शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

पीक कर्जासाठी बॅँकांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधावा: जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:00 IST

कोल्हापूर : पीक कर्ज घेण्याबाबत बँकांनी शेतकऱ्यांशी संपर्क करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ग्राहकांकडून येणाऱ्या विविध योजनांचे ...

ठळक मुद्दे पीक कर्जासाठी बॅँकांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधावा: जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक

कोल्हापूर : पीक कर्ज घेण्याबाबत बँकांनी शेतकऱ्यांशी संपर्क करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ग्राहकांकडून येणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मंजूर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने, भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक आर. के. महाना, साहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, बँक आॅफ इंडियाचे आंचल प्रबंधक नितीन देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, आदी प्रमुख उपस्थित होते.विविध बँक आणि महामंडळाच्या उद्दिष्टपूर्तीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यामध्ये काही बँकांनी ग्राहकांची खाती उघडली नसल्याचे निदर्शनास आले. या बँकांवर वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होण्यासाठी त्यांनी सूचना केल्या. महामंडळांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. त्याचबरोबर वसुलीमध्ये बँकांना महामंडळांनी सहकार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे उद्दिष्ट २ हजार ३१५ कोटींचे देण्यात आले आहे. ३१ मार्च २०१९ अखेर २२२८.२६ कोटी इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अमन मित्तल यांनीही यावेळी आढावा घेतला. राहुल माने यांनी स्वागत केले. यावेळी महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक आणि बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर