शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जासाठी बँकांचा हात सैल : उद्दिष्टापैकी ९६ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:09 IST

कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे

ठळक मुद्देजिल्हा बँकेचा वाटा १३१, ‘राष्ट्रीय’चा ६३, तर खासगी बँकांचा ४९ टक्के

कोल्हापूर : कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा सर्वाधिक आहे. बँकेने १३१ टक्के, तर राष्ट्रीय बँकांनी ६३ टक्के आणि खासगी बँकांनीही ४९ टक्के पीककर्ज देऊन शेतकऱ्यांची पत सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचा कृषी कर्जपुरवठ्याचा आढावा घेतला असता, गतवर्षीच्या आराखड्यापैकी केवळ ५४ टक्केच कर्जपुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (दि. २९) मंत्रालयातील आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय बँकांचा आकडा दोन ते पाच टक्केच आहे. याउलट जिल्हा बँकांनी ६८ टक्के कर्जपुरवठा केला आहे. या संदर्भाने जिल्ह्याची वस्तुस्थिती ताडून पाहिली असता, चित्र फारच आशादायी दिसते.जिल्ह्यात ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ९६ टक्के कर्जपुरवठा केला गेला आहे. २ लाख २४ हजार ४६६ शेतकºयांना २२२० कोटी ७२ लाखांचा पीक कर्जपुरवठा झाला आहे. यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. उद्दिष्टपूर्ती करतानाच राज्यात सर्वाधिक १३१ टक्क्यांचा आकडाही गाठला आहे. जिल्ह्यातील एकूण होणाºया कर्जपुरवठ्यापैकी जवळपास ८० टक्के कर्जाचे वाटप एकट्या जिल्हा बँकेने केले आहे. बँकेने एक लाख ७७ हजार ५६८ शेतकºयांना १५९१ कोटी २६ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ६३ टक्के कर्जपुरवठा केला आहे. यात ३५ हजार ८३१ शेतकºयांना ४७१ कोटी १७ लाख, तर खासगी बँकांनी १० हजार ११६ शेतकºयांना १४७ कोटी ३० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेचा कर्जपुरवठा यंदा कमी झाला असून, तो अवघ्या ४२१ शेतकºयांना एक कोटी ९९ लाख इतकाच आहे. तो एकूण आकडेवारीच्या २२ टक्केच आहे.

दरम्यान, तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने दिले जाते. वेळेवर परतफेड केल्यास पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ घेता येतो. यावर्षी उसाची बिले दोन टप्प्यांत आल्याने कर्जफेडीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसत आहे. ऊस, सोयाबीन, केळी, भुईमूग, भात यांसह खरीप व रब्बी पिकांसाठी पीककर्जाचा पुरवठा होतो; पण अलीकडे या पीककर्जाच्या जोडीनेच ठिबक, जमिनीचा विकास, विहिरीसह सिंचन पाईपलाईन, यांत्रिकीकरणासाठी कर्ज घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे; पण त्यासाठीचा व्याजाचा दर मात्र जास्त असल्याने छोट्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागतो.कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्यउसासारखे नगदी पीक, सोसायट्यांचे गावपातळीवरील जाळे, शेतकºयांची कर्ज फेडण्याची मानसिकता, खासगी व राष्ट्रीय बँकांचे विस्तारलेले जाळे यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जाचा आलेख कायमच चढा राहिलेला आहे. क.म. (कमाल मर्यादा)च्या निकषांपेक्षाही अधिक कर्जपुरवठा करूनही तो वसूल होण्याची खात्री असल्यानेच बँकांनी जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्याचा लाभ शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.२०१८-१९ मधील पीककर्ज वाटप (लाखात)बँक शेतकरी रक्कम टक्केवारीजिल्हा बँक १७७५६८ १५९१२६ १३१राष्ट्रीयीकृत बँक ३५८३१ ४७११७ ६३खासगी बँक १०६१६ १४७३० ४९ग्रामीण बँक ४२१ १०९९ २२एकूण २,२४,४६६ २,२२,०७२ ९६

टॅग्स :bankबँकMONEYपैसाFarmerशेतकरी