शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडेत वाहतूक काेंडीने सगळेच बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

राजाराम कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने ...

राजाराम कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी कायमस्वरूपी येथे पोलीस नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने दररोज उसाची वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टू व्हीलर गाड्यांची पार्किंग असते. तसेच दुकानाचे बोर्ड रस्त्यावर उभे केले आहेत. काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. अंबिरा पुलावर दोन्ही बाजूला खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्या उभ्या असतात. सरूड, पिशवी मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवर दररोज बॉक्साईट, कोळसा, मळी वाहतूक करणारी अवजड वाहने धावत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. शाहूवाडी, बांबवडे पोलीस चौकीसमोर एसटीचा थांबा आहे. येथे एसटी वळवण्यासाठी देखील चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस चौकीसमोर खासगी गाड्या, टू व्हीलर गाड्या पार्किंग केल्या जातात. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. पोलीस ठाण्याने ट्रॅफिक पोलीस नेमला आहे . पोलीस मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी ठमके वाडी फाट्यावर पर्यटकांच्या गाड्या डवून तपासणी करण्यात धन्यता मानतात.

.............

जनतेने न्याय मागायचा कुणाकडे

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य पोलीस विसरलेले दिसतात. वरकमाईसाठी वाहतुकीच्या कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याचा त्रास परजिल्ह्यांतून पर्यटनासाठी आलेले पर्यटक, भविक यांना होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवायची असेल तर कायमस्वरूपी सरुड फाटा, पिशवी रस्त्यावर दोन पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

............

एकत्र येऊन मार्ग काढावा

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले पाहिजेत, रस्त्यावर उभा असणाऱ्या वडाप गाड्या, टू व्हीलर गाड्या बाजार भरणाऱ्या जागेवर पर्किंग करणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या कोंडीवर मार्ग काढणे गरजेचे आहे, अन्यथा या वाहतुक कोंडीचा त्रास सर्वांनाच होत आहे.

.................

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे वाहतुकीची काेंडी नित्याचीच झाली आहे.