शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

बांबवडेत वाहतूक काेंडीने सगळेच बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

राजाराम कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने ...

राजाराम कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेतीतील मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठी कायमस्वरूपी येथे पोलीस नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने दररोज उसाची वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टू व्हीलर गाड्यांची पार्किंग असते. तसेच दुकानाचे बोर्ड रस्त्यावर उभे केले आहेत. काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. अंबिरा पुलावर दोन्ही बाजूला खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्या उभ्या असतात. सरूड, पिशवी मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवर दररोज बॉक्साईट, कोळसा, मळी वाहतूक करणारी अवजड वाहने धावत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. शाहूवाडी, बांबवडे पोलीस चौकीसमोर एसटीचा थांबा आहे. येथे एसटी वळवण्यासाठी देखील चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस चौकीसमोर खासगी गाड्या, टू व्हीलर गाड्या पार्किंग केल्या जातात. याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. पोलीस ठाण्याने ट्रॅफिक पोलीस नेमला आहे . पोलीस मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी ठमके वाडी फाट्यावर पर्यटकांच्या गाड्या डवून तपासणी करण्यात धन्यता मानतात.

.............

जनतेने न्याय मागायचा कुणाकडे

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य पोलीस विसरलेले दिसतात. वरकमाईसाठी वाहतुकीच्या कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याचा त्रास परजिल्ह्यांतून पर्यटनासाठी आलेले पर्यटक, भविक यांना होत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवायची असेल तर कायमस्वरूपी सरुड फाटा, पिशवी रस्त्यावर दोन पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

............

एकत्र येऊन मार्ग काढावा

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले पाहिजेत, रस्त्यावर उभा असणाऱ्या वडाप गाड्या, टू व्हीलर गाड्या बाजार भरणाऱ्या जागेवर पर्किंग करणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या कोंडीवर मार्ग काढणे गरजेचे आहे, अन्यथा या वाहतुक कोंडीचा त्रास सर्वांनाच होत आहे.

.................

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे वाहतुकीची काेंडी नित्याचीच झाली आहे.