शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जासाठी बँकांचा हात सैल : उद्दिष्टापैकी ९६ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:09 IST

कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे

ठळक मुद्देजिल्हा बँकेचा वाटा १३१, ‘राष्ट्रीय’चा ६३, तर खासगी बँकांचा ४९ टक्के

कोल्हापूर : कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा सर्वाधिक आहे. बँकेने १३१ टक्के, तर राष्ट्रीय बँकांनी ६३ टक्के आणि खासगी बँकांनीही ४९ टक्के पीककर्ज देऊन शेतकऱ्यांची पत सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचा कृषी कर्जपुरवठ्याचा आढावा घेतला असता, गतवर्षीच्या आराखड्यापैकी केवळ ५४ टक्केच कर्जपुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (दि. २९) मंत्रालयातील आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय बँकांचा आकडा दोन ते पाच टक्केच आहे. याउलट जिल्हा बँकांनी ६८ टक्के कर्जपुरवठा केला आहे. या संदर्भाने जिल्ह्याची वस्तुस्थिती ताडून पाहिली असता, चित्र फारच आशादायी दिसते.जिल्ह्यात ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ९६ टक्के कर्जपुरवठा केला गेला आहे. २ लाख २४ हजार ४६६ शेतकºयांना २२२० कोटी ७२ लाखांचा पीक कर्जपुरवठा झाला आहे. यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. उद्दिष्टपूर्ती करतानाच राज्यात सर्वाधिक १३१ टक्क्यांचा आकडाही गाठला आहे. जिल्ह्यातील एकूण होणाºया कर्जपुरवठ्यापैकी जवळपास ८० टक्के कर्जाचे वाटप एकट्या जिल्हा बँकेने केले आहे. बँकेने एक लाख ७७ हजार ५६८ शेतकºयांना १५९१ कोटी २६ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ६३ टक्के कर्जपुरवठा केला आहे. यात ३५ हजार ८३१ शेतकºयांना ४७१ कोटी १७ लाख, तर खासगी बँकांनी १० हजार ११६ शेतकºयांना १४७ कोटी ३० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेचा कर्जपुरवठा यंदा कमी झाला असून, तो अवघ्या ४२१ शेतकºयांना एक कोटी ९९ लाख इतकाच आहे. तो एकूण आकडेवारीच्या २२ टक्केच आहे.

दरम्यान, तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने दिले जाते. वेळेवर परतफेड केल्यास पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ घेता येतो. यावर्षी उसाची बिले दोन टप्प्यांत आल्याने कर्जफेडीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसत आहे. ऊस, सोयाबीन, केळी, भुईमूग, भात यांसह खरीप व रब्बी पिकांसाठी पीककर्जाचा पुरवठा होतो; पण अलीकडे या पीककर्जाच्या जोडीनेच ठिबक, जमिनीचा विकास, विहिरीसह सिंचन पाईपलाईन, यांत्रिकीकरणासाठी कर्ज घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे; पण त्यासाठीचा व्याजाचा दर मात्र जास्त असल्याने छोट्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागतो.कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्यउसासारखे नगदी पीक, सोसायट्यांचे गावपातळीवरील जाळे, शेतकºयांची कर्ज फेडण्याची मानसिकता, खासगी व राष्ट्रीय बँकांचे विस्तारलेले जाळे यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जाचा आलेख कायमच चढा राहिलेला आहे. क.म. (कमाल मर्यादा)च्या निकषांपेक्षाही अधिक कर्जपुरवठा करूनही तो वसूल होण्याची खात्री असल्यानेच बँकांनी जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्याचा लाभ शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.२०१८-१९ मधील पीककर्ज वाटप (लाखात)बँक शेतकरी रक्कम टक्केवारीजिल्हा बँक १७७५६८ १५९१२६ १३१राष्ट्रीयीकृत बँक ३५८३१ ४७११७ ६३खासगी बँक १०६१६ १४७३० ४९ग्रामीण बँक ४२१ १०९९ २२एकूण २,२४,४६६ २,२२,०७२ ९६

टॅग्स :bankबँकMONEYपैसाFarmerशेतकरी