शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोल्हापुरात बाप्पा निघाले गुपचुपच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 13:42 IST

कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही की त्यांच्यातील ओसंडणारा उत्साह, पारंपारिक वाद्य नाहीत की साऊंड सिस्टीम, बघ्यांची गर्दी नाही की मोठी मिरवणुक तरीही भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गुपचुप आपल्या गावी निघाले.

ठळक मुद्देइराणी खणीवर विसर्जन सुरु पंचगंगेला यंदा गणपतीचे दर्शन नाही

कोल्हापूर : कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही की त्यांच्यातील ओसंडणारा उत्साह, पारंपारिक वाद्य नाहीत की साऊंड सिस्टीम, बघ्यांची गर्दी नाही की मोठी मिरवणुक तरीही भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गुपचुप आपल्या गावी निघाले.

गेल्या दहा दिवसापासून अत्यंत साधेपणाने तसेच घरगुती स्वरुपात साजरा झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने मंगळवारी झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुक तसेच गर्दी टाळ्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते, त्याला कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळांनी तसेच जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद देत एक जबाबदार नागरिकत्वाची भुमिका निभावली.

एरव्ही गणेशोत्सव म्हटले की, कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह, वाद्यांची रेलचेल, साऊंड सिस्टीमचा छातीत धडकी भरवणारा आवाज, मिरणुकीतील भव्यता, मंडळाच्या कार्यकर्य्यांची वेगळेपण जपण्यासाठीची धडपड, मिरवणुकी पाहण्यासाठी लाखो अबालवृध्दांची गर्दी, बाप्पांना निरोपाचे श्रीफळ देण्यामधील चढाओढ, लाऊड स्पिकरवरुन जागोजागी होणारे बाप्पाचे स्वागत आणि या सगळ्यातून निर्माण होणारा गगनभेदी गलगलाट या सगळ्याला फाटा देत सार्वजनिक गणपतींची विसर्जन सुरु होते.

कोरोनाचा धडकी, प्रशासनाने केलेले आवाहन याचा परिणाम म्हणून गेल्या शंभर एक वर्षातील शांततेत झालेल्या गणपती विसर्जनाचा हा पहिलाचा प्रसंग आहे.मिरवणुक काढायची नाही, विसर्जनासाठी केवळ चारच कार्यकर्त्यांना परवानगी असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून गणपती विसर्जन सोहळा येथील इराणी खाणीवर सुरु झाला.

या ठिकाणी दोन्ही खाणी बॅरीकेड, कनाती मारुन प्रवेश बंद करण्यात आल्या होत्या. तेथे केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांनी विसर्जनासाठी सोडण्यात येत होते. दोन्ही खाणीत गणपती विसर्जनाची जबाबदारी पोलिस, महानगरपालिका अग्निशमन दल, व्हाईट आर्मी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पार पाडली.

विसर्जनावेळी मोठे तराफे, छोट्या नावा यांची सोय करण्यात आली होती. सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाच्या तसेच व्हाईट आर्मीच्या रेस्क्यू बोट ठेवण्यात आल्या होत्या.यंदा एकाच ठिकाणी विसर्जनप्रत्येक वर्षी पंचगंगा नदी, इराणी खाण, राजाराम तलाव, कोटीतिर्थ तलाव आदी ठिकाणी गणपती विसर्जन पार पडते. परंतू यंदा गर्दी टाळण्याच्या हेतूने केवळ इराणी खाणीतच गणपती विसर्जन करण्यात येत होते.

बाकीच्या ठिकाणी बॅरिकेड लावून परिसर बंद करण्यात आले होते, तसेच त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. त्यामुळे केवळ रंकाळा तलावा लगतच्या दोन इराणी खाणीत विसर्जन सुरु होते.पंचगंगा नदीवर शंभर वर्षात प्रथमच विसर्जन नाहीगणपती विसर्जन आणि पंचगंगा नदी यांचे अतुट नाते आहे. प्रदुषण टाळण्याच्या हेतूने अनेक वेळा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रदिर्घ काळ चालत आलेल्या नदीतील विसर्जनात कधीही खंड पडला नाही. परंतु यंदा कोरोनामुळे पंचगंगा नदीवर विसर्जनाला पूर्णत: बंदी घातली गेल्यामुळे अलिकडील शंभर वर्षात प्रथमच नदीच्या पाण्यात गणपतींचे विसर्जन झाले नाही.

नदीतील विसर्जनाची परंपरा खंडीत झाली. शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करत आज्ञापालनाचे कर्तव्य नि:संकोचपणे पार पाडून संकटाच्या काळातही एक आदर्श घालून दिला.मानाचा गणपती दारात विसर्जित

मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाचा मानाच्या गणपतीचे मंडळाच्या दारातच विसर्जन करण्यात आले. परंपरा खंडीत होऊ नये म्हणून शंभर मिटर अंतर गणपतीची मूर्ती पालखीतून वाहून नेण्यात आली, आणि तेथे निर्माण केलेल्या कृत्रीम कुंडात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

सकाळी सव्वा दहा वाजता झालेल्या या विसर्जन सोहळ्यास महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेक संभाजी जाधव यांच्यासह मंडळाचे पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर