेची सर्व जागा माझ्या व भावाच्या नावावर आहे.- रावसाहेब चौगुले, शेतकरी चिंचवाडआॅगस्ट २०१७ मध्ये चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यामुळे मागील कारभाराची आम्हाला माहिती नाही. जर ग्रामपंचायतीने दुसºयाच्या नावावर असलेल्या जागेत योजना उभी केली असेल तर ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- कल्पना नाईक, सरपंच चिंचवाड.