शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

चिंचवाडमधील पेयजल योजना खासगी जागेत, नावावर नसताना कोणत्या आधारावर पूर्ण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:44 IST

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प

ठळक मुद्दे पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत हलगर्जीपणा

संतोष बामणे।उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रिय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या खासगी जागेतच आहेत. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीच्या नावावर नसतानाही कोणत्या पद्धतीने पूर्ण केली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने पाणी यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हलगर्जीपणा केल्यामुळे पेजयल योजना वादात सापडली आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता, तसेच पेयजल योजनेवर टांगती तलवार आहे.

तत्कालीन सरपंच विठ्ठल घाटगे यांच्यासह सदस्यांनी सन २०१३ मध्ये राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करून आणली. याची रक्कम एक कोटी ६९ लाख रुपये आहे, तर २०१४ च्या नूतन सरपंच पुष्पाताई चौगुले, रंजना घाटगे, विमल कदम, सुरेखा वराळे यांच्या कालावधीत ही योजना अंमलात आली. चिंचवाड-शिरोळ मार्गावरील दि न्यू हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाबासाहेब व रावसाहेब चौगुले यांच्या शेतातील चार गुंठे क्षेत्रात ग्रामपंचायतीने राष्ट्रिय पेयजल योजनेसाठी प्रतिगुंठा एक लाख रुपये दराने जागा घेतली. मात्र, त्याचे खरेदीपत्रक न करताच राष्टÑीय पेयजल योजना उभी केली. तसेच पेयजल योजना उभी करण्यासाठी जागा कमी पडल्याने आणखी जागा अतिक्रमण करून वापरली आहे.

चिंचवाड ग्रामपंचायतीने पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोणत्या जागेची कागदपत्रे जमा केली आहेत, कोणती जागा ग्रामपंचायतीची म्हणून दाखविली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शासनाकडून एक कोटी ६९ लाखांच्या निधीतून ज्या जागेत पेयजल योजना उभी करण्यात आली आहे. ती जागा अद्याप रावसाहेब व बाबासाहेब चौगुले यांच्याच नावावर कशी आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने ती जागा अद्याप खरेदी का केली नाही,त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत जागा नावावर न करता कामात हलगर्जीपणा केला आहे. तसेच पदाधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक यांनी गावचा कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. 

पेयजल योजना बांधताना चार गुंठे जमिनीपेक्षा जास्त जागेत अतिक्रमणाची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली आहे. आमच्याकडे जास्तीच्या अतिक्रमीत जमिनीचा मोबदलाही दिला नाही व करारपत्रही केले नाही. त्यामुळे योजनेची सर्व जागा माझ्या व भावाच्या नावावर आहे.- रावसाहेब चौगुले, शेतकरी चिंचवाडआॅगस्ट २०१७ मध्ये चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यामुळे मागील कारभाराची आम्हाला माहिती नाही. जर ग्रामपंचायतीने दुसºयाच्या नावावर असलेल्या जागेत योजना उभी केली असेल तर ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- कल्पना नाईक, सरपंच चिंचवाड.