शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

स्टँड अप योजनेची कॉमेडी; ‘मार्जिन मनी’ योजनेला बँका कर्जच देईनात, कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपासून एकालाही लाभ नाही

By पोपट केशव पवार | Updated: February 6, 2025 20:01 IST

उद्योगासाठीची योजना मृगजळच 

पोपट पवारकोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांनी उद्योग-व्यवसायात उतरावे यासाठी केंद्राच्या स्टॅंड अप योजनेंतर्गत ‘मार्जिन मनी’ योजना राबवली जाते खरी मात्र, कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे काठिण्य पातळीचे निकष पूर्ण करता येत नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत एकाही व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. दहा टक्के तुम्ही भरा, १५ टक्के आम्ही अनुदान देऊ असे केंद्र सरकार सांगत असले तरी उर्वरित ७५ टक्के कर्जासाठी बँका दारातही उभा करून घेत नसल्याने ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांसाठी मृगजळ ठरली आहे. केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत २०१९ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. उद्योग सुरू करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजकांना भराव्या लागणाऱ्या २५ टक्के हिश्श्याच्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत मार्जिन मनी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे नव उद्योजकांना केवळ १० टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. बँकांकडून कर्ज मिळाल्यानंतर अनुदानासाठीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर करावा लागतो. मात्र, बँकाच अनेक नियम, निकष लावत असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. परिणामी, या योजनेला प्रतिसाद कमी असल्याचे चित्र आहे.पाच वर्षांत अवघ्या ८ जणांना लाभकेंद्राच्या स्टॅंड अप योजनेंतर्गत २०१९ मध्ये ‘मार्जिन मनी’ योजना सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या पाच वर्षात अवघ्या ८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.अनुदान कमी, प्रतिसाद नाहीदहा लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी या योजनेतून कर्ज दिले जाते. मात्र, यासाठी समाजकल्याण विभागाकडून अवघे १५ टक्के अनुदान मिळते. उद्योगासाठीच्या इतर अनेक योजनांना २५ टक्क्यांपासून ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. त्यामुळे या समाजातील तरुण इतर योजनांकडेच प्रस्ताव सादर करतात.कर्ज देण्यास होते टाळाटाळअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांची संख्या उद्योग-व्यवसायात कमी आहे. उद्योगातील त्यांचा टक्का वाढावा यासाठी केंद्राच्या स्टँड अप योजनेंतर्गत ‘मार्जिन मनी’ योजना सुरू करण्यात आली. मात्र, बँकांकडून कर्ज देण्यास अनेकदा टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव आहे. कर्ज देण्यासाठी नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होते. शिवाय सिबिल खराब आहे, कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत म्हणून या कर्जांचे प्रस्ताव फेटाळले जात आहेत. बँकांचे कित्येकदा हेलपाटे मारूनही कर्ज मिळत नसल्याने या समाजातील तरुण या योजनेतून कर्ज घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांनी उद्योग-व्यवसायात उतरावे यासाठी स्टॅंड अप योजनेंतर्गत ‘मार्जिन मनी’ योजना राबवली जाते. या योजनेची प्रभावी जनजागृती केली आहे. मात्र, अनेक जण जास्त अनुदान असलेल्या योजनांचा लाभ घेत असल्याने या योजनेला प्रतिसाद कमी आहे. - सचिन साळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, कोल्हापूर 

समाजकल्याण विभागाच्या आर्थिक उन्नतीच्या योजना सुधारित स्वरूपात येत्या दोन महिन्यांत आणणार आहोत. या योजनांसाठीचे स्वतंत्र धाेरण राबविणार आहे. - डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारbankबँक