शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जातीच्या दाखल्याचा शिष्यवृत्तीमध्ये ‘अडसर’

By admin | Updated: December 28, 2015 01:09 IST

किचकट प्रक्रिया : जिल्ह्यातील ११ हजार १४५ विद्यार्थी वंचित राहणार

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती मिळण्यात जातीच्या दाखल्याची अटच अडथळा ठरत आहे. जातीचा दाखला काढणे किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ११ हजार १४५ विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावरील जातीचा पुरावा ग्राह्य धरून शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे; अन्यथा जातीचा दाखला नसलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा व त्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जिल्ह्णात विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती, मागासर्गीय या जातीचे पाचवी ते सातवीच्या १५ हजार तर आठवी ते दहावीचे १७ हजार ३१२ विद्यार्थी आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात दिरंगाई झाल्यामुळे एका दलित संघटनेने आंदोलन केल्यानंतर समाजकल्याण आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाने संयुक्तपणे सर्व्हे केला. त्यामध्ये नववीच्या ६ हजार २५२ तर दहावीच्या ४ हजार ८९३ विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसल्याचे समोर आले आहे. याउलट नववीच्या २२४४ आणि दहावीच्या २९५८ विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले असल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षीही हीच अडचण आली होती. त्यामुळे शासनेने नातेवाईकांचा जातीचा दाखला घेऊन शिष्यवृत्ती द्यावी, अशी विशेष परवानगी दिली होती. यंदा अशी परवानगी मिळालेली नाही. परिणामी, शिष्यवृत्तीसाठी जातीचा दाखला काढावाच लागणार आहे.सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात..जातीचा दाखला नसलेल्या नववी आणि कंसात दहावीच्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ११० (८९), भुदरगड - १६१ (१७७), चंदगड - २०६ (१९७), गगनबावडा - ८६ (६९), गडहिंग्लज - २३३ (२११), हातकणंगले - १७५४ (११२९), कागल - ३९२ (३६२), करवीर - ७१३ (६१६), पन्हाळा - ५७४ (४९६), राधानगरी - १८१ (१४७), शाहूवाडी - २७६ (२३४), शिरोळ - ६२६ (४२९), कोल्हापूर शहर - ९३४(७३७) .शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जातीचा दाखला नसलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या सर्व्हेतून मिळाली आहे. त्यामुळे शाळेतच जातीचा दाखला काढण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने विशेष शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी