शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या दाखल्याचा शिष्यवृत्तीमध्ये ‘अडसर’

By admin | Updated: December 28, 2015 01:09 IST

किचकट प्रक्रिया : जिल्ह्यातील ११ हजार १४५ विद्यार्थी वंचित राहणार

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती मिळण्यात जातीच्या दाखल्याची अटच अडथळा ठरत आहे. जातीचा दाखला काढणे किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ११ हजार १४५ विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावरील जातीचा पुरावा ग्राह्य धरून शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे; अन्यथा जातीचा दाखला नसलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा व त्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जिल्ह्णात विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती, मागासर्गीय या जातीचे पाचवी ते सातवीच्या १५ हजार तर आठवी ते दहावीचे १७ हजार ३१२ विद्यार्थी आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात दिरंगाई झाल्यामुळे एका दलित संघटनेने आंदोलन केल्यानंतर समाजकल्याण आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाने संयुक्तपणे सर्व्हे केला. त्यामध्ये नववीच्या ६ हजार २५२ तर दहावीच्या ४ हजार ८९३ विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसल्याचे समोर आले आहे. याउलट नववीच्या २२४४ आणि दहावीच्या २९५८ विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले असल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षीही हीच अडचण आली होती. त्यामुळे शासनेने नातेवाईकांचा जातीचा दाखला घेऊन शिष्यवृत्ती द्यावी, अशी विशेष परवानगी दिली होती. यंदा अशी परवानगी मिळालेली नाही. परिणामी, शिष्यवृत्तीसाठी जातीचा दाखला काढावाच लागणार आहे.सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात..जातीचा दाखला नसलेल्या नववी आणि कंसात दहावीच्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ११० (८९), भुदरगड - १६१ (१७७), चंदगड - २०६ (१९७), गगनबावडा - ८६ (६९), गडहिंग्लज - २३३ (२११), हातकणंगले - १७५४ (११२९), कागल - ३९२ (३६२), करवीर - ७१३ (६१६), पन्हाळा - ५७४ (४९६), राधानगरी - १८१ (१४७), शाहूवाडी - २७६ (२३४), शिरोळ - ६२६ (४२९), कोल्हापूर शहर - ९३४(७३७) .शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जातीचा दाखला नसलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या सर्व्हेतून मिळाली आहे. त्यामुळे शाळेतच जातीचा दाखला काढण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने विशेष शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी