शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बँका गर्दीने फुलल्या, तीन दिवसांनंतर कामकाज सुरू; ग्राहकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:40 IST

दोन दिवसांचा संप आणि एका साप्ताहिक सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे दुपारी चारवाजेपर्यंत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या.

ठळक मुद्देबँका गर्दीने फुलल्या, ग्राहकांच्या रांगातीन दिवसांनंतर कामकाज सुरू

कोल्हापूर : दोन दिवसांचा संप आणि एका साप्ताहिक सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे दुपारी चारवाजेपर्यंत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या.गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतनवाढीचा करार तातडीने करावा, यासह अन्य मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप शुक्रवारी पुकारला. हा संप शनिवारीही कायम राहिला. त्यात रविवारी साप्ताहिक सुटी आली. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहिल्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे ग्राहकांना अडचणीचे बनले.

संपापूर्वी गुरुवारी शहरातील एटीएममध्ये भरण्यात आलेले पैसेदेखील शनिवारी बहुतांश प्रमाणात संपले होते. अशा स्थितीत सोमवारी बँकांचे कामकाज सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा श्वास घेतला. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने पेन्शनधारक आणि विविध बिले अदा करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक असलेल्या खातेदारांनी बँकांमध्ये गर्दी केली. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ग्राहक हे बँकांमध्ये येऊ लागले.

तासभरातच त्यांची गर्दी वाढली. पैसे काढण्यासाठी पेन्शनधारकांची रांग लागली होती. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकांमध्ये गर्दी होतेच. मात्र, या संपामुळे दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प झाल्याने सोमवारी ग्राहकांची गर्दीत अधिकच भर पडली. दरम्यान, शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या ज्या-ज्या एटीएममधील पैसे संपले होते. ते भरण्याची काम दुपारपर्यंत बँकांकडून सुरू होते.

...अन्यथा मार्चमध्ये संपबँकिंग क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसांचा संप करण्यात आला. त्याची दखल घेऊन सरकारने सकारात्मक कार्यवाही करावी. अन्यथा दि. १३ ते १५ मार्च या कालावधीत पुन्हा संप करण्यात येणार आहे. दोन दिवसांचा संप करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना माहितीपत्रकामुळे ग्राहकांना दिली होती, असे बँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेचे मुख्य प्रबंधक व्ही. एम. भातखंडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर