शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जातीच्या दाखल्याचा शिष्यवृत्तीमध्ये ‘अडसर’

By admin | Updated: December 28, 2015 01:09 IST

किचकट प्रक्रिया : जिल्ह्यातील ११ हजार १४५ विद्यार्थी वंचित राहणार

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती मिळण्यात जातीच्या दाखल्याची अटच अडथळा ठरत आहे. जातीचा दाखला काढणे किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ११ हजार १४५ विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावरील जातीचा पुरावा ग्राह्य धरून शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे; अन्यथा जातीचा दाखला नसलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा व त्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जिल्ह्णात विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती, मागासर्गीय या जातीचे पाचवी ते सातवीच्या १५ हजार तर आठवी ते दहावीचे १७ हजार ३१२ विद्यार्थी आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात दिरंगाई झाल्यामुळे एका दलित संघटनेने आंदोलन केल्यानंतर समाजकल्याण आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाने संयुक्तपणे सर्व्हे केला. त्यामध्ये नववीच्या ६ हजार २५२ तर दहावीच्या ४ हजार ८९३ विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसल्याचे समोर आले आहे. याउलट नववीच्या २२४४ आणि दहावीच्या २९५८ विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले असल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षीही हीच अडचण आली होती. त्यामुळे शासनेने नातेवाईकांचा जातीचा दाखला घेऊन शिष्यवृत्ती द्यावी, अशी विशेष परवानगी दिली होती. यंदा अशी परवानगी मिळालेली नाही. परिणामी, शिष्यवृत्तीसाठी जातीचा दाखला काढावाच लागणार आहे.सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात..जातीचा दाखला नसलेल्या नववी आणि कंसात दहावीच्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ११० (८९), भुदरगड - १६१ (१७७), चंदगड - २०६ (१९७), गगनबावडा - ८६ (६९), गडहिंग्लज - २३३ (२११), हातकणंगले - १७५४ (११२९), कागल - ३९२ (३६२), करवीर - ७१३ (६१६), पन्हाळा - ५७४ (४९६), राधानगरी - १८१ (१४७), शाहूवाडी - २७६ (२३४), शिरोळ - ६२६ (४२९), कोल्हापूर शहर - ९३४(७३७) .शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जातीचा दाखला नसलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या सर्व्हेतून मिळाली आहे. त्यामुळे शाळेतच जातीचा दाखला काढण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने विशेष शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी