शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना उद्धवनेच छळले!

By admin | Updated: July 18, 2014 23:35 IST

नारायण राणेंनी डागली तोफ : माझ्यावरील टीका थांबवा, अन्यथा ‘मातोश्री’मधील आतील गोष्टी बाहेर आणेन

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोणी सर्वाधिक छळले असेल तर उद्धव ठाकरे यांनीच. ते दोनवेळा घरही सोडून गेले होते. त्यांनी जर आपल्या विरोधात टीका करणे थांबविले नाही तर ‘मातोश्री’च्या आतील सगळ्या गोष्टी बाहेर आणेन आणि उद्धव ठाकरे यांचे वस्त्रहरण करेन, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. सोमवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, हे स्पष्ट करताना त्यांनी पुढील दिशा सांगण्यास मात्र नकार दिला. ते सोमवारी पत्रकार परिषदेनंतरच आपण जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज, शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. ‘बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश नाही’, असे विधान उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले आहे. पण, बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनीच केला आहे. ही गोष्ट तुम्ही ‘मातोश्री’वरील नोकर, शिवसेनेचे जुने नेते आणि ‘मातोश्री’च्या भिंतींना विचारा. दोनवेळा हा माणूस घर सोडून गेला होता आणि मुलाबाळांसह हॉटेल हॉलिडे इनमध्ये जाऊन राहिला होता. याच माणसाने बाळासाहेबांना सर्वाधिक छळले आहे. त्याला मी त्रास देणेही म्हणणार नाही. ते छळणेच होते,’ अशा शब्दांत राणे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली. कोकण भयमुक्त करण्याच्या ठाकरे यांच्या विधानावरही त्यांनी जोरदार टीका केली. कोकणात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता भयभीत झालेली कशी काय दिसते? कोकणच्या सुखदु:खात कधीच सहभागी न होणाऱ्या, कोकणच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांमध्ये कधीही सहभागी न होणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणात योगदान काय आहे? कोकणातील मासेमारी, कृषी याबाबत त्यांना काही ज्ञान आहे का? कोकणातील जनता भयभीत झाली आहे, असे त्यांना दिसत आहे; पण केंद्र सरकारने अल्पकालावधीत केलेली महागाई, रेल्वे भाडेवाढ त्यांना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेचे अनेकजण मोदी लाटेत अंघोळ करून खासदार झाले आहेत; पण शिवसेना ही नेतृत्वहीन संघटना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींचा प्रभाव नसेल, असेही ते म्हणाले. आपण भाजपमध्ये जाणार आहोत आणि भाजपने आपल्याला घेऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे भाजपला देत आहेत; पण ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षावर बोलू नये, असेही ते म्हणाले. मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्या भागातील लोकांसमोर जाण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना मांडण्यासाठी आपण हा दौरा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय ठाम आहे. हा राजीनामा आपण का देत आहोत, हे आपण सोमवारीच जाहीर करू, असे राणे यांनी यावेळी सांगितले. आपण केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत. पक्षाचा राजीनामा देण्याचे विधान आपण कधीही केलेले नाही. त्यामुळे पुढे काय करणार, या प्रश्नाला अर्थच नाही, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. स्वतंत्र पक्ष ? छे ! स्वतंत्र पक्ष काढण्याचा आपला अजिबात विचार नाही. इतक्या कमी वेळेत पक्ष काढून निवडणूक लढविता येत नाही. स्वतंत्र पक्ष काढण्याचा आपला कोणताही विचार नाही, असे राणे यांनी सांगितले. राज्यातील छोटे-छोटे पक्ष एकत्र करणार का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मी चिंध्या जमा करीत नाही आणि मला जमा करायच्याही नाहीत. निष्ठावंतांवर अन्याय होतोय काँग्रेसमधील निर्णय पद्धतीमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत आहे, असे सूचक विधान त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले.