शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

बॅँक घोटाळेबहाद्दरांना आर्थिक दंड आवश्यक : वाय. व्ही. रेड्डी -शिवाजी विद्यापीठात बँकआॅफ इंडिया अध्यासनातर्फे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:04 IST

बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले

कोल्हापूर : बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रेड्डी यांनी ‘बॅँकांची सुरक्षितता’ या विषयावर आपले विचार मांडले.

डॉ. रेड्डी म्हणाले, बॅँकामध्ये ठेवी ठेवताना नागरिक सर्व बाजूंनी विचार करतात. १०० टक्के ठेवी सुरक्षित आहेत, असे म्हणता येत नसले तरी त्या नाहीत असेही म्हणता येत नाही. २००१ साली अनुत्पादित कर्जाचे प्रमाण आतापेक्षा खूपच जास्त होते. मात्र नंतर त्यामध्ये सुधारणा होत गेल्या.

जगभरामध्ये २००८ मध्ये आर्थिक संकटामध्ये अनेक बॅँका अडचणीत आल्या तेव्हासुद्धा भारतातील बॅँका टिकून राहिल्या, याची आठवण करून देत डॉ. रेड्डी यांनी यासाठीची आपली आधीपासूनच तयारी होती असे नमूद केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या हस्ते यावेळी डॉ. रेड्डी आणि बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यासन प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, व्ही. बी. पाटील, अभय गांधी, बाळ पाटणकर, रवी शिराळकर, किरण कर्नाड, आदी मान्यवर उपस्थित होते.एसपीपी थोरात यांना अभिवादन !व्याख्यानाच्या सुरुवातीलाच डॉ. रेड्डी यांनी ले. जनरल एसपीपी थोरात यांना अभिवादन केले. चीनबाबत या कोल्हापूरच्या सुपुत्राने दिलेला सल्ला मानला नाही आणि त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे ते म्हणाले.कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे शनिवारी रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडियाkolhapurकोल्हापूर